शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

धोकादायक इमारती पाचपटीने वाढल्या, भूमाफियांसह अधिकारी मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 23:56 IST

जीव टांगणीला : भूमाफियांसह अधिकारी मोकाट

ठाणे : एकीकडे धोकादायक इमारत दुर्घटना घडत असताना ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील सात वर्षांपूर्वी ठाण्यात महापालिकेच्या सर्वेक्षणात एक हजार ७५ इमारती धोकादायक होत्या. यंदाच्या सर्वेक्षणात त्या पाचपटीने वाढून त्यांची संख्या चार हजार ५१ वर गेली आहे. सुदैवाने यंदा ठाण्यात इमारत दुर्घटना घडलेली नाही. परंतु, महापालिका प्रशासन याची वाट बघत आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. क्लस्टर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अद्यापही सुरूझालेला नाही. तसेच अनधिकृत बांधकामांना जबाबदार असलेले माफिया आणि एकाही अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्याने ते मोकाट आहेत.

गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता, डोंगराळ परिसरात असलेल्या झोपड्या तसेच धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. पावसाळ्यात दरड कोसळणे, जमीन खचण्याच्या प्रकारांमुळे बºयाचदा जीवितहानी होण्याचे प्रकारही घडले आहेत.कळवा-मुंब्रा दरम्यानचा पारसिक डोंगराचा पूर्वेकडचा भाग मुंब्रा रेल्वेस्टेशनजवळच्या परिसरात बेकायदा इमारतींनी कळस गाठला आहे. कळवा, विटावा, खारेगाव आणि पारसिकनगर या पश्चिमेकडील भागासह कळवा पूर्वेला न्यू शिवाजीनगर, आनंदनगर, गणपतीपाडा, मफतलाल झोपडपट्टी, आतकोनेश्वरनगर, पौंडपाडा, घोलाईपाडा, वाघोबानगर या सर्वच परिसरांत बेकायदा झोपडपट्ट्या आणि अनधिकृत इमारती मोठ्या प्रमाणात आहेत.दुसरीकडे ठाणे शहरातील वागळे इस्टेट, इंदिरानगर, रूपादेवीपाडा, लोकमान्यनगर, रामनगरच्या डोंगरावर बेकायदा झोपड्याच नव्हे तर किसननगर, लोकमान्यनगर, यशोधननगर, सावरकरनगर परिसरांत अनधिकृत आणि धोकादायक इमारतींची संख्या मोठी आहे.दुर्घटनांत अनेकांचे गेले बळीगेल्या काही वर्षांत लहानमोठ्या बºयाच दुर्घटना घडल्या आहेत. आठ वर्षांपूर्वी मुंब्रा परिसरात घरावर संरक्षक भिंत कोसळून सात जण ठार झाले होते. तर, लकी कम्पाउंड इमारत कोसळून ७२ बळी गेले होते. तसेच वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीतील ज्ञानेश्वरनगर येथे चार घरांवर भिंत कोसळल्यामुळे आठ जण जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले होते.पाच वर्षांत शेकडो बळी गेले आहेत. या दुर्घटना घडल्यानंतर क्लस्टर योजना कार्यान्वित करण्यासाठी राजकीय मंडळींसह पालिकेने जोरदार तयारी सुरूकेली होती. त्यानुसार, मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पहिल्या क्लस्टरचा नारळही वाढवण्यात आला. त्यानंतर एकही क्लस्टरची वीट अद्यापही रचली गेलेली नाही.२२ अतिधोकादायक इमारतींचे वीज, पाणी बंद

कुमार बडदे ।मुंब्रा : वारंवार नोटिसा बजावूनही इमारती दुरुस्त करण्याबाबत कुठलीही हालचाल सुरू करण्यात न आलेल्या मुंब्य्रातील २२ अतिधोकादायक (सी २ ए श्रेणीतील) इमारतींचा पाणी आणि वीजपुरवठा ठामपाने खंडित केला आहे.मुंबईतील काही भागांतील तसेच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील अतिधोकादायक इमारती कोसळल्याच्या घटना नुकत्याच घडल्या होत्या. यामुळे त्या इमारतींमधील काही जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले होते. अशा घटना ठामपा क्षेत्रात घडू नयेत, यासाठी जाग आलेल्या ठामपा प्रशासनाने अतिधोकादायक इमारतींबाबत कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.या इमारतींचा समावेशवारंवार नोटिसा तसेच इशारे देऊनही २२ इमारतींमधील रहिवाशांनी त्यांच्या इमारती दुरुस्तीसाठी हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा पाणी, वीजपुरवठा तीन दिवसांत खंडित करण्यात आला. त्यात मकसूदनगर येथील केजीएन, बॉम्बे कॉलनीतील हानिफा, सत्तार, रेल्वेस्थानकाजवळील इब्राहिम बाबा, कयामत, जीवनबाग येथील हारुन अशरफी, झाशी पॅलेस आदी इमारतींचा समावेश आहे.स्ट्रक्चरल आॅडिट सक्तीचेज्या इमारतींमधील वीज, पाणीपुरवठा खंडित केला आहे, त्या इमारतींमधील रहिवाशांनी इमारत दुरुस्त करून त्यांचा स्ट्रक्चरल आॅडिट अहवाल सादर केल्यानंतर तो पुन्हा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उपनगर अभियंता धनंजय गोसावी यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेBuilding Collapseइमारत दुर्घटना