शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

उड्डाणपुलाच्या उतारावरील नाल्याची उघडी जाळी वाहतुकीसाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 23:10 IST

अंबरनाथमध्ये अपघाताची शक्यता; नाल्यावरील लोखंडी पट्टीचे काम निकृष्ट

- पंकज पाटील बदलापूर : अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या उतारावर तयार केलेला नाला आता वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. उड्डाणपुलापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केल्यावर उड्डाणपूल आणि रस्ता यांच्या मध्यभागी हा नाला बांधण्यात आला आहे. या नाल्यावरील लोखंडी पट्टीचे काम निकृष्ट झाल्याने आता सर्व पट्टी निघाली आहे. अनेक ठिकाणी वाहनांचे चाक या पट्टीमध्ये अडकत आहे. या नाल्याच्या कामाला वर्षही उलटत नाही, तोच नाला धोकादायक झाल्याने आता नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.हुतात्मा चौकातील रस्त्याचे काँक्रिटीकरण केल्यावर तो रस्ता उड्डाणपूल रस्त्याला जोडण्यात आला. पालिकेच्या अभियंत्यांच्या चुकीमुळे रस्त्याचा उतार जास्त करण्यात आला. त्यामुळे उड्डाणपूल आणि रस्ता यांच्यात खोल खड्डा निर्माण झाला. त्यातच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी नाला तयार करण्यात आला. सर्वाधिक वाहतूक ज्या रस्त्यावर सातत्याने होत असते, त्याच रस्त्यावर नाला तयार करताना सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले. आरसीसी नाला तयार करून त्यावर लोखंडी जाळी बसवण्यात आली. ती जाळी निकृष्ट असल्याने आता त्या नाल्यावरील लोखंडी जाळी आणि त्यावरील पट्टी निघाली आहे. अनेक ठिकाणी थेट लोखंडी पट्टी वाहनांच्या चाकांमध्ये अडकत आहेत. तर, काहींच्या थेट गाडीच्या बोनेटला अडकत आहे. या रस्त्यावरून मोठे वाहन गेल्यावर नाल्यावरील पट्टी वाहनाच्या दाबामुळे वर येत आहे, वर आलेली पट्टी ही लहान गाड्यांमध्ये अडकत आहे. अनेक दुचाकीस्वारांना त्याचा फटका सहन करावा लागला आहे. नाल्यावरील लोखंडी रॉड आणि त्यावरील पट्टी ही एका वर्षातच धोकादायक झाल्याने त्याची पुनर्बांधणी करण्याची मागणी केली जात आहे.दुसरीकडे या नाल्याच्या दोन्ही बाजूला निर्माण झालेला उतार कमी करण्यासाठी पुन्हा काँक्रिटचे काम करण्याची गरज व्यक्त होत आहे. अनावश्यक असा उतार तयार केल्याने उड्डाणपुलाला जोडणारा रस्ता हा धोकादायक बनला आहे. यासंदर्भात आधीच तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीकडे पालिकेने दुर्लक्ष केले. रस्त्याचे काम करतानाच त्याची कल्पना नागरिकांनी दिली होती. पालिकेच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांनी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने उड्डाणपुलाचा रस्ता धोकादायक झाला आहे. अवघ्या २० मीटरच्या रस्त्याचा उतार चुकल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.संबंधित नाल्यावरील पट्टीची दुरुस्ती करण्यासंदर्भात सूचना देण्यात आली आहे. नाल्यावरील पट्टी दुरुस्त करण्यायोग्य नसल्यास ती बदलण्यात येईल.- देविदास पवार, मुख्याधिकारी

टॅग्स :Accidentअपघात