शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-भाजपाच्या श्रेयवादाने आयुक्त जात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:00 IST

नवीन ठाणे स्टेशन, क्लस्टर डेव्हलपमेंट आणि जलवाहतूक हे प्रकल्प विधानसभा निवडणुकीपूर्वी मार्गी लावण्याकरिता संजीव

ठाणे : नवीन ठाणे स्टेशन, क्लस्टर डेव्हलपमेंट आणि जलवाहतूक हे प्रकल्प विधानसभा निवडणुकीपूर्वी मार्गी लावण्याकरिता संजीव जयस्वाल हेच ठाणे महापालिका आयुक्तपदी राहावे, याकरिता खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असून वरचेवर आपल्या बदलीची भाषा करणाऱ्या जयस्वाल यांचीही हे प्रकल्प सुरू करून पदावरून दूर होण्याची इच्छा आहे. त्यामुळे महापौर मीनाक्षी शिंदे व आयुक्त जयस्वाल यांच्यातील सध्याच्या वादंगात पुन्हा पालकमंत्री मध्यस्थी करतील, असे संकेत प्राप्त होत आहेत.महासभेच्या निमित्ताने सुरू झालेल्या महापौर आणि आयुक्त यांच्यातील वादावर येत्या दोन ते तीन दिवसांत पडदा पडण्याची चिन्हे आहेत. वरकरणी हा वाद महापौरांविरुद्ध आयुक्त, शिवसेनाविरुद्ध आयुक्त असा भासत असला, तरी प्रत्यक्षात हे ठाण्यात होऊ घातलेल्या कामांचे श्रेय घेण्यावरून शिवसेना-भाजपात सुरू असलेला वाद आहे. जसजशा निवडणुका जवळ येतील, तसतसा हा वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला भाजपाला सर करायचा असेल, तर येथे होणाºया कामांचे श्रेय आपले असल्याचे भाजपाला लोकांच्या मनावर ठसवावे लागेल. आयुक्त हा सरकारचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे सत्ताधारी भाजपा कामांचे श्रेय शिवसेनेला मिळू नये, याकरिता आयुक्तांवर दबाव टाकत आहे, तर शिवसेना आयुक्तांना लक्ष्य करून भाजपाला कामांचे श्रेय मिळणार नाही, याकरिता धडपड करत आहे. प्रत्यक्षात ही कामे मार्गी लागेपर्यंत शिंदे यांना जयस्वाल यांची बदली होऊ नये, असे वाटत आहे. कारण, नवीन व्यक्ती पदावर आल्यास सुरू केलेल्या कामांची गती मंदावण्याची व कदाचित प्रस्तावित प्रकल्पांना फाटे फुटण्याची भीती शिंदे यांना वाटते.राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यावर लागलीच आयुक्त आणि पालकमंत्री यांच्यात पुन्हा चर्चा होऊन या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात झालेल्या महासभेत रेंटलच्या घराच्या मुद्यावरून महापौरांनी टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर, अधिकाºयांनी दुसºया दिवशीच्या महासभेला गैरहजर राहून याचा वचपा काढला होता. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर महापौरांनी थेट आयुक्तांवर तोफ डागल्याने आयुक्त उद्विग्न झाले. अगोदर भाजपाने तर आता शिवसेनेने आयुक्तांना खिंडीत गाठले आहे.भाजपातील काही मंडळींनी आयुक्तांविरुद्ध सुरू केलेली मोहीम मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडील बैठकीत आमदार संजय केळकर यांच्या मध्यस्थीनंतर थांबली, तर आता महापौर मीनाक्षी शिंदे यांनी उचल खाल्ली. काही दिवसांपूर्वी महापौर शिंदे व आयुक्त यांच्यातील वादात पालकमंत्री शिंदे यांनी मध्यस्थी केली होती. त्यामुळे महापौर असो की भाजपाचे नगरसेवकही, या वादात शिवसेना, भाजपाच्या नेत्यांकडून वापरली जाणारी प्यादी असून प्रत्यक्षात मूळ लढाई ही शिवसेना-भाजपातील श्रेयाची आहे. मागील दोन वर्षांपासून शहरात होत असलेल्या विविध विकासकामांंमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री शिंदे यांनी आयुक्तांचे तोंडभरून कौतुक केले आहे. असे असतानाही महापौरांनी केलेली टीका आयुक्तांच्या मनाला लागली आहे.