शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

कचरा उचलण्यात कंत्राटदाराकडून दिरंगाई, नगरसेवकाची आयुक्तांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 01:23 IST

संडे अँकर । रोगराई पसरण्याची भीती : नगरसेवकाची आयुक्तांकडे तक्रार

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील चार प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे कंत्राट आर अ‍ॅण्ड बी कंपनीला दिले गेले आहे. मात्र, या कंपनीकडून वेळेवर कचरा उचलला जात नाही. त्यामुळे अनारोग्याची स्थिती निर्माण होण्याची भीती आहे. याप्रकरणी शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी कंत्राटदाराविरोधात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे तक्रार केली आहे.

महापालिका हद्दीतून दररोज ६५० टन घनकचरा गोळा होतो. केडीएमसीच्या १० प्रभाग क्षेत्रांपैकी चार प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे काम आर अ‍ॅण्ड बी कंपनीला दिले आहे. मात्र, या कंपनीकडून कचरा उचलण्याचे काम योग्य प्रकारे केले जात नाही. याप्रकरणी महासभेत लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती. कंत्राटदाराने कचरा वर्गीकरण करून तो गोळा करायचा आहे. मात्र, कंपनी सरसकट कचरा उचलून डम्पिंगवर नेत आहे, असे शेट्टी यांचे म्हणणे आहे.

कचरा वर्गीकरणाची सक्ती महापालिकेने नागरिकांना केली आहे. त्यामुळे महापालिकेने कचरा कुंड्या हटविल्या आहेत. असे असतानाही अनेक ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नाही. कचरा रस्त्याच्याकडेला टाकला जातो. तसेच जेथे कुंड्या होत्या तेथे कचरा पडलेला असतो. यापूर्वी सरसकट कचरा उचलून त्याचे वजन करून तो डम्पिंगवर टाकला जात होता. त्यामुळे कंत्रटदाराच्या कचरा गाडीचे वजन जास्त भरले जात होते. कचरा उचलण्याचे बिलही जास्तीचे पाठविले जात होते. आता कचरा पुरेसा साचल्यावरच जास्तीचे वजन भरण्यासाठी तो उशिराने उचलला जात आहे, असा आरोप शेट्टी यांनी केला आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे