शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

भिवंडीत धोकादायक इमारतीस तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:54 IST

संसार आला रस्त्यावर । १८ कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवले

भिवंडी: भिवंडीत मागील आठवड्यात बेकायदा इमारत दुर्घटनेची घटना ताजी असतानाच शुक्र वारी सायंकाळी पुन्हा एकदा गैबीनगर येथे ४२ वर्षे जुन्या धोकादायक इमारतीस तडे गेल्याने तब्बल १८ कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवून इमारत पालिकेने रिकामी केली.

शांतीनगर भागातील गैबीनगर येथील फैजूल उलम मदरसा ट्रस्टच्या मालकीच्या मशिदीची सुन्नी जामा मशीद, चाळ घरक्र मांक ७९२ ही तब्बल ४२ वर्षे जुनी दोन मजली इमारत आहे. ही इमारत पालिका प्रशासनाने सप्टेंबर २०१६ मध्ये धोकादायक ठरवली होती. त्याचबरोबर या इमारतीची वीज व पाणीजोडणीही कापली होती. मात्र, या इमारतीवर कारवाई करण्यास नागरिकांनी तेव्हा विरोध करत आपण स्वत: ही इमारत पाडण्याचे आश्वासन येथील भाडोत्रींनी दिले होते. मात्र, तीन वर्षांनंतरही हे भाडोत्री याच इमारतीत तळ ठोकून बसले होते.शुक्र वारी दुपारी अचानक धोकादायक असलेल्या या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅबचे प्लास्टर पडल्याने मशिदीमधून ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना इमारत रिकामी करण्यासाठी आवाहन करण्यात आले. त्यानंतर, या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त अशोककुमार रणखांब यांच्या आदेशानुसार पोलीस व कर्मचारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीमधील १८ खोल्यांमधील ४२ वर्षांपासून भाडोत्री म्हणून वास्तव्य करणाºया कुटुंबीयांना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांच्या पथकाच्या मदतीने घरातील साहित्य बाहेर काढण्यास सांगून इमारत रिकामी करण्यास सांगितली.इमारतीचा वीजपुरवठा व नळजोडणी खंडित करण्यात आली. यानंतर इमारतीतील भाडोत्रींनी गरजेच्या वस्तू हलवण्यास सुरुवात केली. मात्र, या घटनेत तब्बल १८ कुटुंबे बेघर झाली असून तीन वर्षांपासून इमारतमालक, ट्रस्टी व भाडोत्री यांच्यात जागेचा ताबा सोडण्यावरून वाद सुरू असल्याची माहिती मिळत असून इमारत पाडल्यानंतर नवी इमारत उभी करून घर परत मिळेल का, या विवंचनेत या इमारतीतील रहिवासी आहेत. तब्बल ४२ वर्षे या इमारतीमध्ये राहिल्यानंतर अचानक इमारत सोडून जायचे कुठे, असा सवाल या इमारतीमधील नागरिक विचारत आहेत.तीन वर्षांपासून कारवाई प्रस्तावितदरम्यान, या इमारतीवर तीन वर्षांपासून कारवाई प्रस्तावित असून याबाबत इमारतमालकांवर गुन्हाही दाखल झालेला असल्याची माहितीही मिळत आहे. इमारत दुर्घटना व त्यामुळे होणारी हानी टाळावी, यासाठी भविष्यातील धोका ओळखून इमारत रिकामी करून वापर थांबवला आहे, अशी प्रतिक्रि या आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी दिली.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे