शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

CSMT Bridge Collapse आई, तुझ्याविना कसा जगू...; लहानग्या ओमकारची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 07:15 IST

चिमुकली चिन्मयी मातेच्या पार्थिवाचा घट्ट पकडलेला हात सोडेना

- अनिकेत घमंडी / सचिन सागरेडोंबिवली : आई, अजून एक दिवस सुटी वाढवून घे ना... ओमकार शिंदे आपल्या चारपाच दिवस सुटीवर असलेल्या आईला गुरुवारी सायंकाळी विनवत होता आणि त्याची आई भक्ती शिंदे (४०) मुलाचे मन मोडून जीटी रुग्णालयात कामावर गेल्या, त्या परत आल्याच नाहीत. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवाला बिलगून... आई, आता तुझ्याशिवाय मी कसा राहू, अशा शब्दांत ओमकारनं फोडलेला टाहो काळीज पिळवटून टाकत होता.मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पूल कोसळण्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत सहाजणांचा मृत्यू झाला. त्यात जीटी रुग्णालयातील परिचारिका भक्ती शिंदे, अपूर्वा प्रभू (३२), रंजना तांबे (४८) या तिघींचा मृत्यू झाला. या तिघीही डोंबिवली पश्चिमेत राहायला होत्या. त्यामुळे त्या परिसरावर अक्षरश: शोककळा पसरली होती.तांबे, प्रभू आणि शिंदे या तिघी १५ ते २० वर्षांपासून मुंबईतील जीटी रुग्णालयात कामाला होत्या. गुरुवारी रात्रपाळी असल्याने घरातून निघालेल्या तिघी रुग्णालयात पोहोचण्यासाठी पुलावरून जात असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. दीनदयाळ रोड परिसरातील ओमसाई दत्त इमारतीमध्ये पती राजेंद्र शिंदे, मुलगा ओमकार (१४) आणि सासू यांच्यासोबत भक्ती राहत होत्या. त्यांच्या निधनामुळे शिंदे परिवार व शेजारी शोकाकुल झाले आहेत.पश्चिमेतील ठाकूरवाडी परिसरात असलेल्या उदयराज इमारतीमध्ये पती अभय प्रभू, मुलगा गणेश (१२) आणि मुलगी चिन्मयी (१०) यांच्यासोबत अपूर्वा राहत होत्या. हे दोघेही सेंट जॉर्ज शाळेत सातवी आणि पाचवीमध्ये शिकत आहेत. आपल्यावर कोसळलेल्या या भीषण संकटामुळे गणेश आणि चिन्मयी कावरीबावरी झाली होती. अपूर्वा यांचे पार्थिव अंत्यसंस्काराकरिता जेव्हा घेऊन जायला निघाले, तेव्हा मी आईला सोडणार नाही, असे म्हणत लहानग्या चिन्मयीचा बांध फुटला आणि साऱ्यांचे डोळे पाणावले. अपूर्वा यांचे पती खाजगी कंपनीत कामाला आहेत. आता या दोन लहानग्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी खांद्यावर येऊन पडलेले अभय यांच्या चेहऱ्यावरील दु:ख व तणाव सतत जाणवत होता.पश्चिमेतील गणेशनगर परिसरात असलेल्या शिवसागर इमारतीमध्ये आपल्या आईसोबत रंजना तांबे राहत होत्या, तर त्यांचा भाऊ गरिबाचावाडा परिसरात असलेल्या कृष्णाबाई सज्जन दर्शन येथे राहतो. त्यांना तीन विवाहित बहिणी आहेत. अविवाहित असलेल्या रंजना जीटी रुग्णालयात कामाला होत्या, अशी माहिती रंजना यांचे नातलग विजय तांबे यांनी दिली. आपला म्हातारपणीचा आधार असलेली रंजना गेली, यावर तिच्या आईचा विश्वासच बसत नव्हता. त्यांना जबर मानसिक धक्का बसला असल्याचे तांबे कुटुंबीयांनी सांगितले.भक्ती ३५ वर्षांपासून आमच्या शेजारी होत्या. सर्वांसोबत मिळूनमिसळून राहणाऱ्या भक्तीचा दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू होतो, ही दु:खदायक घटना आहे. तिला एक मुलगा असून त्याचे शिक्षण व्हायचे आहे. त्याला आता कोण सांभाळणार? जर असे पूल पडत गेले, तर लोकांचे कसे होणार? पुलाची दुरवस्था झाली असेल तर कार्यवाही कोणी केली पाहिजे? पूल पडूनही दोषींवर कारवाई होत नाही, हे संतापजनक आहे. जीवाभावाच्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर पैसे मिळून काय उपयोग? आमची माणसे आम्हाला परत मिळणार आहेत का? पुन्हा अशी घटना होऊ नये म्हणून काळजी घेण्याची तुमची जबाबदारी नाही का? - सीमा शिंदे, भक्ती यांच्या शेजारीअपूर्वा, रंजना आणि भक्ती या तिन्ही जीटी रुग्णालयाच्या परिचारिका होत्या. आम्ही रुग्णसेवा करायला घर सोडून जेव्हा बाहेर पडतो, तेव्हा आम्ही घराचा विचार करत नाही. रुग्णालयातील रुग्णांची सेवा करण्यासाठी निघालेल्या या तिघींचे आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्थ झाले. आम्हाला कितीही पैसे दिले तरी आमचा माणूस परत येणार नाही. रेल्वे आणि महापालिका प्रशासन आज एकमेकांकडे बोट दाखवत आहे. तुमच्या भांडणात आमचा माणूस गेला.- वर्षा नरे, निवृत्त परिचारिका, जीटी रुग्णालय

टॅग्स :CST Bridge Collapseसीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनाthaneठाणे