शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

१० गुंठ्यांचा निकष शेतकऱ्यांच्या मतदानावर गदा आणणारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 00:28 IST

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे.

कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्यासाठी मतदारयादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. सरकारच्या नव्या नियमानुसार १० गुंठे जागा असलेला शेतकरीच मतदार होऊ शकतो. हा नियम शेतकºयांना बाजार समितीशी थेट जोडणारा असला तरी याच नियमामुळे कल्याण तालुक्यातील ४० टक्के शेतकरी मतदारयादीत समाविष्ट होत नसल्याचा गंभीर मुद्दा कल्याण तालुका शेतकरी संघटनेने मांडला आहे.संघटनेचे अध्यक्ष व बाजार समितीचे माजी सभापती वंडार पाटील यांच्यासह टीडीसी बँकेचे अनंत शिसवे, माजी सभापती अरुण पाटील आणि सर्वपक्षीय संघर्ष समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी कल्याणचे तहसीलदार व बाजार समितीचे प्रशासक शहाजी पाटील यांना या मुद्यावर निवेदन सादर केले. यापूर्वी तालुक्यातील १९ नोंदणीकृत शेतकरी सोसायट्यांच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार होता. त्यांच्या मतदानावर बाजार समितीचे संचालक मंडळ निवडले जात होते. संचालक मंडळाच्या मतदानातून सभापती निवडला जात होता. नव्या नियमानुसार १० गुंठे शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा हक्क बजावता येईल. कल्याण तालुक्यात १०० गावे आहेत. या गावांत ७० ते ८० हजार शेतकरी आहेत. एखाद्या कुटुंबात पाच भावांकडे १०० गुंठे जमीन आहे. त्याची विभागणी केल्यास प्रत्येक भावाच्या वाट्याला २० गुंठे जागा येते. त्यानुसार, ते मतदार होऊ शकतात. मात्र, एकाच कुटुंबातील पाच जणांना मतदानाचा अधिकार देता येत नाही. त्यामुळे सर्वच भावांना बाद करण्यात येत आहे. वास्तविक, पाच भावांपैकी एकाला तरी मतदानाचा हक्क दिला जावा, अशी संघटनेची मागणी आहे. काही ठिकाणी पाच भावांच्या नावावर ५६ गुंठे जागा आहे. त्याची समान विभागणी शक्य नाही. त्यामुळे ते पाचही जण बाद ठरतात.>जमिनीच्या निकषाचा मुद्दा कल्याण तालुक्यासाठी गंभीर आहे. काही जिल्ह्यांमध्ये शेतकºयांच्या नावे मोठ्या प्रमाणात शेतजमीन असल्याने त्यांना सरकारच्या निकषाचा फटका बसलेला नाही. बाजार समितीचे माजी सभापती तथा संघटनेचे अध्यक्ष असलेले वंडार पाटील यांचेच नाव नव्या निकषानुसार मतदारयादीत समाविष्ट होऊ शकले नाही. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती ही मुंबई व नवी मुंबई बाजार समित्योच्या पाठोपाठ तिसºया क्रमांकाची मोठी बाजार समिती आहे. कल्याणचा बाजार हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. कल्याणच्या पंचक्रोशीतील शेतकºयांना ही बाजार समिती सोयीची पडते. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी या मुद्यावर सरकाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पूर्वी बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकºयांचा थेट सहभाग नव्हता. आता ती संधी सरकारने दिली असली, तरी १० गुंठ्यांच्या अटीमुळे ४० टक्के शेतकरी मतदानापासून वंचित राहण्याची भीती आहे. दहा गुंठ्यांच्या निकषामुळे कल्याण तालुक्यातील जवळपास ४० टक्के शेतकरी मतदारयादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहणार आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी