शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

‘दाभोलकर, पानसरेंची हत्या महाराष्ट्रात व्हावी याचा खेद’

By admin | Updated: January 24, 2017 05:49 IST

धर्माचे विचार, रूढीपरंपरा आणि त्याचबरोबर विज्ञानाची समीकरणे विवेकी विचारांच्या कसोटीवर घासून घ्यावी लागतात. हा समाजपरिवर्तनाचा

ठाणे : धर्माचे विचार, रूढीपरंपरा आणि त्याचबरोबर विज्ञानाची समीकरणे विवेकी विचारांच्या कसोटीवर घासून घ्यावी लागतात. हा समाजपरिवर्तनाचा विवेकी विचार खूप विरोध असतानाही विपरित परिस्थितीत पाय रोवून खंबीरपणे रुजवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, त्याचाच आजन्म ध्यास ज्यांनी घेतला, त्या दाभोलकर, पानसरेंची हत्या महाराष्ट्रात व्हावी, याचा जास्त खेद वाटतो, असे मत मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केले.पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने ठाण्यातील संवेदनशील संस्था आणि संघटनांनी एकत्र येऊन लोकजागर उपक्रम सुरू केला आहे. दर महिन्याच्या २० तारखेला हा उपक्रम होणार आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी ‘महात्मा गांधी ते डॉ. आंबेडकर व्हाया हमीद दलवाई, दाभोलकर, कलबुर्गी व पानसरे’ या विषयावर परिसंवाद मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात रंगला होता. या वेळी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही कुठल्याही धर्माच्या विरोधी नाही. परंतु, सर्व धर्मांच्या चुकीच्या चालीरीती, रूढीपरंपरांना समितीने विरोध नक्कीच केला. म्हणूनच, समाजातील प्रतिगामी शक्तींनी समितीची नेहमीच बदनामी केली. त्याचा त्रास डॉ. दाभोलकरांना सतत झाला. तरीही, पुरोगामी विचार हा समाजाला पुढे नेणारा आहे, हे पटवून देण्याचाच प्रयत्न त्यांनी केला. वृत्तीने धार्मिक असला तरी विचाराने प्रतिगामी नसलेला खूप मोठा वर्ग काम करतो आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व लोकशाही या मूल्यांची राखण करण्यासाठी महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा आधार घेऊन सर्वांना कर्तव्य व हक्काची जाणीव करून प्रतिगामी शक्तींना विरोध करण्याची सामायिक कृती करायला हवी, असे मतही मुक्ता यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)