शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

फुल मार्केटच्या पुनर्विकासावरून पुन्हा वादंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 00:58 IST

बाजार समितीने तोडले ओटेधारकांचे ओटे, केडीएमसीची स्थगिती न्यायालयाने उठवली

कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फुल मार्केटच्या पुनर्विकासाला केडीएमसीने दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठविल्याचे सांगत शनिवारी बाजार समितीने ओटेधारकांचे ओटे तोडण्याची कारवाई सुरू केली. परंतु, तेथील काही ओटेधारकांनी आक्षेप घेत ही कारवाई हुकूमशाही पद्धतीची असल्याचा आरोप केला. तसेच या कारवाईविरोधात कल्याण सत्र न्यायालयात दाद मागण्याचा पवित्रा घेतला गेल्याने फुल मार्केटच्या पुनर्विकासावरून पुन्हा वादंग उभे राहिले आहे.

बाजार समितीच्या आवारातील एक एकराच्या भूखंडावर फुल मार्केट आहे. ही जागा केडीएमसीची आहे, परंतु जागेचा सातबारा बाजार समितीच्या नावावर आहे. याठिकाणी बाजार समितीबरोबरच केडीएमसीच्या हद्दीतील फुलविक्रेत्यांना ओटे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दरम्यान, फुल मार्केटचा पुनर्विकास करण्यासंदर्भात बाजार समितीने निर्णय घेतला होता. केडीएमसीने यासंदर्भात ठराव करून बाजार समितीला परवानगी दिली होती. तत्पूर्वी फुल मार्केटला दिलेल्या जागेचा सातबारा केडीएमसीच्या नावावर करण्यास सांगण्यात आले होते. परंतु, तसे न केल्याने जोपर्यंत सातबारा नावावर होत नाही, तोपर्यंत पुनर्विकासाचे काम सुरू करू नये, असे सांगत दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त पी. वेलरासू यांनी पुनर्विकासाच्या बांधकामाला स्थगिती दिली होती.

आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात बाजार समितीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने ही स्थगिती उठविल्यानंतर शनिवारी पुनर्विकासासाठी ज्या ओटेधारकांनी संमती दिली आहे, त्यांचे ओटे तोडण्यास सुरुवात केली. या कारवाईला विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता कारवाईच्या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यात बाजार समितीच्या वतीने ६५ ओटे तोडण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी काही ओटेधारकांनी विरोध केला. खोट्या सह्या घेऊन आमच्यावर अन्याय केल्याचा आरोप संबंधितांनी केला आहे. परंतु, ही कारवाई योग्य असून उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश उठविताना पुनर्विकासाला मान्यता दिल्याचे स्पष्टीकरण बाजार समितीने दिले आहे. दरम्यान, या कारवाईवरून पुन्हा वादंग निर्माण झाले आहे.

कारवाईला आक्षेप

केडीएमसीतील शिवसेनेचे गटनेते दशरथ घाडीगावकर यांनी बाजार समितीच्या कारवाईला तीव्र आक्षेप घेतला आहे. उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश उठविल्यावर के डीएमसीच्या ओटेधारकांनी कल्याण न्यायालयात धाव घेतली आहे. यात न्यायालयाने केडीएमसी आणि बाजार समितीने सामंजस्य करार करून पुढील कारवाई करावी, असे आदेश दिल्याची माहिती घाडीगावकर यांनी दिली. याबाबत कोणतीही कृती न करता केलेली कारवाई न्यायालयाचा अवमान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

जागा महापालिकेच्या मालकीची आहे, त्यामुळे तिच्या परवानगीशिवाय कारवाई केलीच कशी? असाही सवाल त्यांनी केला आहे. तर, बाजार समितीला जे ओटे उपलब्ध करून दिले आहेत, त्यांचे भाडे ही अद्याप महापालिकेला भरलेले नसल्याकडेही घाडीगावकर यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMarketबाजार