शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
6
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
7
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
8
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
9
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
10
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
11
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
12
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
13
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
14
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
15
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
16
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
17
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
18
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
19
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
20
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या

नोकरदारांची गर्दी पूर्णत: ओसरली इंदिरा गांधी चौकात शुकशुकाट, एसटी बस रिकाम्याच धावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 03:01 IST

दुसरीकडे बुधवारी अनेकांनी भाजी, किराणा व अन्य वस्तू खरेदी केल्याने कोणीही गुरुवारी बाजारात फिरकले नाही.

अनिकेत घमंडीडोंबिवली : केडीएमसी प्रशासनाने गुरुवारपासून केलेल्या लॉकडाऊनला डोंबिवलीत चांगला प्रतिसाद मिळाला. बजारपेठांमधील दुकाने बंद होती. नागरिकांनी घरी राहणेच पसंत केल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. सकाळी कामावर जाण्यासाठी इंदिरा गांधी चौकात नोकरदारांच्या रांगाही लागल्या नाहीत. त्यामुळे एसटी बस रिकाम्याच धावल्या.

कोरोना रोखण्यासाठी सरकारने मार्चअखेरीस लॉकडाऊन जाहीर केले होते. सुरुवातीला नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. मात्र, परप्रांतीय मजुरांचे हाल होऊ लागल्याने त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले. त्यावेळी ई-पास व त्यासंबंधित प्रक्रियेसाठी मजुरांची महापालिका व पोलीस ठाण्यांमध्ये गर्दी दिसू लागली. पुढे अनलॉक झाल्यानंतर अनेक व्यवहार सुरू झाले. नोकरदारही कामावर जाण्यासाठी एसटी बससाठी गर्दी करू लागले. नागरिक बिनधास्तपणे रस्त्यावर वावरत होते. मात्र, वाढत्या रुग्णांमुळे गुरुवारपासून केलेल्या लॉकडाऊनमुळे रस्त्यावर शुकशुकाट होता.

केंद्र, राज्य सरकारच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबर पोर्ट ट्रस्ट, टपाल, राष्ट्रीयकृत बँकांमधील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनमध्ये बाहेर पडल्यास पोलीस कारवाई करतील या भीतीने अनेक नोकरदार कामावर जाण्यासाठी निघाले नाहीत. त्यामुळे इंदिरा गांधी चौकात त्यांच्या रांगा लागल्या नाहीत. सकाळच्या सत्रातील अल्प प्रतिसाद पाहून एसटी नियंत्रकांनी डोंबिवलीत जादा बस न पाठवण्याची विनंती नियंत्रण कक्षाला केली. ३० जूनपर्यंत सकाळी डोंबिवलीतून ९० ते १०० बस सुटत होत्या. परंतु, गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत मंत्रालय, ठाणे, कल्याण मार्गांवर ५० बस सुटल्या. त्याही प्रवाशांअभावी रिकाम्या धावल्या.

दुसरीकडे बुधवारी अनेकांनी भाजी, किराणा व अन्य वस्तू खरेदी केल्याने कोणीही गुरुवारी बाजारात फिरकले नाही. सकाळच्या वेळेत तुकारामनगर, शेलार नाका, फडके पथ, या भागात काही भाजी, फळविक्रेते बसले होते. महापालिकेने त्यांना समज देऊन पथारी उचलण्यास सांगितले. अत्यावश्यक सेवेतील दुकानेही अर्धे शटर उडघण्यात आली होती. किराणा माल दुकानदारांनी सामानाची होम डिलिव्हरी दिली. मात्र, लॉकडाऊनचा फटका बसल्याने किराणा दुकानदार, औषध आणि भाजी विक्रेते आदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.अत्यावश्यक सेवेसाठीच्या आॅनकॉल सेवेतील रिक्षा रस्त्यावर दिसून आल्या. सकाळी ९ नंतर रामनगर, विष्णूनगर भागात पोलिसांनी रिक्षा फिरवून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.ठाकुर्ली पुलानजीक वाहनतपासणीपोलिसांनी शेलारनाका, ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरात नाकाबंदी केली होती. विनाकारण घराबाहेर पडणाºयांना पोलीस परतवून लावत होते. केवळ वैद्यकीय व सरकारी असे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांनाच पोलीस सोडत होते. नाकाबंदीमुळे पुलाच्या परिसरात पूर्व-पश्चिमेस दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळपासून तुरळक सुरू असलेली वर्दळही सकाळी ११ नंतर कमी झाली.

टॅग्स :state transportएसटीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdombivaliडोंबिवली