शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

न्यायालयाने पालिकांना फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 01:57 IST

उल्हास नदी प्रदूषण : उपाययोजनांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

कल्याण : उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गंभीर नसल्यावरून कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिका आणि बदलापूर पालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. नदीत सांडपाणी मिसळू नये, यासाठी उपाययोजना करण्याची डेडलाइन न पाळल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त करत सध्या काय आणि किती उपाययोजना केल्या, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी १० एप्रिलला होणार आहे.

उल्हास नदी प्रदूषण रोखण्याच्या मागणीसाठी वनशक्ती संस्थेतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. नदी प्रदूषणप्रकरणी कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ पालिकेसह एमआयडीसी व रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रांना एकूण ९५ कोटींचा दंड आकारला होता; मात्र हा दंड भरण्यास महापालिका व पालिका सक्षम नसल्याने प्रदूषण रोखण्यासाठी अमृत योजनेंतर्गत त्यांना राज्य व केंद्र सरकारने निधी दिला होता. या निधीतून सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारून नाल्याचा प्रवाह वळवून ते पाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेले जाईल. त्यावर प्रक्रिया करून नंतर ते नदीत सोडले जाईल. अमृत योजनेंतर्गत निधी वितरित होऊ नही प्रकल्पाचे काम होत नसल्याने न्यायालयाने संबंधितांना कालबद्ध कार्यक्रम व डेडलाइनसह हमीपत्र देण्याचे सूचित केले होते. त्यावेळी राज्याच्या प्रधान सचिवांच्या सहीनिशी सर्वोच्च न्यायालयास एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते. काही काम मे व काही काम जून २०१८ मध्ये पूर्ण केले जाईल, असे त्यात म्हटले होते. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली.

नाले वळवले गेले नसून सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे कामही पूर्ण झालेले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रदूषण रोखण्याविषयी दृष्टिकोन अत्यंत प्रासंगिक आणि साधारण आहे. त्याकडे या स्थानिक स्वराज्य संस्था गांभीर्याने पाहत नसल्याचे यातून उघड होत असल्याचे सांगत न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनास्थेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुनावणीपूर्वी बुधवारी याचिकाकर्ते व ‘वनशक्ती’चे प्रमुख अश्वीन अघोर यांनी केडीएमसीच्या अधिकाऱ्यांसोबत किती नाले वळवले आणि त्यांचे पाणी सांडपाणी केंद्रात नेले, याची प्रत्यक्ष पाहणी केली. महापालिकेने आठ नाले वळवण्याचे काम हाती घेतले होते. त्यापैकी तीन नाले वळवल्याचा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला होता. प्रत्यक्ष पाहणीत एकही नाला वळवलेला नाही.

केवळ त्याठिकाणी पाइप टाकून ठेवण्यात आले आहेत. या पाइपद्वारे सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नाल्यातून वाहून आलेला कचरा जाऊन केंद्र बंद पडू शकते. त्यामुळे नाल्याच्या तोंडाजवळ लोखंडी जाळी टाकणे गरजेचे होते. ही लोखंडी जाळी टाकण्याचे काम करण्याची गरज अधिकाऱ्यांना वाटत नाही. याविषयी आश्चर्य व्यक्त करून अघोर यांनी हाच मुद्दा व माहिती सुनावणीदरम्यान न्यायालयात सादर केली आहे.नागरिकांच्या जीवाशी खेळ!अघोर यांनी सांगितले की, एकही नाला वळवण्यात आलेला नसल्याने सगळे सांडपाणी प्रक्रिया न करताच उल्हास नदीपात्रात जाऊन मिसळत आहे. त्यामुळे नदी प्रदूषण सुरूच आहे. राज्याच्या प्रधान सचिवांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्राविषयी अशा प्रकारची अनास्था व उदासीनता दिसून येत आहे.उल्हास नदीच्या पाण्यावर ४८ लाख नागरिकांची तहान भागवली जाते. नदी प्रदूषण रोखण्याविषयीच्या अनास्थेमुळे या स्थानिक स्वराज्य संस्था नागरिकांच्या जीवाशी, पर्यावरणाशी आणि नदीतील जैवविविधतेची खेळत आहेत, याचा गांभीर्याने विचार केला जाणे गरजेचे आहे.