शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा झाला क्राईम कॅपिटल शहर - जितेंद्र आव्हाड 

By सदानंद नाईक | Updated: May 28, 2023 19:13 IST

शहर राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठक व पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी आलेले नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे जिल्हा क्राईम कॅपिटल शहर बनले आहे, असे म्हटले.

उल्हासनगर : शहर राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठक व पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी आलेले नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे जिल्हा क्राईम कॅपिटल शहर बनले आहे. तसेच आमदार किणीकरसह अन्य जण मातोश्रीच्या संपर्कात असल्याचे मत कार्यक्रमात व्यक्त केले. उल्हासनगर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने कॅम्प नं-५ परिसरात शनिवारी पदाधिकाऱ्यांची बैठक व पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन शहरजिल्हाध्यक्षा पंचम कलानी यांनी केले होते. कार्यक्रमाला पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे आदी जण उपस्थित होते. दोनच दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख शब्बीर शेख यांचा खून झाला असून मटकी जुगाराच्या वादातून खून झाल्याचे बोलले जाते. या प्रकरणावरून आव्हाड यांनी जिल्ह्या क्राईम कॅपिटल झाल्याची टीका त्यांनी केली. तसेच शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर मातोश्रीच्या संपर्कात असून त्यांना मातोश्रीच्या प्रवेश दिला जाणार नसल्याचे आव्हाड म्हणाले. तसेच भाजप व शिवसेना शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. 

शहर राष्ट्रवादीत कलानी व गंगोत्री असे गट पडले असून भारत गंगोत्रीसह समर्थकांना पक्ष प्रवेश व पदाधिकारी बैठक कार्यक्रमाला आमंत्रित केले नाही. असा आरोप गंगोत्री समर्थक करीत आहेत. तसेच शहरभर लावलेल्या पोस्टर्सवर गंगोत्री यांना स्थान देण्यात आले नाही. पक्षातील वादावर आव्हाड यांनी टाळले असून परांजपे यांनी पक्ष वाढीसाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आवाहन केले. कलानी यांच्यावर उल्हासनगर विधानसभा संघासह कल्याण पूर्व व अंबरनाथ विधानसभा क्षेत्राचा पदभार देण्याची घोषणा यावेळी केली. पदाधिकारी बैठकीच्या पोस्टर्सवर शहर जिल्हाध्यक्ष पंचम कलानी यांच्यासह माजी आमदार पप्पु कलानी व ओमी कलानी यांचे फोटो झळकले आहे. मात्र बैठकीला पप्पु कलानी व ओमी कलानी यांनी दांडी मारल्याने, वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते. तसेच पक्षातील वाद मिटल्यास पक्षाची शक्ती वाढणार असल्याचे बोलले जाते. 

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड