शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दंडाचा फैसला २ जुलैला

By admin | Updated: May 12, 2016 02:12 IST

कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर औद्योगिक पट्ट्यातील कारखान्यांतून उल्हास नदी, वालधुनी नदी आणि कल्याण खाडीचे होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी असे प्रदूषण करणाऱ्यांना राष्ट्रीय हरित

मुरलीधर भवार, कल्याणकल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर औद्योगिक पट्ट्यातील कारखान्यांतून उल्हास नदी, वालधुनी नदी आणि कल्याण खाडीचे होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी असे प्रदूषण करणाऱ्यांना राष्ट्रीय हरित लवादाने १०० कोटींचा दंड ठोठावला होता. मात्र, आजवर केलेल्या उपाययोजना सांगून या दंडाबाबत काही पालिकांनी सवलत मागितली. ती बाजू ऐकल्यानंतर आता हा दंड भरण्याचा फैसला २ जुलैला होईल. रासायनिक कारखान्यांतून प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जाते. जेथे प्रक्रिया होते, त्यातही निकष पाळले जात नसल्याच्या मुद्दयावर ‘वनशक्ती’ पर्यावरण संस्थेने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना लवादाने कल्याण-डोंबिवली महापालिकेला १५ कोटी, उल्हासनगरला १५ कोटी, डोंबिवली सांडपाणी प्रक्रिया केंद्राला ३० कोटी, अंबरनाथ सांडपाणी प्रक्रिया केंद्राला १५ कोटी, अंबरनाथ-बदलापूर नगरपालिकांना प्रत्येकी पाच कोटी आणि औद्योगिक विकास महामंडळाला १० कोटी रुपये असा १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. हा दंड संबंधितांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे सहा महिन्यांच्या आत भरणे अपेक्षित होते. त्यासाठी त्यांनी एस्क्रो अकाउंट काढणे क्रमप्राप्त होते. डोंबिवली सांडपाणी प्रक्रिया केंद्राने दंड भरण्यास नकार देत नदीचे प्रदूषण त्यांच्यामुळे होत नसल्याचा मुद्दा उच्च न्यायालयात उपस्थित केला. त्यामुळे न्यायालयाने त्याला स्थगिती दिली होती. लवादाच्या निकालावर उच्च न्यायालयात दाद मागता येत नाही. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागते. त्यासाठी ‘वनशक्ती’ने विशेष याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने दंडवसुलीवर घातलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली आणि दंड भरण्याचा लवादाचा निर्णय कायम ठेवला. पुन्हा महापालिकांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली. त्यावर, बुधवारी सुनावणी झाली. या वेळी सर्वेाच्च न्यायालयाने प्रदूषण रोखण्यासंदर्भात केलेल्या उपायांची माहिती घेतली आणि दंड भरण्यास तात्पुरती स्थगिती देत या विशेष याचिकेवरील सुनावणी २ जुलैला होईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे १०० कोटी रुपये भरायचे की नाही, याचा फैसला २ जुलैला होणार असल्याची माहिती ‘वनशक्ती’चे कार्यकर्ते अश्वीन अघोर यांनी दिली. दंडाची रक्कम उल्हास नदी, वालधुनी नदी, कल्याण खाडीचे प्रदूषण रोखण्यावर खर्च केली जाणार आहे.