शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

ठाणे : 'त्या' रुग्णांचा मृत्यू ऑक्सीजनअभावी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 15:48 IST

प्रकृती चिंताजनक असल्यानेच मृत्यू, चौकशी समितीचा अहवाल सादर

ठळक मुद्देप्रकृती चिंताजनक असल्यानेच मृत्यू, चौकशी समितीचा अहवाल सादरयापूर्वी नेमण्यात आली होती एक समिती

ठाणे : येथील वर्तक नगर भागात असलेल्या वेंदात हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन अभावी चार जणांचा मृत्यु झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांना केला होता. त्यानंतर  ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहा जणांची चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीचा अहवाल आता समोर आला असून त्या चार रुग्णांचा मृत्यू ऑक्सीजन अभावी झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यानेच रुग्णांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.वर्तक नगर भागातील वेदांत हॉस्पीटलमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. परंतु या चौघांचे मृत्यु ऑक्सीजन अभावीच झाला असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. त्यामुळे रुग्णालय प्रशासन चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते. या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पाहणी करुन या प्रकरणाच सहा जणांची चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार भिवंडी महापालिकेचे आयुक्त पंकज आशिया हे चौकशी समितीचे अध्यक्ष असून, शिवाजी पाटील (निवासी उपजिल्हाधिकारी), डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणो), संदीप माळवी (उपायुक्त - ठामपा), डॉ. वैजयंती देवगीकर (वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठामपा), मंदार महाजर (बायोमेडीकल इंजिनिअर - ठामपा) हे सदस्य म्हणून असणार आहेत. या समितीने सोमवारी सांयकाळी उशिरा रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानुसार येथे एकूण किती मृत्यू झाले, मृतांची नावे, वय, कोविड आजाराबाबत व रुग्णाच्या आरोग्य विषयक स्थितीची इतर आवश्यक माहिती गोळा करण्यात आली. तसेच मृत्यू एकाच वेळेस झाला की वेगवेगळ्या वेळेत झाला याची माहितीही घेतली गेली.  मृत्यूंची कारणं आणि मृत्यूची वेळ या रुग्णांचा मृत्यु ऑक्सीजन पुरवठ्याशी काही संबंध आहे का?, याची देखील सविस्तर माहिती घेण्यात आली. विशेष म्हणजे या ठिकाणी ऑक्सीजनवर असलेल्या इतर रुग्णांशी देखील या समितीमधील सदस्यांनी चर्चा केल्याची माहिती देखील समोर येत आहे.त्यानुसार या चारही रुग्णांचा मृत्यू ऑक्सीजन अभावी झाला नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच या रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यानेच त्यांचा मृत्यु झाला असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. तसेच, प्रत्येक रुग्णाचा मृत्यूची वेळ ही वेगवेगळी असल्याचेही पाहणीत समोर आले आहे. त्यातही येथे उपचारार्थ अन्य रुग्ण असून ऑक्सीजन नसते तर त्यांना देखील याचा फटका बसला पाहिजे होता, परंतु तसे काहीच निदर्शनास आलेले नाही. त्यामुळेच त्या चार रुग्णांचा मृत्यू हा ऑक्सीजन अभावी झाला नसल्याचे या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.हलगर्जीपणा नाहीया रुग्णालयातील चार जणांचा मृत्यू हा ऑक्सीजन अभावी झालेला नाही, तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारची वैद्यकीय हलगर्जीपणा देखील झालेला नाही. ज्या रुग्णांचे मृत्यु झाले, त्यांची प्रकृत्ती खालावली असल्यानेच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु रुग्णालयाने ज्या ज्या वेळेत रुग्णांचे मृत्यू झाले होते, त्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना देणे अपेक्षित होते. तसे न केल्याने काहीसा गोंधळ झाल्याचेही दिसून आले. त्यामुळे यापुढे कोविड रुग्णालयांनी रुग्णाची प्रत्येक माहिती वेळोवेळी रुग्णांच्या नातेवाईकांना देणो बंधनकारक करण्यात आले आहे.राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे 

टॅग्स :thaneठाणेOxygen Cylinderऑक्सिजनcorona virusकोरोना वायरस बातम्याtmcठाणे महापालिका