शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उल्हासनगरातील धोबीघाट परिसरात दरड कोसळली; ३ घरे जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 17:05 IST

Ulhasnagar : उल्हासनगर कॅम्प नं-१ धोबीघाट परिसरातील उंच टेकडीवर असंख्य घरे बांधण्यात आली असून संततधार पावसाने टेकडीची दरड कोसळत आहे. जुलै महिन्यात अशीच दरड कोसळून अनेक घरांना तडे गेले होते.

- सदानंद नाईक

उल्हासनगर : कॅम्प नं-१ धोबीघाट टेकडी परिसरात संततधार पावसाने दरड कोसळून तीन पेक्षा जास्त घरे जमीनदोस्त झाली. तर अनेक घरांना धोका निर्माण झाला. स्थानिक नगरसेविका ज्योती गायकवाड यांनी उपायुक्त अशोक नाईकवाडे, शहर अभियंता महेश शितलानी यांची भेट घेऊन सरंक्षण भिंत बांधण्याची मागणी केली.

उल्हासनगर कॅम्प नं-१ धोबीघाट परिसरातील उंच टेकडीवर असंख्य घरे बांधण्यात आली असून संततधार पावसाने टेकडीची दरड कोसळत आहे. जुलै महिन्यात अशीच दरड कोसळून अनेक घरांना तडे गेले होते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी अनेक घरांना नोटिसा देऊन घरे खाली करण्यास भाग पडल्याने, यावेळी जिवीतहानी झाली नाही. 

बुधवारी सकाळी संततधार पावसाने पुन्हा दरड कोसळून ३ पेक्षा जास्त घरे जमीनदोस्त झाली. तर अनेक घरांना धोका निर्माण झाल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी माहिती दिली. भविष्यात मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून मनसेचे शहाराध्यक्ष बंडू देशमुख, मेनुद्दीन शेख आदींनी टेकडीला संरक्षण भिंत बांधून दुर्घटनाग्रस्त झालेल्या नागरिकांना पर्यायी जागा देण्याची मागणी होत आहे. 

महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे, शहर अभियंता महेश शितलानी, शाखा अभियंता तरुण सेवकांनी यांनी यासाठी काय उपाययोजना करता येईल. याबाबत चर्चा करून सरंक्षण भिंत बांधण्याचे संकेत दिले. तर स्थानिक नगरसेविका ज्योती गायकवाड, माजी नगरसेवक व शिवसेना उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड, मनसेचे शहर संघटक मैनिद्दीन शेख आदींनी सरंक्षण भिंतीसाठी कमीतकमी २५ लाखाचा निधी देण्याची मागणी महापालिकेकडे केली. दरड कोसळल्याने टेकडीवरील नागरिक भितिच्या छायेत आहेत. घरे कोसळून बेघर झालेल्या नागरिकांनी पर्यायी घरे देण्याची मागणी केली असून महापालिकेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर