शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘दाभोलकर, पानसरेंची हत्या महाराष्ट्रात व्हावी याचा खेद’

By admin | Updated: January 24, 2017 05:49 IST

धर्माचे विचार, रूढीपरंपरा आणि त्याचबरोबर विज्ञानाची समीकरणे विवेकी विचारांच्या कसोटीवर घासून घ्यावी लागतात. हा समाजपरिवर्तनाचा

ठाणे : धर्माचे विचार, रूढीपरंपरा आणि त्याचबरोबर विज्ञानाची समीकरणे विवेकी विचारांच्या कसोटीवर घासून घ्यावी लागतात. हा समाजपरिवर्तनाचा विवेकी विचार खूप विरोध असतानाही विपरित परिस्थितीत पाय रोवून खंबीरपणे रुजवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, त्याचाच आजन्म ध्यास ज्यांनी घेतला, त्या दाभोलकर, पानसरेंची हत्या महाराष्ट्रात व्हावी, याचा जास्त खेद वाटतो, असे मत मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केले.पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने ठाण्यातील संवेदनशील संस्था आणि संघटनांनी एकत्र येऊन लोकजागर उपक्रम सुरू केला आहे. दर महिन्याच्या २० तारखेला हा उपक्रम होणार आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी ‘महात्मा गांधी ते डॉ. आंबेडकर व्हाया हमीद दलवाई, दाभोलकर, कलबुर्गी व पानसरे’ या विषयावर परिसंवाद मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात रंगला होता. या वेळी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही कुठल्याही धर्माच्या विरोधी नाही. परंतु, सर्व धर्मांच्या चुकीच्या चालीरीती, रूढीपरंपरांना समितीने विरोध नक्कीच केला. म्हणूनच, समाजातील प्रतिगामी शक्तींनी समितीची नेहमीच बदनामी केली. त्याचा त्रास डॉ. दाभोलकरांना सतत झाला. तरीही, पुरोगामी विचार हा समाजाला पुढे नेणारा आहे, हे पटवून देण्याचाच प्रयत्न त्यांनी केला. वृत्तीने धार्मिक असला तरी विचाराने प्रतिगामी नसलेला खूप मोठा वर्ग काम करतो आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व लोकशाही या मूल्यांची राखण करण्यासाठी महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा आधार घेऊन सर्वांना कर्तव्य व हक्काची जाणीव करून प्रतिगामी शक्तींना विरोध करण्याची सामायिक कृती करायला हवी, असे मतही मुक्ता यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)