शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मतदार ओळखपत्रप्रकरणी चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 01:33 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात १० हजार मतदार ओळखपत्रे फेकून दिल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला होता.

कल्याण : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात १० हजार मतदार ओळखपत्रे फेकून दिल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने कल्याण तहसीलदार व पोलिसांकडे केली आहे.

कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला आघाडीच्या कांचन कुलकर्णी, पदाधिकारी अमित म्हात्रे, योगेश कुलकर्णी, राहुल काटकर, अमोल पवार, लता जाधव, उज्ज्वला पाटील, शकील खान, पॉली जेकब यांनी शुक्रवारी तहसीलदार अमित सानप यांची भेट घेतली.पोटे म्हणाले की, बाजार समितीच्या आवारातील कचऱ्यात ही मतदार ओळखपत्रे आढळली. काही ओळखपत्रे जाळलेली होती.

२००७ मधील ही ओळखपत्रे असल्याने ती तेथे कोणी टाकली, जाळण्याचा उद्देश काय? मुस्लिम व दलित मतदारांची ही ओळखपत्रे असून ते काँग्रेसच्या बाजूने आहेत. त्यांनी मतदान करू नये, यासाठी व काँग्रेसचा पराभव करण्याच्या हेतूने हे काम कोणी केले, याची चौकशी करावी, दोषींवर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, नॅशनल बॅकवर्ड क्लास एज्युकेशनल अ‍ॅण्ड सोशल वेल्फेअर सोसायटीच्या प्रमुख रीना खांडेकर, संगीता भोईर, नीलिमा पाटील, रेखा ठोसर, संगीता चौधरी, भालचंद्र बर्वे यांनीही चौकशीची मागणी केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणElectionनिवडणूक