शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

coronavirus: क्वारंटाईन 66 हजार जणांवर वाॅच कोणाचा? प्रशासनाचे दुर्लक्ष, काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 01:23 IST

Thane coronavirus: ठाणे जिल्ह्यात तब्बल ६५ हजार ८४८ होम क्वारंटाइन रुग्ण असून, त्यांच्याकडे पूर्वीप्रमाणे गंभीरपणे लक्ष दिले जात नसल्याची बाब समोर आली आहे.

- अजित मांडके ठाणे - दिवाळीनंतर कोरोना रुग्णांसोबतच होम क्वारंटाइन केलेल्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. जिल्ह्यात तब्बल ६५ हजार ८४८ होम क्वारंटाइन रुग्ण असून, त्यांच्याकडे पूर्वीप्रमाणे गंभीरपणे लक्ष दिले जात नसल्याची बाब समोर आली आहे. आरोग्य केंद्रातील नर्स एकदाच घरी जाऊन विचारपूस करीत असून, एकदा औषधे दिल्यानंतर त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे वास्तव आहे.सुरुवातीच्या काळात लक्षणे नसलेल्या रुग्णांवर यंत्रणेचा करडा वाॅच असायचा. रुग्ण आढळल्यानंतर तो परिसर किंवा इमारत सील केली जात होती. आता तेवढे गांभीर्य दिसत नाही. रुग्ण पॉझिटिव्ह आला आणि लक्षणे नसली, तर रुग्ण घरच्या घरी औषधे घेत आहेत. पालिकेकडून फारसे लक्ष दिले जात नाही. रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आशा वर्कर घरी येऊन त्यांना औषधोपचार देत आहेत, परंतु रोज देखरेख ठेवली जात नाही. 

होम क्वारंटाईन रूग्णांचे काय?  कोरोना रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली, तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्यात होम क्वारंटाइन रुग्णांची संख्या ही ३४ लाख ३६ हजार १३४ एवढी होती. त्यानंतर, आजघडीला ६५ हजार ८४८ रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. पूर्वी ज्या पद्धतीने या रुग्णांवर देखरेख ठेवली जात होती, ती आता ठेवली जात नाही. पूर्वीसारखे काळजीपूर्वक आता लक्ष दिले जात नसल्याचे सूत्रांनी सांगितले.   एखाद्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर त्याला आधी कोणता त्रास होत आहे का, याची विचारपूस केली जाते. त्याला त्रास नसेल, तर घरीच राहण्याचा सल्ला दिला जात असून, त्यालाच ऑक्सिजन लेव्हल तपासण्यास सांगितले जाते. त्यानंतर, त्याला औषधे दिली जात आहेत, परंतु त्यानंतर केवळ फोनवरून त्रास वाढला आहे का, याची विचारपूस केली जाते.  

होम क्वारंटाइन रुग्णांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही त्या-त्या महापालिकांची असते. त्यानुसार, त्यांच्याकडून मेडिकल स्टाफ यासाठी दिला जात आहे. तसेच त्यांच्याकडूनच अशा रुग्णांवर देखरेख ठेवली जात आहे.- कैलाश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे जिल्हा रुग्णालय

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे