शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

येत्या २० आॅक्टोबर रोजी होणार स्थायी समितीचा फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 15:58 IST

येत्या २० आॅक्टोबर रोजी ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचा फैसला होणार आहे. चुकीच्या पध्दतीने स्थायी समितीचे गठण करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी केला आहे.

ठळक मुद्देस्थायी समिती पुन्हा एकदा अडचणीतमंजुर केलेल्या प्रस्तावांचे काय होणार

ठाणे - सुमारे दिड वर्षाच्या प्रतिक्षेनंतर स्थायी समिती गठीत झाली आहे. परंतु ज्या पध्दतीने याची निवडणुक प्रक्रिया घेण्यात आली ती बेकायदा आणि चुकीची असल्याचा आरोप करीत कॉंग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार येत्या २० आॅक्टोबर रोजी स्थायी समितीचा फैसला होणार आहे. त्यामुळे निकाल काय येणार हे महत्वाचे ठरणार आहे.                     दिड वर्षाच्या प्रर्दीघ प्रतिक्षेनंतर १६ मे रोजी ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणुक पार पडली. परंतु या निवडणुक प्रक्रियेवरच सुरवातीला राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्षेप घेतला होता. स्थायीची सुनावणी न्यायालयात प्रलंबित असतांना ही निवड करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. कोकण विभागीय आयुक्तांनी जे तौलानीक संख्याबळ दिले आहे. त्यानुसार आधी सदस्यांची निवड करावी मगच सभापतीची निवडणुक घ्यावी असेही त्यांनी सांगितले होते. मागील वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या महासभेत पिठासीन अधिकाऱ्यांनी स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर केली होती. यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने तौलानीक संख्याबळानुसार पाच नावे दिली होती. परंतु त्यांचे एक नाव कापण्यात आले होते. एकूणच ही निवड प्रक्रिया चुकीची असून या विरोधात पुन्हा न्यायालयात धाव घेतली जाईल असा इशारा राष्ट्रवादीने दिला होता.दरम्यान या विरोधात कॉंग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आता येत्या २० आॅक्टोबर रोजी ठाणे न्यायालयात याची अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. त्यामुळे स्थायी समिती पुन्हा एकदा बरखास्त होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या प्रकरणामुळे शिवसेना सुध्दा अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.स्थायी समिती गठीत झाल्यानंतर या समितीच्या माध्यमातून सुरु असलेल्या चुकीच्या कामांबाबतही चव्हाण यांनी प्रधान सचिवांना पत्र दिले असून मंजुर झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcongressकाँग्रेस