शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

भिवंडीत धोकादायक इमारतीस तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:54 IST

संसार आला रस्त्यावर । १८ कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवले

भिवंडी: भिवंडीत मागील आठवड्यात बेकायदा इमारत दुर्घटनेची घटना ताजी असतानाच शुक्र वारी सायंकाळी पुन्हा एकदा गैबीनगर येथे ४२ वर्षे जुन्या धोकादायक इमारतीस तडे गेल्याने तब्बल १८ कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवून इमारत पालिकेने रिकामी केली.

शांतीनगर भागातील गैबीनगर येथील फैजूल उलम मदरसा ट्रस्टच्या मालकीच्या मशिदीची सुन्नी जामा मशीद, चाळ घरक्र मांक ७९२ ही तब्बल ४२ वर्षे जुनी दोन मजली इमारत आहे. ही इमारत पालिका प्रशासनाने सप्टेंबर २०१६ मध्ये धोकादायक ठरवली होती. त्याचबरोबर या इमारतीची वीज व पाणीजोडणीही कापली होती. मात्र, या इमारतीवर कारवाई करण्यास नागरिकांनी तेव्हा विरोध करत आपण स्वत: ही इमारत पाडण्याचे आश्वासन येथील भाडोत्रींनी दिले होते. मात्र, तीन वर्षांनंतरही हे भाडोत्री याच इमारतीत तळ ठोकून बसले होते.शुक्र वारी दुपारी अचानक धोकादायक असलेल्या या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅबचे प्लास्टर पडल्याने मशिदीमधून ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना इमारत रिकामी करण्यासाठी आवाहन करण्यात आले. त्यानंतर, या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त अशोककुमार रणखांब यांच्या आदेशानुसार पोलीस व कर्मचारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीमधील १८ खोल्यांमधील ४२ वर्षांपासून भाडोत्री म्हणून वास्तव्य करणाºया कुटुंबीयांना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांच्या पथकाच्या मदतीने घरातील साहित्य बाहेर काढण्यास सांगून इमारत रिकामी करण्यास सांगितली.इमारतीचा वीजपुरवठा व नळजोडणी खंडित करण्यात आली. यानंतर इमारतीतील भाडोत्रींनी गरजेच्या वस्तू हलवण्यास सुरुवात केली. मात्र, या घटनेत तब्बल १८ कुटुंबे बेघर झाली असून तीन वर्षांपासून इमारतमालक, ट्रस्टी व भाडोत्री यांच्यात जागेचा ताबा सोडण्यावरून वाद सुरू असल्याची माहिती मिळत असून इमारत पाडल्यानंतर नवी इमारत उभी करून घर परत मिळेल का, या विवंचनेत या इमारतीतील रहिवासी आहेत. तब्बल ४२ वर्षे या इमारतीमध्ये राहिल्यानंतर अचानक इमारत सोडून जायचे कुठे, असा सवाल या इमारतीमधील नागरिक विचारत आहेत.तीन वर्षांपासून कारवाई प्रस्तावितदरम्यान, या इमारतीवर तीन वर्षांपासून कारवाई प्रस्तावित असून याबाबत इमारतमालकांवर गुन्हाही दाखल झालेला असल्याची माहितीही मिळत आहे. इमारत दुर्घटना व त्यामुळे होणारी हानी टाळावी, यासाठी भविष्यातील धोका ओळखून इमारत रिकामी करून वापर थांबवला आहे, अशी प्रतिक्रि या आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी दिली.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे