शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कारखानेबंदीला प्रोत्साहन देणारा प्रस्ताव मागे घेण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 21:52 IST

राज्यातील ३०० पेक्षा कमी कामगार असलेले उद्योग बंद करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी लागणार नाही, असा औद्योगिक विवाद कायद्यात बदल करण्याची राज्य मंत्रिमंडळाच्या समितीने शिफारस केली आहे.

ठाणे - राज्यातील ३०० पेक्षा कमी कामगार असलेले उद्योग बंद करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी लागणार नाही, असा औद्योगिक विवाद कायद्यात बदल करण्याची राज्य मंत्रिमंडळाच्या समितीने शिफारस केली आहे. कारखानेबंदीला प्रोत्साहन देणारा हा बदल मागे घ्यावा, अशी मागणी हिंद मजदूर सभा-महाराष्ट्र कौन्सिलचे सरचिटणीस संजय वढावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सध्याच्या तरतुदीनुसार १०० पेक्षा अधिक कामगार असले, तरच राज्य सरकारची परवानगी घेण्याची गरज आहे. आता ही मर्यादा वाढवून ३०० पर्यंत करण्याचा घाट घालण्यात येत आहे. महाराष्ट्रात ९६ टक्के उद्योगांमध्ये कामगारांची संख्या ३०० पेक्षा कमी आहे. याचा अर्थ ९६ टक्के उद्योगांना बंद करण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज लागणार नाही. यामुळे मालकवर्गाला हवे तेव्हा उद्योग बंद करण्यासाठी मोकळे रान मिळणार असल्याचा आरोप वढावकर यांनी केला. त्यामुळेच कारखाने बंद होऊन बेरोजगारी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. संघटित कामगारवर्गावर हा मोठा हल्ला असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी राजस्थान सरकारने औद्योगिक विवाद कायद्यामध्ये अशीच दुरुस्ती केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने सर्व राज्यांना राजस्थानच्या धर्तीवर कायद्यात बदल करण्यासाठी निर्देश दिले आहेत.मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया या घोषणा हवेत विरून गेल्या आहेत. उत्पादन क्षेत्रात नव्याने गुंतवणूक होत नाही. अनेक उद्योग बंद पडले आहेत. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा वेळी वरील बदल केल्यास उत्पादन क्षेत्र आणि रोजगाराला मोठा धक्का बसेल. सरकारने हा बदल रद्द करावा, अशी मागणी वढावकर यांनी केली आहे.

 

टॅग्स :thaneठाणे