शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

 कोरोनाच्या संसर्गामुळे दिड दिवसांच्या गणेश मूर्तींच्या संख्येत घट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 20:22 IST

मीरा भाईंदर महापालिकेने यंदा कोरोनाचा संसर्ग पाहता शहरातील विसर्जन स्थळे बंद करून ५२ मूर्ती स्वीकृती केंद्र उभारली.

मीरारोड - कोरोनाच्या संसर्गा मुळे यंदा दिड दिवसांच्या गणेश मुर्त्यांची संख्या खूपच कमी झाली आहे . त्यातच बहुतांश भाविकांनी मातीच्या पर्यावरणपूरक मुर्त्या आणत घरात वा परिसरातच कृत्रिम तलाव करून मुर्त्या विसर्जन केल्या आहेत . कारण गेल्या वर्षी मीरा भाईंदर मध्ये दिड दिवसांच्या विसर्जन केलेल्या घरगुती गणेश मुर्त्यांची संख्या ९ हजार ३८१ इतकी होती . यंदा मात्र दीड दिवसांच्या ३ हजार ८७६ गणेश मूर्तीच विसर्जना साठी महापालिकेच्या मूर्ती स्वीकृती केंद्र व विसर्जन ठिकाणी आल्या. 

मीरा भाईंदर महापालिकेने यंदा कोरोनाचा संसर्ग पाहता शहरातील विसर्जन स्थळे बंद करून ५२ मूर्ती स्वीकृती केंद्र उभारली. मिरवणुका आदी सर्व बंद केल्याने यंदा कुठेही रस्ते जाम झालेले नव्हते . बहुतांश भाविकांनी जागरूकता दाखवत मातीच्या लहान मुर्त्या आणल्या . विसर्जन देखील घरातच करण्याचे प्रमाण यंदा वाढले . महत्वाचे म्हणजे अनेक मंडळ , शिवसेना आदींच्या वतीने स्वतःच पुढाकार घेऊन कृत्रिम तलाव निर्माण केले होते . त्यामुळे अनेकांनी आपल्या परिसरातील या कृत्रिम तलावांना पसंती दिली.

गेल्या वर्षी मीरा भाईंदर मध्ये दिड दिवसाच्या  ९ हजार ३८१ घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते . यंदा मात्र शहरात पालिका विसर्जन स्थळी  दीड दिवसांच्या केवळ ३ हजार ८७६ गणेश मूर्तीच आल्याची माहिती पालिकेने दिली आहे . 

सार्वजनिक मंडळांनी देखील कोरोना संसर्गा मुळे जबाबदारीची भूमिका घेतली आहे . गेल्या वर्षी दिड दिवसांच्या २९ सार्वजनिक गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले होते . यंदा मात्र १६४ सार्वजनिक गणेश मुर्त्यांचे विसर्जन झालेले आहे . यातून अनेक सार्वजनिक मंडळांनी देखील दिड दिवसांचाच गणपती ठेवला होता .  मंडळांनी लहान मंडप , कमी आकाराची मूर्ती आणि साधा देखावा अशी सामंजस्याची भूमिका घेतली .  काही मंडळांनी तर परिसरातच कृत्रिम तलाव उभारून त्यात मूर्ती विसर्जन केली .  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरGanesh Mahotsavगणेशोत्सव