शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सॉरच्या बैठकीनंतरच निर्णय

By admin | Updated: February 9, 2016 02:16 IST

दलित चळवळ आणि आंबेडकरी विचारधारेवर आधारित ‘जयभीम जयभारत’ या नाटकाला रंगभूमी सेन्सॉर बोर्डाने तात्पुरती मान्यता दिल्याने या नाटकाचा पहिला प्रयोग रविवारी कल्याणच्या

- मुरलीधर भवार,  कल्याणदलित चळवळ आणि आंबेडकरी विचारधारेवर आधारित ‘जयभीम जयभारत’ या नाटकाला रंगभूमी सेन्सॉर बोर्डाने तात्पुरती मान्यता दिल्याने या नाटकाचा पहिला प्रयोग रविवारी कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात पार पडला असला, तरी त्याचे प्रयोग करण्यास मान्यता द्यायची की नाही, याचा निर्णय सेन्सॉर बोर्डाच्या बैठकीत घेतला जाणार आहे. पहिला प्रयोग पाहण्यासाठी रंगभूमी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांसह काही सदस्य उपस्थित होते. सेन्सॉरने नाटकात काही कट सुचविले होते. पण, ते तसेच ठेवून नाटककाराने प्रयोग सादर केला. मात्र, या नाटकाचे पुढील प्रयोग करायचे की नाही़?, त्याला मान्यता द्यायची की नाही?, याविषयीचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे सांगून त्याविषयी तूर्तास काही भाष्य करणे सेन्सॉरच्या प्रतिनिधींनी टाळले. प्रयोग चांगला झाला, एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. जनार्दन जाधव यांनी लिहीलेल्या नाटकाचे रतन बनसोडे त्याचे निर्माते आहेत, तर सूत्रधार सुबोध मोरे आहेत. या नाटकात आंबेडकरांचा अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संवाद साधतो, अशी रचना असून हा संवाद काल्पनिक आहे. सेन्सॉर बोर्डाकडे नाटकाच्या प्रयोगाची मान्यता घेण्यासाठी आम्ही अर्ज केला, तेव्हा त्यांनी संहितेत १९ कट सुचविले. नाटकातील रमाबाई आंबेडकर हत्याकांड, खैरलांजी हत्याकांड हे शब्द वगळण्यात यावेत. जातीवाद, हिंदुत्व, नामदेव ढसाळ यांचा गांडू बगीचा, कुत्रा असे शब्द काढण्याची सूचना केली. ‘कुत्र्या’ऐवजी ‘श्वान’ हा शब्द टाकावा. जातीयवादाऐवजी दलितविरोधी, ‘हिंदुत्वा’ऐवजी ‘सत्ता’ असे शब्द वापरण्याची सूचना सेन्सॉरच्या सदस्यांनी केली, अशी माहिती नाटकाचे सूत्रधार मोरे यांनी दिली. नाटकाच्या या प्रयोगाला सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष अरुण नलावडे, सदस्य अशोक समेळ, गिरीश दाबके, प्रसाद ठोसर उपस्थित होते. या नाटकात १९ बदल सुचविणारे लेखी पत्र नाटकाच्या लेखकांना दिले होते. त्यांनी कट मान्य करतो, असे सांगितल्यावर त्यांना प्रयोगाच्या सादरीकरणाची तात्पुरती मान्यता दिली. त्याचा प्रयोग आम्ही पाहिला आहे. पुढे काय निर्णय घ्यायचा, हे ठरविण्यासाठी १८ फेब्रुवारीला बोर्डाची बैठक होईल, असे प्रतिनिधींनी सांगितले. प्रयोगाला उपस्थित असलेले भाकपाचे नेते उदय चौधरी म्हणाले, नाटकात सेन्सॉर करण्यासारखे काहीच नाही. ही एकप्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी असल्याची चर्चा सध्या होत आहे.ही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबीयापूर्वी ‘जयभीम कॉम्रेड’ हा आनंद पटवर्धन यांचा चित्रपट येऊन गेला आहे. प्रज्ञा लोखंडे यांचे ‘धादांत खैरलांजी’ हे नाटक आले आहे. खैरलांजीवर चित्रपट येऊन गेला आहे. ढसाळांच्या गांडू बगीचावर नाटक आलेले आहे. या सगळ्या कलाकृतींना सेन्सॉरचा कोणताही अडसर आला नाही. विवेकानंदांच्या जीवनावर ‘संन्यस्तखड््ग’ हे नाटक आमदार संजय केळकर करतात. हे सगळे चालते. पण, आता सेन्सॉर बोर्डावरील मंडळीच हिंदुत्ववादी असल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप मोरे यांनी केला.