शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

भिवंडीत धोकादायक इमारतीस तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:54 IST

संसार आला रस्त्यावर । १८ कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवले

भिवंडी: भिवंडीत मागील आठवड्यात बेकायदा इमारत दुर्घटनेची घटना ताजी असतानाच शुक्र वारी सायंकाळी पुन्हा एकदा गैबीनगर येथे ४२ वर्षे जुन्या धोकादायक इमारतीस तडे गेल्याने तब्बल १८ कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवून इमारत पालिकेने रिकामी केली.

शांतीनगर भागातील गैबीनगर येथील फैजूल उलम मदरसा ट्रस्टच्या मालकीच्या मशिदीची सुन्नी जामा मशीद, चाळ घरक्र मांक ७९२ ही तब्बल ४२ वर्षे जुनी दोन मजली इमारत आहे. ही इमारत पालिका प्रशासनाने सप्टेंबर २०१६ मध्ये धोकादायक ठरवली होती. त्याचबरोबर या इमारतीची वीज व पाणीजोडणीही कापली होती. मात्र, या इमारतीवर कारवाई करण्यास नागरिकांनी तेव्हा विरोध करत आपण स्वत: ही इमारत पाडण्याचे आश्वासन येथील भाडोत्रींनी दिले होते. मात्र, तीन वर्षांनंतरही हे भाडोत्री याच इमारतीत तळ ठोकून बसले होते.शुक्र वारी दुपारी अचानक धोकादायक असलेल्या या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅबचे प्लास्टर पडल्याने मशिदीमधून ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना इमारत रिकामी करण्यासाठी आवाहन करण्यात आले. त्यानंतर, या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त अशोककुमार रणखांब यांच्या आदेशानुसार पोलीस व कर्मचारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीमधील १८ खोल्यांमधील ४२ वर्षांपासून भाडोत्री म्हणून वास्तव्य करणाºया कुटुंबीयांना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांच्या पथकाच्या मदतीने घरातील साहित्य बाहेर काढण्यास सांगून इमारत रिकामी करण्यास सांगितली.इमारतीचा वीजपुरवठा व नळजोडणी खंडित करण्यात आली. यानंतर इमारतीतील भाडोत्रींनी गरजेच्या वस्तू हलवण्यास सुरुवात केली. मात्र, या घटनेत तब्बल १८ कुटुंबे बेघर झाली असून तीन वर्षांपासून इमारतमालक, ट्रस्टी व भाडोत्री यांच्यात जागेचा ताबा सोडण्यावरून वाद सुरू असल्याची माहिती मिळत असून इमारत पाडल्यानंतर नवी इमारत उभी करून घर परत मिळेल का, या विवंचनेत या इमारतीतील रहिवासी आहेत. तब्बल ४२ वर्षे या इमारतीमध्ये राहिल्यानंतर अचानक इमारत सोडून जायचे कुठे, असा सवाल या इमारतीमधील नागरिक विचारत आहेत.तीन वर्षांपासून कारवाई प्रस्तावितदरम्यान, या इमारतीवर तीन वर्षांपासून कारवाई प्रस्तावित असून याबाबत इमारतमालकांवर गुन्हाही दाखल झालेला असल्याची माहितीही मिळत आहे. इमारत दुर्घटना व त्यामुळे होणारी हानी टाळावी, यासाठी भविष्यातील धोका ओळखून इमारत रिकामी करून वापर थांबवला आहे, अशी प्रतिक्रि या आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी दिली.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे