शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

तलावांमध्ये उभारलेल्या काँक्रीट भिंतीवरून नगरसेवक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 18:11 IST

शहरातील सार्वजनिक तलावात पर्यावरण व माश्याना घातक अश्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या रासायनिक रंगाच्या श्रीगणेश व देवीच्या मूर्त्यांचे विसर्जन केले जाते.

मीरारोड - पाणथळ म्हणून संरक्षित असलेल्या नैसर्गिक तलावांमध्ये चक्क काँक्रीटच्या भिंती बांधण्याच्या मीरा भाईंदर महापालिकेच्या भोंगळ पण मस्तवाल कारभारा विरुद्ध महासभेत नगरसेवकांनी जाब विचारला. महापौरांनी देखील या प्रकरणी कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. तलावातील भिंतीचा प्रकार लोकमतने समोर आणला होता. 

शहरातील सार्वजनिक तलावात पर्यावरण व माश्याना घातक अश्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या रासायनिक रंगाच्या श्रीगणेश व देवीच्या मूर्त्यांचे विसर्जन केले जाते. या मुळे तलाव प्रदूषित होऊन मासे मरतात तसेच दुर्गंधी पसरते. वास्तविक शाडू मातीच्या मूर्ती बंधनकारक करण्यासह कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन सक्तीचे करण्या ऐवजी महापालिकेने तर थेट तालावांचाच बळी घेतला आहे. 

महापालिकेने शहरातील राई, जरीमरी, साईदत्त, सातकरी, गावदेवी, मोर्वा, नवघर जुना, राव, शिवार, एस.एन.कॉलेज समोर, नास्का, गोडदेव, मांदली अशा 13 तलावां मध्ये भिंत बांधुन विसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचा ठेका दिला. या कामाचे २ कोटी ८७ लाखांचे अंदाजपत्रक असले तरी ठेका मात्र तब्बल १६.८८ टक्के वाढिव दराने बोरीवलीच्या स्पार्क सिव्हील इंन्फ्राप्रोजेक्टस या एकाच ठेकेदार कंपनीस दिला.

अनेक तलावात पालिकेने आधीच बेकायदेशीर भराव, कुंपणभिंती सह अन्य विविध बांधकामे केलेली आहे. त्यातच आता मुर्ति विसर्जनाच्या नावाखाली तलावांचे नैसर्गिक अस्तित्वच नष्ट केले आहे. तलावां मध्ये मोठय़ा स्वरुपात काँक्रीट भिंती बांधण्याचे काम केले आहे. मीरारोडच्या शिवार तलावात तर पालिकेने  मध्यभागातच काँक्रिटची भिंत बांधून  तलावाचे दोन तुकडे पाडून टाकले आहे. वास्तविक शिवार उद्यान हे संरक्षित पाणथळ असताना पालिकेच्या बांधकाम विभागाने हा प्रताप केला आहे. 

तलावांचे भिंती उभारून वाटोळे केल्याच्या मुद्द्यावर भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील व काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत यांनी संताप व्यक्त केला. पाणथळ म्हणून तलाव संरक्षित असून मुंबई उच्च न्यायालयाने देखील तसे आदेश दिले आहेत. तरी देखील तलावां मध्ये भिंती बांधण्यात आल्या. ह्या भिंती काढून तलावांचे नैसर्गिक सौंदर्य जपावे अशी आग्रही मागणी करण्यात आली. महापौर  ज्योत्स्ना हसनाळे यांनी देखील पालिका प्रशासनास कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

तलाव हे शहराची नैसर्गिक संपत्ती व शान आहेत. पर्यावरणाचे महत्वसह नागरिकांच्या विरंगुळ्यासाठीचे आकर्षण आहे. पण तलावांमध्ये भीती घालणे म्हणजे मुजोरोपणा असल्याचा संताप व्यक्त करत तलावातील भिंती काढून टाका अशी मागणी पाटील, सावंत आदी नगरसेवकांनी केली आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक