शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

तलावांमध्ये उभारलेल्या काँक्रीट भिंतीवरून नगरसेवक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 18:11 IST

शहरातील सार्वजनिक तलावात पर्यावरण व माश्याना घातक अश्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या रासायनिक रंगाच्या श्रीगणेश व देवीच्या मूर्त्यांचे विसर्जन केले जाते.

मीरारोड - पाणथळ म्हणून संरक्षित असलेल्या नैसर्गिक तलावांमध्ये चक्क काँक्रीटच्या भिंती बांधण्याच्या मीरा भाईंदर महापालिकेच्या भोंगळ पण मस्तवाल कारभारा विरुद्ध महासभेत नगरसेवकांनी जाब विचारला. महापौरांनी देखील या प्रकरणी कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. तलावातील भिंतीचा प्रकार लोकमतने समोर आणला होता. 

शहरातील सार्वजनिक तलावात पर्यावरण व माश्याना घातक अश्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या रासायनिक रंगाच्या श्रीगणेश व देवीच्या मूर्त्यांचे विसर्जन केले जाते. या मुळे तलाव प्रदूषित होऊन मासे मरतात तसेच दुर्गंधी पसरते. वास्तविक शाडू मातीच्या मूर्ती बंधनकारक करण्यासह कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन सक्तीचे करण्या ऐवजी महापालिकेने तर थेट तालावांचाच बळी घेतला आहे. 

महापालिकेने शहरातील राई, जरीमरी, साईदत्त, सातकरी, गावदेवी, मोर्वा, नवघर जुना, राव, शिवार, एस.एन.कॉलेज समोर, नास्का, गोडदेव, मांदली अशा 13 तलावां मध्ये भिंत बांधुन विसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचा ठेका दिला. या कामाचे २ कोटी ८७ लाखांचे अंदाजपत्रक असले तरी ठेका मात्र तब्बल १६.८८ टक्के वाढिव दराने बोरीवलीच्या स्पार्क सिव्हील इंन्फ्राप्रोजेक्टस या एकाच ठेकेदार कंपनीस दिला.

अनेक तलावात पालिकेने आधीच बेकायदेशीर भराव, कुंपणभिंती सह अन्य विविध बांधकामे केलेली आहे. त्यातच आता मुर्ति विसर्जनाच्या नावाखाली तलावांचे नैसर्गिक अस्तित्वच नष्ट केले आहे. तलावां मध्ये मोठय़ा स्वरुपात काँक्रीट भिंती बांधण्याचे काम केले आहे. मीरारोडच्या शिवार तलावात तर पालिकेने  मध्यभागातच काँक्रिटची भिंत बांधून  तलावाचे दोन तुकडे पाडून टाकले आहे. वास्तविक शिवार उद्यान हे संरक्षित पाणथळ असताना पालिकेच्या बांधकाम विभागाने हा प्रताप केला आहे. 

तलावांचे भिंती उभारून वाटोळे केल्याच्या मुद्द्यावर भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील व काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत यांनी संताप व्यक्त केला. पाणथळ म्हणून तलाव संरक्षित असून मुंबई उच्च न्यायालयाने देखील तसे आदेश दिले आहेत. तरी देखील तलावां मध्ये भिंती बांधण्यात आल्या. ह्या भिंती काढून तलावांचे नैसर्गिक सौंदर्य जपावे अशी आग्रही मागणी करण्यात आली. महापौर  ज्योत्स्ना हसनाळे यांनी देखील पालिका प्रशासनास कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

तलाव हे शहराची नैसर्गिक संपत्ती व शान आहेत. पर्यावरणाचे महत्वसह नागरिकांच्या विरंगुळ्यासाठीचे आकर्षण आहे. पण तलावांमध्ये भीती घालणे म्हणजे मुजोरोपणा असल्याचा संताप व्यक्त करत तलावातील भिंती काढून टाका अशी मागणी पाटील, सावंत आदी नगरसेवकांनी केली आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक