शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

अनधिकृत जाहिरातफलकांमुळे प्रवेशद्वारांच्या कमानी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 01:15 IST

शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या धोकादायक झालेल्या कमानी तोडण्यासाठी अखेर एका कंत्राटदाराने तयारी दर्शविली आहे.

ठाणे : शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या धोकादायक झालेल्या कमानी तोडण्यासाठी अखेर एका कंत्राटदाराने तयारी दर्शविली आहे. त्यानुसार, यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर लगेच त्या तोडण्याच्या कामाला सुरु वात करणार असल्याची माहिती पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली.शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या कमानींवर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे जाहिरातफलकांमुळे धोकादायक झाल्याने त्या तोडण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. या कमानींमध्ये मुलुंड-ठाण्यामधील मॉडेला चेकनाका, आनंदनगर आणि विटावा येथील प्रवेशद्वारांच्या कमानी तोडण्यात येणार आहेत. त्या तोडण्यासाठी कंत्राटदारांच्या नियुक्तीचे काम महापालिकेच्या वतीने सुरू होते. मात्र, निविदेला तीन वेळा मुदतवाढ देऊनही कोणीही कंत्राटदार हे काम करायला तयार नव्हते. अखेर, पाच महिन्यांनी एक कंत्राटदार ते करण्यासाठी तयार झाला असून महासभेत प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच या तोडकामाला सुरु वात होणार आहे. या कमानी धोकादायक झाल्या असून काही ठिकाणांचे प्लास्टर पडत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्याठिकाणी संरक्षक जाळ्याही बसविल्या आहेत. परंतु, कमानीच्या साहित्याचे वजन अधिक असल्याने ते महामार्गावरील भरधाव गाड्यांवर पडण्याची शक्यता आहे. तात्पुरती व्यवस्था केली असली, तरी त्यांचा धोका कायम आहे. त्यामुळे त्या तत्काळ तोडण्याची मागणी स्थानिकांकडून केली आहे.आॅगस्ट २०१८ मध्ये एलबीएस मार्गावरील मुलुंड-ठाण्यातील मॉडेला चेकनाका परिसरातील कमानीचा काही भाग कोसळण्यास सुरु वात झाली होती. या कमानीखालून जाणाऱ्या एका गाडीवर प्लास्टरचा काही भाग पडला होता.यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली, तरी यानिमित्ताने धोकादायक कमानींचा प्रश्न ऐरणीवर आला होता. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन त्यांची दुरु स्ती करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. मात्र, प्रशासनाने या कमानींची पाहणी करून त्या तोडण्याचे निश्चित केले होते.>या कमानी तोडल्यानंतर त्या पुन्हा बांधायच्या की नाही, याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. महामार्गावरील वाहनचालकांना या धोकादायक कमानींपासून नुकसान होऊ नये, यासाठी सर्वात आधी त्या हटवण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जो कंत्राटदार कमानी तोडेल, त्याने पालिकेला काही मोबदला द्यायचा असून कमानीचे मटेरियल विकून त्याचा फायदा संबंधित ठेकेदाराला मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.