शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या कजरी महोत्सवातील नाचगाणे, मिमिक्री कार्यक्रमावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 22:03 IST

मीरा भाईंदर भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीने आयोजित नाचगाणे व त्यावर पैसे उडवणे, मिमिक्रीचा समावेश असलेल्या कजरी महोत्सवावर टीकेची झोड उठत आहे.

मीरा रोड - राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पुरामुळे लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले असताना मीरा भाईंदर भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीने आयोजित नाचगाणे व त्यावर पैसे उडवणे, मिमिक्रीचा समावेश असलेल्या कजरी महोत्सवावर टीकेची झोड उठत आहे. विशेष म्हणजे आयोजकांनी या नाचगाण्याच्या कार्यक्रमाच्या फलकावर शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका यांचे छायाचित्र देखील वापरले.भाईंदरच्या इंद्रलोक येथील प्रमोद महाजन सभागृहात रविवारी रात्री अभियान संस्था व भाजपाच्या उत्तर भातीय मोर्चाच्या वतीने कजरी महोत्सव व स्त्री शक्ती सम्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या जाहिरात फलकावर हसतमुख नेत्यांच्या छायाचित्रां सोबत शहिद मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका यांचे देखील छायाचित्र वापरण्यात आले होते. तर कार्यक्रम ठिकाणी भाजपाची सदस्य नोंदणीचे अर्ज भरून घेतले जात होते.या वेळी शहराच्या महापौर डिंपल मेहता व आमदार नरेंद्र मेहतांसह उत्तरप्रदेश सरकारच्या चित्रपट महामंडळाचे राज्यमंत्रीचा दर्जा असलेले अध्यक्ष तथा मिमीक्री करणारे राजु श्रीवास्तव, राज्य शासनाच्या फिल्मसीटीचे अध्यक्ष अमरजित मिश्रा, उत्तरप्रदेशचे खासदार रमापती त्रिपाठी, उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष देवीप्रसाद उपाध्याय, लल्लन तिवारी आदी उपस्थित होते. भोजपुरी गाणी गाण्यात आली. त्यावर नाचसुद्धा केला गेला. यावेळी नोटा देखील उडवण्यात आल्या.राजू श्रीवास्तव यांनी आपली मिमिक्री सादर करत आ. मेहतांसह सर्व उपस्थितांना हसवून सोडले. परंतु राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, कोकण, खान्देश आदी भागात पुराने हाहाकार माजवला असताना भाजपाने आयोजित केलेल्या या नाचगाण्याच्या आणि मिमिक्रीच्या कार्यक्रमावर टीकेची झोड उठत आहे. त्यातच शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नींचे छायाचित्र देखील या कार्यक्रमासाठी वापरण्यात आले होते.भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी राजकीय फायद्यासाठी कजरी महोत्सवाच्या आड नाचगाणे, मिमिक्री आणि पक्षाची सदस्य नोंदणी सारखे प्रकार करताना निदान राज्यातील भयाण पूरस्थितीचा विचार केला पाहिजे होता. शहीद पत्नी कनिका राणे यांचे छायाचित्र कुठे वापरावे याचे भान ठेवले पाहिजे होते, अशी टीका उत्तर भारतिय समाजाचे अमित तिवारी यांनी केली आहे. घडला प्रकार चुकीचा होता. तर देवीप्रसाद उपाध्याय यांनी मात्र केवळ उत्तर भारतीयांना लक्ष्य केले जात आहे, असे सांगत अन्य समाजाचे कार्यक्रम देखील होत असताना त्यावर कोणी बोलत नाहीत.

टॅग्स :BJPभाजपा