शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

येत्या २० आॅक्टोबर रोजी होणार स्थायी समितीचा फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 15:58 IST

येत्या २० आॅक्टोबर रोजी ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचा फैसला होणार आहे. चुकीच्या पध्दतीने स्थायी समितीचे गठण करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी केला आहे.

ठळक मुद्देस्थायी समिती पुन्हा एकदा अडचणीतमंजुर केलेल्या प्रस्तावांचे काय होणार

ठाणे - सुमारे दिड वर्षाच्या प्रतिक्षेनंतर स्थायी समिती गठीत झाली आहे. परंतु ज्या पध्दतीने याची निवडणुक प्रक्रिया घेण्यात आली ती बेकायदा आणि चुकीची असल्याचा आरोप करीत कॉंग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार येत्या २० आॅक्टोबर रोजी स्थायी समितीचा फैसला होणार आहे. त्यामुळे निकाल काय येणार हे महत्वाचे ठरणार आहे.                     दिड वर्षाच्या प्रर्दीघ प्रतिक्षेनंतर १६ मे रोजी ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणुक पार पडली. परंतु या निवडणुक प्रक्रियेवरच सुरवातीला राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्षेप घेतला होता. स्थायीची सुनावणी न्यायालयात प्रलंबित असतांना ही निवड करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. कोकण विभागीय आयुक्तांनी जे तौलानीक संख्याबळ दिले आहे. त्यानुसार आधी सदस्यांची निवड करावी मगच सभापतीची निवडणुक घ्यावी असेही त्यांनी सांगितले होते. मागील वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या महासभेत पिठासीन अधिकाऱ्यांनी स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर केली होती. यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने तौलानीक संख्याबळानुसार पाच नावे दिली होती. परंतु त्यांचे एक नाव कापण्यात आले होते. एकूणच ही निवड प्रक्रिया चुकीची असून या विरोधात पुन्हा न्यायालयात धाव घेतली जाईल असा इशारा राष्ट्रवादीने दिला होता.दरम्यान या विरोधात कॉंग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आता येत्या २० आॅक्टोबर रोजी ठाणे न्यायालयात याची अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. त्यामुळे स्थायी समिती पुन्हा एकदा बरखास्त होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या प्रकरणामुळे शिवसेना सुध्दा अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.स्थायी समिती गठीत झाल्यानंतर या समितीच्या माध्यमातून सुरु असलेल्या चुकीच्या कामांबाबतही चव्हाण यांनी प्रधान सचिवांना पत्र दिले असून मंजुर झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcongressकाँग्रेस