शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

ठाण्यातील व़्यास क्रिएशन्सचा बालखजिना आता नांदेडमध्येही, विद्यार्थ्यांसाठी १०० बालवाचनालये सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 15:29 IST

ठाण्यातील व्यास क्रिएशन्सने सुरू केलेला बालखजिना हा महाराष्ट्रातील निम्म्या जिल्ह्यांत पोहोचला आहे. नांदेडमध्येही हा बालखजिना पोहोचला असून एकाच वेळी त्या ठिकाणी १०० बालवाचनालये सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देबालसाहित्याचा अनमोल २०० पुस्तकांचा खजिना बालकुमारांसाठी उपलब्धव़्यास क्रिएशन्सचा बालखजिना आता नांदेडमध्येही विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचणे हा या मागचा हेतू

ठाणे: आजची पिढी वाचनसमृद्ध व्हावी, मोबाईल, इंटरनेटच्या महाजाळातून दूर करुन त्यांना ज्ञानाच्या व माहितीच्या वटवृक्षाची सावली मिळावी यासाठी ठाण्याच्या व्यास क्रिएशन्सने बालसाहित्याचा अनमोल २०० पुस्तकांचा खजिना बालकुमारांसाठी उपलब्ध करुन दिला आहे. यासाठी वाचनालयांचा आधुनिक आविष्कार असलेल्या बालवाचनालयांची संकल्पना समाजात नव्याने रुजवली. हा खजिना संच जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचावा यासाठी व्यास क्रिएशन्सने संपूर्ण महाराष्ट्राला घातलेली साद नांदेडमध्येही भावले. तेथील विद्यार्थ्यांसाठी या बालखजिन्यांची १०० बालवाचनालये सुरू करण्यात आली आहे.                     आज शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हा या बालवाचनालयाचा मुख्य हेतू.महाराष्ट्रातील जवळजवळ १०० साहित्यिकांनी या संचासाठी लेखन केले आहे. सहज सोपी पुस्तकांची भाषा आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाला पुरक असा हा ज्ञानमनोरंजनाचा खजिना आहे. ‘वाचेल तो वाचेल’ या दृढनिश्चयातून ही बालवाचनालय चळवळ वाढावी या व्यास क्रिएशन्सच्या प्रयत्नांना आ. हेमंत पाटील यांची मोलाची साथ लाभली आणि त्यांच्या सहकार्यातून नांदेड येथे १०० बालवाचनालये सुरू करण्यात आली आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर वाचलेच पाहिजे, वाचनाने माणूस समृद्ध होतो. वाचन चळवळ हीच समाजाला सतत प्रगतीपथावर घेऊन जात असते. म्हणून सतत वाचन केले पाहिजे. तसेच, एक सामाजिक भान म्हणून गरजू रुग्णांसाठी आपण वेळोवेळी रक्तदानही केले पाहिजे अशा शब्दांत मार्गदर्शन केले. यावेळी १०० शाळा, त्या शाळेतील भाषेचे शिक्षक, मुख्यध्यापक, शेकडो मुले एकत्र आले होते. वेगवेगळ््या ठिकाणी बालवाचनालयाचे कसे प्रयोग होत आहेत आणि पुस्तकाचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले. या बालवाचनलयासंदर्भात तांत्रिक अडचणी असतील, प्रोत्साहन हवे असेल, काही सूचना हव्या असतील तर फोनवरुन वेळोवेळी सांगण्यात येणार असल्याचे आवाहन व्यास क्रिएशन्सने केले. या बालखजिन्यात चॉक्लेटपासून चंद्रापर्यंत सर्व विषयांची पुस्तके आहेत. यात रा. ग. जाधव, एकनाथ आव्हाड, डॉ. द. वि. कुलकर्णी, सुमन नवलकर, संजय भास्कर जोशी, विजया राजाध्यक्ष अशा अनेक लेखकांची पुस्तके या संचात आहे. या बालखजिन्याचा प्राथमिक, माध्यमिक विभागातील विद्यार्थी लाभ घेऊ शकतात. आगामी वर्षभरात ज्या जिल्ह्यांत बालवाचनालये सुरू होतील तेथील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कोणती पुस्तके वाचली याबाबत स्पर्धा घेणार असल्याचे व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचणे हा या मागचा हेतू असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्रliteratureसाहित्य