शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारमुळे त्या संगणक चालकांच्या कायम सेवेतील मार्ग झाला सुकर?; आपल्याच आदेशाला सरकारने दिली स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 17:51 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या संगणक चालकांनी सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करुन प्रसंगी कामबंद आंदोलनही छेडले.

- राजू काळे भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या संगणक चालकांनी सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करुन प्रसंगी कामबंद आंदोलनही छेडले. त्यावर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत त्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावुन घेऊ नये, असा आदेश ९ फेब्रुवारीला काढला. यानंतर याच आदेशाला राज्य सरकारने स्थगिती दिल्याचा आदेश ७ मार्चला काढल्याने त्या कर्मचाऱ्यांमध्ये कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.    पालिकेने २००७ मध्ये कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या ६७ संगणक चालक व १ लघुलेखकाला तात्पुरत्या स्वरुपात ठोक मानधनावर सामावुन घेतले. मात्र गेल्या ११ वर्षांपासुन सेवा देणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांनी सेवेत कायमस्वरुपी सामावुन घेण्यासाठी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा सुरु केला. प्रशासनाने त्याला सतत खो देत वेळ मारुन नेली. अखेर ४ जानेवारी २०१७ रोजी त्या कर्मचाऱ्यांची मुदत संपुष्टात आल्याने मुदतवाढ देण्याऐवजी त्यांना लिपिक व टंकलेखल वर्ग ३ अनुसार शिक्षणाची अट शिथिल करुन सेवेत कायमस्वरुपी सामावुन घेण्याचा ठराव १९ मे २०१७  रोजीच्या महासभेत सर्वानुमते मंजुर करण्यात आला. तत्पुर्वी त्याला स्थायी समितीची परवानगी आवश्यक असल्याचे  स्पष्ट करुन प्रशासनाने ६ जानेवारी २०१७ पासुन त्या कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांकरीता मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव १० फेब्रुवारी २०१७ रोजीच्या स्थायी समिती बैठकीत सादर केला. त्यावर स्थायीने कोणताही ठोस निर्णय न घेता तो विषय महासभेत पुढील निर्णयासाठी सादर केला जावा, असा ठराव मंजुर केला. यापुर्वी पालिकेने संगणक चालक व लघुलेखक यांच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे २६ जूलै २००६ रोजी मान्यतेसाठी पाठविला होता. तो राज्य सरकारने अमान्य केला. त्यामुळेच १९ मे २०१७ रोजीचा मंजुर ठराव पालिका अधिनियमातील तरतुदीशी विसंगत असल्याचा दावा करीत प्रशासनाने तो तब्बल सहा महिन्यांनी राज्य सरकारकडे रद्द करण्यासाठी पाठविला. यामुळे नाराज झालेल्या कर्मचाऱ्यांनी २२ जानेवारीपासुन बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले. प्रशासनाने राज्य सरकारला पाठविलेल्या पत्रातील वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी आ. नरेंद्र मेहता यांनी २९ डिसेंबर २०१७ रोजी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला. त्याची दखल घेत राज्य सरकारने आ. मेहता यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रानुसार सविस्तर अभिप्राय देण्याचे निर्देश पालिकेला दिले. प्रशासनाने त्या कर्मचाऱ्यांना लिपिक व टंकलेखक पदावर सामावून घेण्याबाबतचे पत्र राज्य सरकारला ५ फेब्रुवारीला पाठविले. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांमध्ये सेवेत कायम होण्याच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या २०१६ मधील आदेशाचा हवाला देत कंत्राटी व तात्पुरत्या स्वरुपात निर्माण करण्यात आलेली पदे कायमस्वरुपी समजली जाऊ नयेत, असा आदेश ९ फेब्रुवारीला काढला. यामुळे त्या कर्मचाऱ्यांच्या आशेवर पुन्हा पाणी फेरले. या आदेशाला एक महिना होत नाही तोवर राज्य सरकारने यापुर्वीच्या सरकारी परिपत्रकातील सुचनांचा फेरविचार करण्यात येत असल्याचे नमुद करीत ९ फेब्रुवारीच्या आदेशाला स्थगिती दिल्याचा आदेश ७ मार्चला काढला.