शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 21:24 IST

शाळेतील विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली शिक्षक रघुनाथ हरड याच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात विनयंभगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

डोंबिवली : शाळेतील विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली शिक्षक रघुनाथ हरड याच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात विनयंभगाचा गुन्हा दाखल झाला आहे. गैरवर्तनाचा प्रकार अनेक दिवसांपूर्वी उघड होऊनही शाळेने तसेच संस्थाचालकांनी याप्रकरणी कोणतीही तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात केलेली नव्हती, अखेर अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांना ही घटना समजताच त्यांच्या पुढाकाराने पीडित मुलींच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.डोंबिवली पूर्वेकडील दावडी परिसरातील आरटीपी मराठी विद्यालयात हा प्रकार घडला आहे. 8 फेब्रुवारीला या शाळेतील इयत्ता दुसरी ते सहावीपर्यंतच्या मुलांसाठी सुरक्षित स्पर्श, असुरक्षित स्पर्श या विषयांवर मुलांचे प्रबोधन होण्यासाठी व मुलांमध्ये आपली स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी एका सामाजिक संस्थेने चाइल्डलाइन इंडिया फाऊंडेशन अंतर्गत १० मिनिटांची चित्रफीत दाखविली. ती चालू असताना इयत्ता सहावीच्या मुली रडायला लागल्या. ते हेरून सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी मुलींशी केलेल्या चर्चेत त्यांच्याबरोबर शाळेतील शिक्षक रघुनाथ हरड याने असुरक्षित स्पर्श केल्याचे समोर आले. याचा संपूर्ण तपशील शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आला. त्यावर शाळेने संबंधित शिक्षकावर निलंबनाची देखील कारवाई केली. पण हा प्रकार पोलिसांपासून लपवून ठेवल्याचा आरोप पालकांनी केला आहे. दरम्यान शुक्रवारी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या पुढाकाराने मानपाडा पोलीस ठाण्यात शिक्षक हरड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तीन विद्यार्थिनींच्या बाबतील गैरवर्तनाचा प्रकार घडल्याचे बोलले जाते. 

माहिती देण्यास पोलिसांची टाळाटाळदरम्यान यासंदर्भात माहिती देण्यास मानपाडा पोलिसांनी टाळाटाळ केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पत्रकारांनी पोलीस ठाण्यात असलेल्या ठाणे अंमलदाराला विचारणा केली असता गुन्हा दाखल आहे. परंतु गुन्हा दाखल करणा-या महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव याचं तुम्हाला माहिती देतील, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. जाधव यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून देखील गुन्हा दाखल असल्याचे सांगत माहिती देण्यास नकार दिला. तुम्ही वरिष्ठांना भेटा आणि मगच माहिती देते असे त्यांनी सुनावत टाळाटाळ केली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुल्ले हे त्यांच्या कक्षात एका बैठकीत व्यस्त होते. बराच वेळ होऊनही बैठक संपत नसल्याने त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर यावेळी ठाणे अंमलदारांकडून कल्याण नियंत्रण कक्षातून माहिती घ्या, असेही सांगण्यात आले. अखेर कल्याण नियंत्रण कक्षाला संपर्क केला असता मानपाडा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा आलेला नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :Molestationविनयभंगdombivaliडोंबिवली