शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

कारखानेबंदीला प्रोत्साहन देणारा प्रस्ताव मागे घेण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 21:52 IST

राज्यातील ३०० पेक्षा कमी कामगार असलेले उद्योग बंद करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी लागणार नाही, असा औद्योगिक विवाद कायद्यात बदल करण्याची राज्य मंत्रिमंडळाच्या समितीने शिफारस केली आहे.

ठाणे - राज्यातील ३०० पेक्षा कमी कामगार असलेले उद्योग बंद करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी लागणार नाही, असा औद्योगिक विवाद कायद्यात बदल करण्याची राज्य मंत्रिमंडळाच्या समितीने शिफारस केली आहे. कारखानेबंदीला प्रोत्साहन देणारा हा बदल मागे घ्यावा, अशी मागणी हिंद मजदूर सभा-महाराष्ट्र कौन्सिलचे सरचिटणीस संजय वढावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सध्याच्या तरतुदीनुसार १०० पेक्षा अधिक कामगार असले, तरच राज्य सरकारची परवानगी घेण्याची गरज आहे. आता ही मर्यादा वाढवून ३०० पर्यंत करण्याचा घाट घालण्यात येत आहे. महाराष्ट्रात ९६ टक्के उद्योगांमध्ये कामगारांची संख्या ३०० पेक्षा कमी आहे. याचा अर्थ ९६ टक्के उद्योगांना बंद करण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज लागणार नाही. यामुळे मालकवर्गाला हवे तेव्हा उद्योग बंद करण्यासाठी मोकळे रान मिळणार असल्याचा आरोप वढावकर यांनी केला. त्यामुळेच कारखाने बंद होऊन बेरोजगारी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. संघटित कामगारवर्गावर हा मोठा हल्ला असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी राजस्थान सरकारने औद्योगिक विवाद कायद्यामध्ये अशीच दुरुस्ती केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने सर्व राज्यांना राजस्थानच्या धर्तीवर कायद्यात बदल करण्यासाठी निर्देश दिले आहेत.मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया या घोषणा हवेत विरून गेल्या आहेत. उत्पादन क्षेत्रात नव्याने गुंतवणूक होत नाही. अनेक उद्योग बंद पडले आहेत. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा वेळी वरील बदल केल्यास उत्पादन क्षेत्र आणि रोजगाराला मोठा धक्का बसेल. सरकारने हा बदल रद्द करावा, अशी मागणी वढावकर यांनी केली आहे.

 

टॅग्स :thaneठाणे