शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

ठाण्यातील व़्यास क्रिएशन्सचा बालखजिना आता नांदेडमध्येही, विद्यार्थ्यांसाठी १०० बालवाचनालये सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 15:29 IST

ठाण्यातील व्यास क्रिएशन्सने सुरू केलेला बालखजिना हा महाराष्ट्रातील निम्म्या जिल्ह्यांत पोहोचला आहे. नांदेडमध्येही हा बालखजिना पोहोचला असून एकाच वेळी त्या ठिकाणी १०० बालवाचनालये सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देबालसाहित्याचा अनमोल २०० पुस्तकांचा खजिना बालकुमारांसाठी उपलब्धव़्यास क्रिएशन्सचा बालखजिना आता नांदेडमध्येही विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचणे हा या मागचा हेतू

ठाणे: आजची पिढी वाचनसमृद्ध व्हावी, मोबाईल, इंटरनेटच्या महाजाळातून दूर करुन त्यांना ज्ञानाच्या व माहितीच्या वटवृक्षाची सावली मिळावी यासाठी ठाण्याच्या व्यास क्रिएशन्सने बालसाहित्याचा अनमोल २०० पुस्तकांचा खजिना बालकुमारांसाठी उपलब्ध करुन दिला आहे. यासाठी वाचनालयांचा आधुनिक आविष्कार असलेल्या बालवाचनालयांची संकल्पना समाजात नव्याने रुजवली. हा खजिना संच जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचावा यासाठी व्यास क्रिएशन्सने संपूर्ण महाराष्ट्राला घातलेली साद नांदेडमध्येही भावले. तेथील विद्यार्थ्यांसाठी या बालखजिन्यांची १०० बालवाचनालये सुरू करण्यात आली आहे.                     आज शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हा या बालवाचनालयाचा मुख्य हेतू.महाराष्ट्रातील जवळजवळ १०० साहित्यिकांनी या संचासाठी लेखन केले आहे. सहज सोपी पुस्तकांची भाषा आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाला पुरक असा हा ज्ञानमनोरंजनाचा खजिना आहे. ‘वाचेल तो वाचेल’ या दृढनिश्चयातून ही बालवाचनालय चळवळ वाढावी या व्यास क्रिएशन्सच्या प्रयत्नांना आ. हेमंत पाटील यांची मोलाची साथ लाभली आणि त्यांच्या सहकार्यातून नांदेड येथे १०० बालवाचनालये सुरू करण्यात आली आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर वाचलेच पाहिजे, वाचनाने माणूस समृद्ध होतो. वाचन चळवळ हीच समाजाला सतत प्रगतीपथावर घेऊन जात असते. म्हणून सतत वाचन केले पाहिजे. तसेच, एक सामाजिक भान म्हणून गरजू रुग्णांसाठी आपण वेळोवेळी रक्तदानही केले पाहिजे अशा शब्दांत मार्गदर्शन केले. यावेळी १०० शाळा, त्या शाळेतील भाषेचे शिक्षक, मुख्यध्यापक, शेकडो मुले एकत्र आले होते. वेगवेगळ््या ठिकाणी बालवाचनालयाचे कसे प्रयोग होत आहेत आणि पुस्तकाचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले. या बालवाचनलयासंदर्भात तांत्रिक अडचणी असतील, प्रोत्साहन हवे असेल, काही सूचना हव्या असतील तर फोनवरुन वेळोवेळी सांगण्यात येणार असल्याचे आवाहन व्यास क्रिएशन्सने केले. या बालखजिन्यात चॉक्लेटपासून चंद्रापर्यंत सर्व विषयांची पुस्तके आहेत. यात रा. ग. जाधव, एकनाथ आव्हाड, डॉ. द. वि. कुलकर्णी, सुमन नवलकर, संजय भास्कर जोशी, विजया राजाध्यक्ष अशा अनेक लेखकांची पुस्तके या संचात आहे. या बालखजिन्याचा प्राथमिक, माध्यमिक विभागातील विद्यार्थी लाभ घेऊ शकतात. आगामी वर्षभरात ज्या जिल्ह्यांत बालवाचनालये सुरू होतील तेथील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कोणती पुस्तके वाचली याबाबत स्पर्धा घेणार असल्याचे व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचणे हा या मागचा हेतू असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्रliteratureसाहित्य