शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नदीकाठच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाची आता गरज, बदलापूरच्या रहिवाशांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 02:17 IST

धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करताना ज्या सवलती देण्यात येतात, त्याच सवलती बदलापूरमधील पुरात बाधित झालेल्या जुन्या इमारतींनाही मिळाव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

- पंकज पाटीलबदलापूर : धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करताना ज्या सवलती देण्यात येतात, त्याच सवलती बदलापूरमधील पुरात बाधित झालेल्या जुन्या इमारतींनाही मिळाव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जुन्या इमारती या तळमजल्यासह तीन ते चार मजली आहेत. त्यामुळे या तळमजला असलेल्या जुन्या इमारतींचा जलदगतीने पुनर्विकास करण्यासाठी धोकादायक इमारतींच्या धर्तीवर वाढीव चटईक्षेत्र मिळावे, अशी अपेक्षा रहिवासी करत आहेत. वाढीव चटईक्षेत्र मिळाल्यास त्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी बांधकाम व्यावसायिक पुढे सरसावतील, असे मत व्यक्त केले जात आहे.बदलापूरचा पूर ओसरल्यावर आता नागरिक घराची आवराआवर करत आपल्या कामाला लागले आहेत. पुरात जे नुकसान झाले, त्याची भरपाई होणे शक्य नसले तरी दरवर्षी पावसात अशीच अवस्था निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रत्येक कुटुंब धास्तावले आहे. पाऊस वाढला तर उल्हास नदीचे पाणी आपल्या घरात येणार, हे निश्चित झाल्याने आता त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर चर्चा सुरू झाली आहे. २००५ च्या महापुरात ज्या कुटुंबीयांना फटका सहन करावा लागला, त्याच कुटुंबीयांना यंदाच्या पुरातही फटका बसला. त्यामुळे अशा पुरात आपले संसार कसे उभे करायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाल्यावर जुन्या इमारती रस्त्यापासून खाली गेल्या आहेत. त्यामुळे या भागात पाण्याचा धोका हा निश्चित मानला जात आहे. प्रत्येक पुरात आपल्या संसाराची नव्याने उभारणी करणे शक्य नसल्याने आता या पुरातून तोडगा काढण्यासाठी अनेक सोसायट्या विचार करत आहेत. जुन्या इमारतींचा पुनर्विकास हा सहज शक्य आहे. मात्र, त्या मोबदल्यात सदनिकाधारकांना त्याच इमारतीत घर देणे बंधनकारक असल्याने बांधकाम व्यावसायिकांना नफा मिळत नाही. त्यामुळे इमारतीच्या पुनर्विकासासाठी सहजासहजी बांधकाम व्यावसायिक पुढे येत नाही. मात्र, पुरात बाधित होणाऱ्या इमारतींची माहिती घेऊन त्या इमारतींना धोकादायक इमारतीप्रमाणे जाहीर करून त्यांना धोकादायक इमारतीच्या सवलती मिळाल्यास वाढीव चटईक्षेत्र निर्माण करता येऊ शकेल.जुन्या इमारतींबाबत सरकारी पातळीवर निर्णय झाल्यास पुरात बाधित झालेल्या ७० टक्के बदलापूरकरांना त्यातून सुटका मिळणार आहे. दुसरीकडे ज्या भागात चाळींचे बांधकाम झाले आहे, त्या बांधकामांची माहिती घेऊन ती जागा खाजगी मालकाची असल्यास त्यांचा एकत्रित विकास करून चाळधारकांना त्यात समाविष्ट करण्याबाबत विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे. यासंदर्भात निर्णय न झाल्यास बदलापूरकरांना आपले राहते घर विकण्याशिवाय पर्याय राहणार नाही.पुरात बाधित झालेल्या इमारतींपैकी ज्या इमारती जुन्या आहेत आणि ज्यांचा पुनर्विकास शक्य आहे, त्यांच्याबाबत काहीतरी ठोस निर्णय घेण्याबाबत सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. मात्र, यासंदर्भात निर्णय काय घेणार, हे सरकार ठरवेल. मात्र, तो निर्णय लवकरात लवकर कसा घेता येईल, यासाठी प्रयत्न केले जातील.- किसन कथोरे, आमदार

टॅग्स :badlapurबदलापूर