शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रस्त्यावरील बेवारस वाहनांवर कारवाई करण्याची मागणी; ड्रायव्हिंग स्कूलची वाहनेही रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 00:51 IST

रिक्षा युनियनचा आक्षेप

डोंबिवली : रस्त्यावरील बेवारस वाहनांवर तातडीने कारवाई करावी आणि वाहतूककोंडीतून पश्चिमेकडील नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी रिक्षा-चालक-मालक युनियनचे उपाध्यक्ष शेखर जोशी यांनी केली. पश्चिमेला स्थानक परिसरात कशाही रिक्षा उभ्या असतात, याबद्दल जागरूक नागरिकांनी वाहतूक विभागाला तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेत युनियनने भंगार वाहनांवर कारवाई करावी, असे म्हटले आहे.

जोशी यांनी सांगितले की, स्थानक परिसरात असो अथवा पश्चिमेला पूर्वेकडे जेवढ्या मोठ्या प्रमाणात टोइंगची कारवाई वाहतूक विभाग करते, त्या तुलनेने पश्चिमेला होत नाही. त्यामुळे वाहनचालक ठिकठिकाणी सर्रास नियमांचे उल्लंघन करताना आढळतात. दुतर्फा वाहने उभी केली जात असल्यामुळे समस्येत भर पडते.

दीनदयाळ रस्त्यावरील सम्राट चौक परिसरात कोंडी असते. घनश्याम गुप्ते रस्ता, गोपी चौक, महात्मा फुले रस्त्यावर कोल्हापुरे चौकातही वाहतूककोंडीची मोठी समस्या आहे. सुभाष रस्ताही अरुंद असल्याने नवापाडा ते कुंभारखाणपाडा भागात कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक विभागाची इच्छाशक्ती नसल्याने समस्या जटिल बनत आहे. यासंदर्भात वाहतूक विभागाची कारवाई सुरूच असते, पण कोपर पूल बंद केल्याने पश्चिमेला कारवाई करण्यासाठी जाताना अडथळे येत असल्याचे सांगितले. मात्र, या अडथळ्यांनंतरही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. तरीही कुठे वाहने उभी करत असतील, तर कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.नियमांचे होतेय उल्लंघनशहरातील अनेक ड्रायव्हिंग स्कूलची वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत. पार्किंग सुविधा असेल तरच ड्रायव्हिंग स्कूलसाठी परवानगी देण्यात येते. मात्र, या नियमाचे उल्लंघन होत असल्यामुळे कोंडीच्या समस्येत भर पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.त्यासाठी वाहतूक विभाग असो की, आरटीओ अधिकारी असोत, या सर्वांनी तातडीने पाहणी करून समस्या मार्गी लावावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणे