शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

तलावांमध्ये उभारलेल्या काँक्रीट भिंतीवरून नगरसेवक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 18:11 IST

शहरातील सार्वजनिक तलावात पर्यावरण व माश्याना घातक अश्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या रासायनिक रंगाच्या श्रीगणेश व देवीच्या मूर्त्यांचे विसर्जन केले जाते.

मीरारोड - पाणथळ म्हणून संरक्षित असलेल्या नैसर्गिक तलावांमध्ये चक्क काँक्रीटच्या भिंती बांधण्याच्या मीरा भाईंदर महापालिकेच्या भोंगळ पण मस्तवाल कारभारा विरुद्ध महासभेत नगरसेवकांनी जाब विचारला. महापौरांनी देखील या प्रकरणी कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. तलावातील भिंतीचा प्रकार लोकमतने समोर आणला होता. 

शहरातील सार्वजनिक तलावात पर्यावरण व माश्याना घातक अश्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या रासायनिक रंगाच्या श्रीगणेश व देवीच्या मूर्त्यांचे विसर्जन केले जाते. या मुळे तलाव प्रदूषित होऊन मासे मरतात तसेच दुर्गंधी पसरते. वास्तविक शाडू मातीच्या मूर्ती बंधनकारक करण्यासह कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन सक्तीचे करण्या ऐवजी महापालिकेने तर थेट तालावांचाच बळी घेतला आहे. 

महापालिकेने शहरातील राई, जरीमरी, साईदत्त, सातकरी, गावदेवी, मोर्वा, नवघर जुना, राव, शिवार, एस.एन.कॉलेज समोर, नास्का, गोडदेव, मांदली अशा 13 तलावां मध्ये भिंत बांधुन विसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचा ठेका दिला. या कामाचे २ कोटी ८७ लाखांचे अंदाजपत्रक असले तरी ठेका मात्र तब्बल १६.८८ टक्के वाढिव दराने बोरीवलीच्या स्पार्क सिव्हील इंन्फ्राप्रोजेक्टस या एकाच ठेकेदार कंपनीस दिला.

अनेक तलावात पालिकेने आधीच बेकायदेशीर भराव, कुंपणभिंती सह अन्य विविध बांधकामे केलेली आहे. त्यातच आता मुर्ति विसर्जनाच्या नावाखाली तलावांचे नैसर्गिक अस्तित्वच नष्ट केले आहे. तलावां मध्ये मोठय़ा स्वरुपात काँक्रीट भिंती बांधण्याचे काम केले आहे. मीरारोडच्या शिवार तलावात तर पालिकेने  मध्यभागातच काँक्रिटची भिंत बांधून  तलावाचे दोन तुकडे पाडून टाकले आहे. वास्तविक शिवार उद्यान हे संरक्षित पाणथळ असताना पालिकेच्या बांधकाम विभागाने हा प्रताप केला आहे. 

तलावांचे भिंती उभारून वाटोळे केल्याच्या मुद्द्यावर भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील व काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत यांनी संताप व्यक्त केला. पाणथळ म्हणून तलाव संरक्षित असून मुंबई उच्च न्यायालयाने देखील तसे आदेश दिले आहेत. तरी देखील तलावां मध्ये भिंती बांधण्यात आल्या. ह्या भिंती काढून तलावांचे नैसर्गिक सौंदर्य जपावे अशी आग्रही मागणी करण्यात आली. महापौर  ज्योत्स्ना हसनाळे यांनी देखील पालिका प्रशासनास कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

तलाव हे शहराची नैसर्गिक संपत्ती व शान आहेत. पर्यावरणाचे महत्वसह नागरिकांच्या विरंगुळ्यासाठीचे आकर्षण आहे. पण तलावांमध्ये भीती घालणे म्हणजे मुजोरोपणा असल्याचा संताप व्यक्त करत तलावातील भिंती काढून टाका अशी मागणी पाटील, सावंत आदी नगरसेवकांनी केली आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक