शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

दंडाचा फैसला २ जुलैला

By admin | Updated: May 12, 2016 02:12 IST

कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर औद्योगिक पट्ट्यातील कारखान्यांतून उल्हास नदी, वालधुनी नदी आणि कल्याण खाडीचे होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी असे प्रदूषण करणाऱ्यांना राष्ट्रीय हरित

मुरलीधर भवार, कल्याणकल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर औद्योगिक पट्ट्यातील कारखान्यांतून उल्हास नदी, वालधुनी नदी आणि कल्याण खाडीचे होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी असे प्रदूषण करणाऱ्यांना राष्ट्रीय हरित लवादाने १०० कोटींचा दंड ठोठावला होता. मात्र, आजवर केलेल्या उपाययोजना सांगून या दंडाबाबत काही पालिकांनी सवलत मागितली. ती बाजू ऐकल्यानंतर आता हा दंड भरण्याचा फैसला २ जुलैला होईल. रासायनिक कारखान्यांतून प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जाते. जेथे प्रक्रिया होते, त्यातही निकष पाळले जात नसल्याच्या मुद्दयावर ‘वनशक्ती’ पर्यावरण संस्थेने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना लवादाने कल्याण-डोंबिवली महापालिकेला १५ कोटी, उल्हासनगरला १५ कोटी, डोंबिवली सांडपाणी प्रक्रिया केंद्राला ३० कोटी, अंबरनाथ सांडपाणी प्रक्रिया केंद्राला १५ कोटी, अंबरनाथ-बदलापूर नगरपालिकांना प्रत्येकी पाच कोटी आणि औद्योगिक विकास महामंडळाला १० कोटी रुपये असा १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. हा दंड संबंधितांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे सहा महिन्यांच्या आत भरणे अपेक्षित होते. त्यासाठी त्यांनी एस्क्रो अकाउंट काढणे क्रमप्राप्त होते. डोंबिवली सांडपाणी प्रक्रिया केंद्राने दंड भरण्यास नकार देत नदीचे प्रदूषण त्यांच्यामुळे होत नसल्याचा मुद्दा उच्च न्यायालयात उपस्थित केला. त्यामुळे न्यायालयाने त्याला स्थगिती दिली होती. लवादाच्या निकालावर उच्च न्यायालयात दाद मागता येत नाही. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागते. त्यासाठी ‘वनशक्ती’ने विशेष याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने दंडवसुलीवर घातलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली आणि दंड भरण्याचा लवादाचा निर्णय कायम ठेवला. पुन्हा महापालिकांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली. त्यावर, बुधवारी सुनावणी झाली. या वेळी सर्वेाच्च न्यायालयाने प्रदूषण रोखण्यासंदर्भात केलेल्या उपायांची माहिती घेतली आणि दंड भरण्यास तात्पुरती स्थगिती देत या विशेष याचिकेवरील सुनावणी २ जुलैला होईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे १०० कोटी रुपये भरायचे की नाही, याचा फैसला २ जुलैला होणार असल्याची माहिती ‘वनशक्ती’चे कार्यकर्ते अश्वीन अघोर यांनी दिली. दंडाची रक्कम उल्हास नदी, वालधुनी नदी, कल्याण खाडीचे प्रदूषण रोखण्यावर खर्च केली जाणार आहे.