शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नदीकाठच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाची आता गरज, बदलापूरच्या रहिवाशांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 02:17 IST

धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करताना ज्या सवलती देण्यात येतात, त्याच सवलती बदलापूरमधील पुरात बाधित झालेल्या जुन्या इमारतींनाही मिळाव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

- पंकज पाटीलबदलापूर : धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करताना ज्या सवलती देण्यात येतात, त्याच सवलती बदलापूरमधील पुरात बाधित झालेल्या जुन्या इमारतींनाही मिळाव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जुन्या इमारती या तळमजल्यासह तीन ते चार मजली आहेत. त्यामुळे या तळमजला असलेल्या जुन्या इमारतींचा जलदगतीने पुनर्विकास करण्यासाठी धोकादायक इमारतींच्या धर्तीवर वाढीव चटईक्षेत्र मिळावे, अशी अपेक्षा रहिवासी करत आहेत. वाढीव चटईक्षेत्र मिळाल्यास त्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी बांधकाम व्यावसायिक पुढे सरसावतील, असे मत व्यक्त केले जात आहे.बदलापूरचा पूर ओसरल्यावर आता नागरिक घराची आवराआवर करत आपल्या कामाला लागले आहेत. पुरात जे नुकसान झाले, त्याची भरपाई होणे शक्य नसले तरी दरवर्षी पावसात अशीच अवस्था निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रत्येक कुटुंब धास्तावले आहे. पाऊस वाढला तर उल्हास नदीचे पाणी आपल्या घरात येणार, हे निश्चित झाल्याने आता त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर चर्चा सुरू झाली आहे. २००५ च्या महापुरात ज्या कुटुंबीयांना फटका सहन करावा लागला, त्याच कुटुंबीयांना यंदाच्या पुरातही फटका बसला. त्यामुळे अशा पुरात आपले संसार कसे उभे करायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाल्यावर जुन्या इमारती रस्त्यापासून खाली गेल्या आहेत. त्यामुळे या भागात पाण्याचा धोका हा निश्चित मानला जात आहे. प्रत्येक पुरात आपल्या संसाराची नव्याने उभारणी करणे शक्य नसल्याने आता या पुरातून तोडगा काढण्यासाठी अनेक सोसायट्या विचार करत आहेत. जुन्या इमारतींचा पुनर्विकास हा सहज शक्य आहे. मात्र, त्या मोबदल्यात सदनिकाधारकांना त्याच इमारतीत घर देणे बंधनकारक असल्याने बांधकाम व्यावसायिकांना नफा मिळत नाही. त्यामुळे इमारतीच्या पुनर्विकासासाठी सहजासहजी बांधकाम व्यावसायिक पुढे येत नाही. मात्र, पुरात बाधित होणाऱ्या इमारतींची माहिती घेऊन त्या इमारतींना धोकादायक इमारतीप्रमाणे जाहीर करून त्यांना धोकादायक इमारतीच्या सवलती मिळाल्यास वाढीव चटईक्षेत्र निर्माण करता येऊ शकेल.जुन्या इमारतींबाबत सरकारी पातळीवर निर्णय झाल्यास पुरात बाधित झालेल्या ७० टक्के बदलापूरकरांना त्यातून सुटका मिळणार आहे. दुसरीकडे ज्या भागात चाळींचे बांधकाम झाले आहे, त्या बांधकामांची माहिती घेऊन ती जागा खाजगी मालकाची असल्यास त्यांचा एकत्रित विकास करून चाळधारकांना त्यात समाविष्ट करण्याबाबत विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे. यासंदर्भात निर्णय न झाल्यास बदलापूरकरांना आपले राहते घर विकण्याशिवाय पर्याय राहणार नाही.पुरात बाधित झालेल्या इमारतींपैकी ज्या इमारती जुन्या आहेत आणि ज्यांचा पुनर्विकास शक्य आहे, त्यांच्याबाबत काहीतरी ठोस निर्णय घेण्याबाबत सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. मात्र, यासंदर्भात निर्णय काय घेणार, हे सरकार ठरवेल. मात्र, तो निर्णय लवकरात लवकर कसा घेता येईल, यासाठी प्रयत्न केले जातील.- किसन कथोरे, आमदार

टॅग्स :badlapurबदलापूर