शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

एकाच घरातील पाच जणांना डेंग्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 05:53 IST

पूर्वेकडील वालधुनी शिवाजीनगरमधील एकाच घरातील पाच जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.

कल्याण : पूर्वेकडील वालधुनी शिवाजीनगरमधील एकाच घरातील पाच जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. शिवाजीनगरमधील लक्ष्मी चंद्रकांत टोकेकर (५४), त्यांची मुले गणेश (३३), विनोद (३८) आणि नातवंडं मृणाल (६), सई (१०) यांना डेंग्यूची लागण झाली आहे. यातील लक्ष्मी आणि गणेश यांच्यावर सोमवारपासून पूर्वेकडील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, विनोद यांना केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, दोन्ही लहान मुलींना डेंग्यू झाल्याचे गुरुवारी निदान झाले आहे. त्यांच्यावर सध्या घरीच उपचार सुरू असून, त्यांना शुक्रवारी उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात नेले जाणार आहे, अशी माहिती कुटुंबातील निखिल टोकेकर यांनी दिली.दरवर्षी पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, कॉलरा आदी साथीच्या आजारांची लागण मोठ्या प्रमाणात होत असते. महापालिकेसह शहरांमधील खाजगी रुग्णालयांमध्येही या रुग्णांची संख्या वाढत असते. यंदाच्या पावसाळ्यातील साथीच्या आजारांचा आढावा घेता जून ते आजपर्यंत विविध तापांचे एकूण २२ हजार ८१३ हून अधिक रुग्ण आढळले आहेत. सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्येही कमालीची वाढ झाली आहे. पावसाळा थांबल्यावरच डेंग्यूची लागण होते. वातावरणात झालेला बदल हे डेंग्यूचा फैलाव व्हायला कारणीभूत ठरतो. साचलेल्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. दरम्यान, आता एकाच घरातील पाच व्यक्तींना डेंग्यूची झालेली लागण पाहता केडीएमसी कोणती कार्यवाही करते, याकडे लक्ष लागले आहे.यासंदर्भात केडीएमसीचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू लवंगारे म्हणाले, ‘आमचे वैद्यकीय पथक तत्काळ घटनास्थळी जाऊन तपासणी करेल. तसेच खाजगी रुग्णालयातही भेट देऊन आढावा घेईल.’

टॅग्स :dengueडेंग्यू