शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

येत्या २० आॅक्टोबर रोजी होणार स्थायी समितीचा फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 15:58 IST

येत्या २० आॅक्टोबर रोजी ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचा फैसला होणार आहे. चुकीच्या पध्दतीने स्थायी समितीचे गठण करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी केला आहे.

ठळक मुद्देस्थायी समिती पुन्हा एकदा अडचणीतमंजुर केलेल्या प्रस्तावांचे काय होणार

ठाणे - सुमारे दिड वर्षाच्या प्रतिक्षेनंतर स्थायी समिती गठीत झाली आहे. परंतु ज्या पध्दतीने याची निवडणुक प्रक्रिया घेण्यात आली ती बेकायदा आणि चुकीची असल्याचा आरोप करीत कॉंग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार येत्या २० आॅक्टोबर रोजी स्थायी समितीचा फैसला होणार आहे. त्यामुळे निकाल काय येणार हे महत्वाचे ठरणार आहे.                     दिड वर्षाच्या प्रर्दीघ प्रतिक्षेनंतर १६ मे रोजी ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणुक पार पडली. परंतु या निवडणुक प्रक्रियेवरच सुरवातीला राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्षेप घेतला होता. स्थायीची सुनावणी न्यायालयात प्रलंबित असतांना ही निवड करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. कोकण विभागीय आयुक्तांनी जे तौलानीक संख्याबळ दिले आहे. त्यानुसार आधी सदस्यांची निवड करावी मगच सभापतीची निवडणुक घ्यावी असेही त्यांनी सांगितले होते. मागील वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या महासभेत पिठासीन अधिकाऱ्यांनी स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर केली होती. यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने तौलानीक संख्याबळानुसार पाच नावे दिली होती. परंतु त्यांचे एक नाव कापण्यात आले होते. एकूणच ही निवड प्रक्रिया चुकीची असून या विरोधात पुन्हा न्यायालयात धाव घेतली जाईल असा इशारा राष्ट्रवादीने दिला होता.दरम्यान या विरोधात कॉंग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आता येत्या २० आॅक्टोबर रोजी ठाणे न्यायालयात याची अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. त्यामुळे स्थायी समिती पुन्हा एकदा बरखास्त होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या प्रकरणामुळे शिवसेना सुध्दा अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.स्थायी समिती गठीत झाल्यानंतर या समितीच्या माध्यमातून सुरु असलेल्या चुकीच्या कामांबाबतही चव्हाण यांनी प्रधान सचिवांना पत्र दिले असून मंजुर झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcongressकाँग्रेस