शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

१० गुंठ्यांचा निकष शेतकऱ्यांच्या मतदानावर गदा आणणारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 00:28 IST

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे.

कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्यासाठी मतदारयादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. सरकारच्या नव्या नियमानुसार १० गुंठे जागा असलेला शेतकरीच मतदार होऊ शकतो. हा नियम शेतकºयांना बाजार समितीशी थेट जोडणारा असला तरी याच नियमामुळे कल्याण तालुक्यातील ४० टक्के शेतकरी मतदारयादीत समाविष्ट होत नसल्याचा गंभीर मुद्दा कल्याण तालुका शेतकरी संघटनेने मांडला आहे.संघटनेचे अध्यक्ष व बाजार समितीचे माजी सभापती वंडार पाटील यांच्यासह टीडीसी बँकेचे अनंत शिसवे, माजी सभापती अरुण पाटील आणि सर्वपक्षीय संघर्ष समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी कल्याणचे तहसीलदार व बाजार समितीचे प्रशासक शहाजी पाटील यांना या मुद्यावर निवेदन सादर केले. यापूर्वी तालुक्यातील १९ नोंदणीकृत शेतकरी सोसायट्यांच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार होता. त्यांच्या मतदानावर बाजार समितीचे संचालक मंडळ निवडले जात होते. संचालक मंडळाच्या मतदानातून सभापती निवडला जात होता. नव्या नियमानुसार १० गुंठे शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा हक्क बजावता येईल. कल्याण तालुक्यात १०० गावे आहेत. या गावांत ७० ते ८० हजार शेतकरी आहेत. एखाद्या कुटुंबात पाच भावांकडे १०० गुंठे जमीन आहे. त्याची विभागणी केल्यास प्रत्येक भावाच्या वाट्याला २० गुंठे जागा येते. त्यानुसार, ते मतदार होऊ शकतात. मात्र, एकाच कुटुंबातील पाच जणांना मतदानाचा अधिकार देता येत नाही. त्यामुळे सर्वच भावांना बाद करण्यात येत आहे. वास्तविक, पाच भावांपैकी एकाला तरी मतदानाचा हक्क दिला जावा, अशी संघटनेची मागणी आहे. काही ठिकाणी पाच भावांच्या नावावर ५६ गुंठे जागा आहे. त्याची समान विभागणी शक्य नाही. त्यामुळे ते पाचही जण बाद ठरतात.>जमिनीच्या निकषाचा मुद्दा कल्याण तालुक्यासाठी गंभीर आहे. काही जिल्ह्यांमध्ये शेतकºयांच्या नावे मोठ्या प्रमाणात शेतजमीन असल्याने त्यांना सरकारच्या निकषाचा फटका बसलेला नाही. बाजार समितीचे माजी सभापती तथा संघटनेचे अध्यक्ष असलेले वंडार पाटील यांचेच नाव नव्या निकषानुसार मतदारयादीत समाविष्ट होऊ शकले नाही. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती ही मुंबई व नवी मुंबई बाजार समित्योच्या पाठोपाठ तिसºया क्रमांकाची मोठी बाजार समिती आहे. कल्याणचा बाजार हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. कल्याणच्या पंचक्रोशीतील शेतकºयांना ही बाजार समिती सोयीची पडते. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी या मुद्यावर सरकाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पूर्वी बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकºयांचा थेट सहभाग नव्हता. आता ती संधी सरकारने दिली असली, तरी १० गुंठ्यांच्या अटीमुळे ४० टक्के शेतकरी मतदानापासून वंचित राहण्याची भीती आहे. दहा गुंठ्यांच्या निकषामुळे कल्याण तालुक्यातील जवळपास ४० टक्के शेतकरी मतदारयादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहणार आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी