शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

लष्करी वर्दीचा प्रभाव कमी झाल्याने नोकरकपात, निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 01:00 IST

सैन्यदलात गणवेशापेक्षा नागरी विभागाचे महत्त्व वाढले आहे. परिणामी सैन्यात गणवेशधारी अधिकाऱ्यांचे महत्व ४० टक्के आणि नागरी विभागाचे ६० टक्के झाले आहे. ते उलट असायला हवे.

- निलेश धोपेश्वरकरठाणे : सैन्यदलात गणवेशापेक्षा नागरी विभागाचे महत्त्व वाढले आहे. परिणामी सैन्यात गणवेशधारी अधिकाऱ्यांचे महत्व ४० टक्के आणि नागरी विभागाचे ६० टक्के झाले आहे. ते उलट असायला हवे. नागरी विभाग वरचढ झाल्याने गणवेशातील अधिकाºयांना त्याचा त्रास होतो. जो जवान प्रत्यक्ष फिल्डवर असतो त्यालाच समस्यांची योग्य प्रकारे जाण असते. मात्र दिल्लीत नागरी विभागात अनेकवर्षे काम करीत असलेल्या अधिकाºयांचा प्रभाव वाढत असल्याने कदाचित अशा प्रकारचे जवानांच्या नोकरकपातीचे निर्णय घेतले जाऊ शकतात अशा शब्दांत काही निवृत्त लष्करी अधिकाºयांनी नाराजी प्रकट केली. मात्र काही निवृत्त लष्करी अधिकाºयांच्या मते जवानांच्या नोकºया जाणार म्हणजे ते बेरोजगार होणार नाहीत तर त्यांना दुसºया विभागात सामावून घेतले जाईल.मंदी आली की खर्च कमी करण्याकरिता नोकरकपातीसारखे पाऊल उचलले जाते. खासगी क्षेत्रात अशा प्रकारचे निर्णय हे नेहमीच घेतले जातात. पण आता सैन्यातही जवानांना कमी करण्याच्यादृष्टीने केंद्र सरकारच्या पातळीवर हालचाली सुरू असून २७ हजार जवानांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या निर्णयाबाबत माजी लष्करी अधिकाºयांनी चिंता व्यक्त केली आहे. खर्चात कपात करणे निश्चितच स्वागतार्ह आहे, मात्र ती चुकीच्या ठिकाणी होणे हे देशाच्या सुरक्षेकरिता धोकादायक असल्याचे माजी अधिकाºयांनी नमूद केले. आज दुर्दैवाने सैन्यदलात गणवेशापेक्षा नागरी विभागाचे महत्व वाढले असल्याची खंत या अधिकाºयांनी व्यक्त केली. वास्तविक सैन्यात गणवेशधारी अधिकाºयांचे महत्व हे सर्वाधिक असायला हवे. प्रत्यक्षात ४० टक्के गणवेशधारींचे महत्त्व आणि नागरी विभागाचे ६० टक्के झाले आहे. हे प्रमाण उलट असायला हवे.नागरी विभाग वरचढ ठरल्याने गणवेशातील अधिकाºयांना त्याचा त्रास होतो. जो जवान प्रत्यक्ष सीमेवर लढत असतो त्यालाच समस्यांची योग्य प्रकारे जाण असते. मात्र दिल्लीत नागरी विभागात अनेकवर्षे काम करत असलेल्या अधिकाºयांचा प्रभाव वाढल्याने कदाचित अशा प्रकारचे निर्णय घेतले जाऊ शकतात, असे या अधिकाºयांचे म्हणणे आहे. गणवेशातील अधिकारी हे ‘अ’ वर्गात मोडतात तर नागरी विभाग हा ‘ब’ वर्गात मोडतो, असेही या अधिकाºयांनी सांगितले.अन्य काही निवृत्त अधिकाºयांचे म्हणणे असे की, जवानांच्या नोकरीवर गदा येणार या वृत्ताने घाबरून जाण्याचे कारण नाही. याकडे नकारात्मक दृष्टीकोनापेक्षा सकारात्मक नजरेने पाहिले पाहिजे. जेथे गरज आहे तेथे जवानच नियुक्त केले जाणार आहेत. मात्र जेथे आवश्यक आहेत तेवढेच जवान नियुक्त करुन बाकीच्यांना अन्य ठिकाणी सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. आज काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांसोबत निमलष्करी दल, सीमा सुरक्षा बल यांचेही जवान कार्यरत आहेत. कदाचित अन्य दलांमध्ये त्यांना सामावून घेण्याचाही सरकार विचार करेल, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या नोकरीत खास करून सैन्य दलात कुणचीही कपात केली जात नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आधुनिकीकरणाच्या दृष्टीने काही पावले उचलली जाण्याची दाट शक्यता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.जवान कमी केल्यास १६ अब्ज वाचणारया जवानांना कमी केल्यास १६ अब्ज रुपये वाचतील असा अंदाज आहे. सैन्यात सध्या १२.५० लाख जवान कार्यरत आहेत. त्यांच्या वेतन आणि इतर भत्त्यांवर मोठा खर्च करावा लागतो. सध्या सैन्याच्या इंजिनीयर सर्व्हीसेस, नॅशनल कॅडेट कॉर्प्स, बॉर्डर रोड आॅर्गनायझेशन, टेरिटिरियल आर्मी, सैनिक शाळांमध्ये १. ७५ अधिकारी आणि जवान कार्यरत आहेत. या जवानांचा समावेश कायमस्वरूपी तैनात असलेल्या जवानांमध्ये होत नाही. या जवानांच्या संख्येत कपात केली जाणार आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान