शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

Coronavirus: मुंबई कामावर जाणाऱ्यांनी ठाण्याच्या वेशीवरून परत जा; महापालिकांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 07:19 IST

मुंबईला कामावर जाणाऱ्यांनी माघारी न येण्याची भूमिका; जिथे काम तिथेच कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था करण्याची सूचना

कल्याण/अंबरनाथ/उल्हासनगर : ठाणे जिल्ह्याची वेस ओलांडून नोकरीनिमित्त मुंबईकडे जाणारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सरकारी व बँक कर्मचारी घराकडे परतत असल्याने जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, उल्हासनगर आदी शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचा स्थानिक महापालिका प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे मुंबईला नोकरीला जाणाºयांची त्यांच्या त्यांच्या आस्थापनांनी तूर्त तेथेच निवासाची व्यवस्था करावी व या मंडळींनी वेशीवरून परत जावे, असे आदेश महापालिका प्रशासनाने काढले आहेत.

अगोदर सरकारी कार्यालयातील उपस्थिती पाच टक्के होती. सरकारने हळूहळू कर्मचाºयांची उपस्थिती वाढवली. सोमवारपासून तर शंभर टक्के कर्मचाºयांची उपस्थिती असावी, असा आदेश काढला. पोलीस, डॉक्टर, रुग्णालयात काम करणारे कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत असल्याने त्यांच्यासाठी ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथून बेस्ट, एसटी बसची सोय केली आहे. रोज हजारो कर्मचारी मुंबईत कामाला जातात. मात्र, या कर्मचाºयांमुळेच ते ज्या शहरात राहतात तेथे रुग्ण वाढत असल्याचे स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या कर्मचाºयांची ते नोकरी करतात तेथेच निवासाची सोय करावी, अशी मागणी केली आहे. कामावर गेले नाही तर सरकार कारवाई करण्याची भीती आणि कामावर गेले तर घरी परत न येण्याचे आदेश यामुळे या कर्मचाºयांबरोबरच त्यांचे कुटुंबही अस्वस्थ झाले आहेत. एकीकडे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांची प्रशंसा होत असताना दुसरीकडे त्यांना घरी येण्यास मज्जाव करणे ही दुटप्पी भूमिका असल्याचे या कर्मचाºयांचे मत आहे.उल्हासनगरात राहणार प्रतिबंधउल्हासनगर : मुंबईत सरकारी आणि खासगी कार्यालयात जाणाºया कर्मचाºयांना ८ मेपासून शहरात ये-जा करण्यास प्रतिबंध घातले आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे. मुंबई पालिकेत काम करणाºया कर्मचाºयांची निवासाची व्यवस्था पालिकेतर्फे हॉटेलमध्ये केली जाणार असून खासगी कार्यालयात काम करणाºयांनी त्यांची निवासाची व्यवस्था स्वत: करावी, असेही आयुक्तांनी नमूद केले आहे.अंबरनाथ / बदलापूर : मुंबईत काम करणाºया कर्मचाºयांना मुंबईतच राहण्याचे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेप्रमाणेच आता अंबरनाथ पालिकेनेही काढले आहेत. शुक्रवारपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. बदलापूर नगरपालिकेनेही असाच निर्णय घेण्याची गरज आहे.

मुंबईत काम करणारे कर्मचारी कोरोनाग्रस्त होत असल्याने त्याचा धोका आता अंबरनाथमधील नागरिकांना होत आहे. शहरासोबत सर्वाधिक धोका हा त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना होत आहे. हीच परिस्थिती बदलापूरच्या बाबतीत झाली आहे. बदलापूरमध्येही मुंबईत काम करणाºया कर्मचाºयांना कोरोनाचा धोका असून त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांमध्येही भीती आहे. बदलापूरमध्येही अनेक रुग्ण हे मुंबईशी संबंधित आहेत. त्यांच्यामुळे निकटवर्तीयांना कोरोनाची लागण झाली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस