शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कसारा-कर्जत मार्गावर चार नव्या रेल्वे स्थानकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 21:01 IST

मध्य रेल्वेवरील कल्याण ते कसारा आणि कर्जत पट्ट्याचा वाढता विकास लक्षात घेऊन हजारो प्रवाशांच्या सोयीसाठी चार नवी रेल्वे स्थानके उभारण्याची आग्रही मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी केली आहे

डोंबिवली: मध्य रेल्वेवरील कल्याण ते कसारा आणि कर्जत पट्ट्याचा वाढता विकास लक्षात घेऊन हजारो प्रवाशांच्या सोयीसाठी चार नवी रेल्वे स्थानके उभारण्याची आग्रही मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी केली आहे. टिटवाळा ते खडवली स्थानकांदरम्यान गुरवली, अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान चिखलोली, आसनगाव ते आटगावदरम्यान सावरोली आणि बदलापूर ते वांगणी दरम्यान चामटोली रेल्वे स्थानके उभारण्याबाबत खासदार पाटील यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांना निवेदन दिले. नव्या रेल्वे स्थानकांबरोबरच टिटवाळा ते मुरबाड रेल्वेमागार्साठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणीही खासदार पाटील यांनी केली आहे.

गुरवली रेल्वे स्थानक सुरू झाल्यास सुमारे २५ गावातील प्रवाशांचा फायदा होईल. चिखलोली रेल्वे स्थानकांमुळे हजारो प्रवाशांची अंबरनाथ व बदलापूर स्थानकाकडे होणारी पायपीट टळेल, सावरोली रेल्वे स्थानकामुळे प्रसिद्ध मानस मंदिराबरोबर हजारो महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांची सोय होईल. वांगणी ते बदलापूर दरम्यानच्या ११ किलोमीटरमध्ये एकही स्थानक नसल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. या प्रवाशांसाठी चामटोली येथे स्थानक उभारल्यास हजारो प्रवाशांची सोय होईल, याकडे

खासदार पाटील यांनी रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले. या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी दिले आहे. टिटवाळा ते मुरबाड नव्या रेल्वेमागार्चे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, एमआरव्हीसीकडून सविस्तर आराखडा (डीपीआर) तयार केला जात आहे. त्यामुळे या मागार्साठी रेल्वे अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी खासदार पाटील यांनी केली आहे. या रेल्वेमागार्मुळे मुरबाडसह नगरकडे जाणा?्या हजारो प्रवाशांची सोय होणार आहे.

* गेल्या ४० वर्षांपासून आसनगाव ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान उंबरमाळी व तानशेत येथे लोकल थांबत आहेत. मात्र, या ठिकाणी रेल्वे स्टेशनला अधिकृत दर्जा नसल्यामुळे प्रवाशांना नाहक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या स्थानकांना अधिकृत दर्जा द्यावा, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली आहे.* होम प्लॅटफॉर्मच्या कामाला वेग देण्याची मागणीबदलापूर रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्म उभारण्यास रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, या कामाची निविदा प्रक्रिया संथपणे सुरू आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली. 

टॅग्स :thaneठाणे