शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

‘दाभोलकर, पानसरेंची हत्या महाराष्ट्रात व्हावी याचा खेद’

By admin | Updated: January 24, 2017 05:49 IST

धर्माचे विचार, रूढीपरंपरा आणि त्याचबरोबर विज्ञानाची समीकरणे विवेकी विचारांच्या कसोटीवर घासून घ्यावी लागतात. हा समाजपरिवर्तनाचा

ठाणे : धर्माचे विचार, रूढीपरंपरा आणि त्याचबरोबर विज्ञानाची समीकरणे विवेकी विचारांच्या कसोटीवर घासून घ्यावी लागतात. हा समाजपरिवर्तनाचा विवेकी विचार खूप विरोध असतानाही विपरित परिस्थितीत पाय रोवून खंबीरपणे रुजवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, त्याचाच आजन्म ध्यास ज्यांनी घेतला, त्या दाभोलकर, पानसरेंची हत्या महाराष्ट्रात व्हावी, याचा जास्त खेद वाटतो, असे मत मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केले.पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने ठाण्यातील संवेदनशील संस्था आणि संघटनांनी एकत्र येऊन लोकजागर उपक्रम सुरू केला आहे. दर महिन्याच्या २० तारखेला हा उपक्रम होणार आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी ‘महात्मा गांधी ते डॉ. आंबेडकर व्हाया हमीद दलवाई, दाभोलकर, कलबुर्गी व पानसरे’ या विषयावर परिसंवाद मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात रंगला होता. या वेळी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही कुठल्याही धर्माच्या विरोधी नाही. परंतु, सर्व धर्मांच्या चुकीच्या चालीरीती, रूढीपरंपरांना समितीने विरोध नक्कीच केला. म्हणूनच, समाजातील प्रतिगामी शक्तींनी समितीची नेहमीच बदनामी केली. त्याचा त्रास डॉ. दाभोलकरांना सतत झाला. तरीही, पुरोगामी विचार हा समाजाला पुढे नेणारा आहे, हे पटवून देण्याचाच प्रयत्न त्यांनी केला. वृत्तीने धार्मिक असला तरी विचाराने प्रतिगामी नसलेला खूप मोठा वर्ग काम करतो आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व लोकशाही या मूल्यांची राखण करण्यासाठी महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा आधार घेऊन सर्वांना कर्तव्य व हक्काची जाणीव करून प्रतिगामी शक्तींना विरोध करण्याची सामायिक कृती करायला हवी, असे मतही मुक्ता यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)