शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
6
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
7
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
8
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
9
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
10
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
11
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
12
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
13
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
14
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
15
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
16
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
17
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
19
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
20
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 

Coronavirus: मुंबई कामावर जाणाऱ्यांनी ठाण्याच्या वेशीवरून परत जा; महापालिकांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 07:19 IST

मुंबईला कामावर जाणाऱ्यांनी माघारी न येण्याची भूमिका; जिथे काम तिथेच कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था करण्याची सूचना

कल्याण/अंबरनाथ/उल्हासनगर : ठाणे जिल्ह्याची वेस ओलांडून नोकरीनिमित्त मुंबईकडे जाणारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सरकारी व बँक कर्मचारी घराकडे परतत असल्याने जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, उल्हासनगर आदी शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचा स्थानिक महापालिका प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे मुंबईला नोकरीला जाणाºयांची त्यांच्या त्यांच्या आस्थापनांनी तूर्त तेथेच निवासाची व्यवस्था करावी व या मंडळींनी वेशीवरून परत जावे, असे आदेश महापालिका प्रशासनाने काढले आहेत.

अगोदर सरकारी कार्यालयातील उपस्थिती पाच टक्के होती. सरकारने हळूहळू कर्मचाºयांची उपस्थिती वाढवली. सोमवारपासून तर शंभर टक्के कर्मचाºयांची उपस्थिती असावी, असा आदेश काढला. पोलीस, डॉक्टर, रुग्णालयात काम करणारे कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत असल्याने त्यांच्यासाठी ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथून बेस्ट, एसटी बसची सोय केली आहे. रोज हजारो कर्मचारी मुंबईत कामाला जातात. मात्र, या कर्मचाºयांमुळेच ते ज्या शहरात राहतात तेथे रुग्ण वाढत असल्याचे स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या कर्मचाºयांची ते नोकरी करतात तेथेच निवासाची सोय करावी, अशी मागणी केली आहे. कामावर गेले नाही तर सरकार कारवाई करण्याची भीती आणि कामावर गेले तर घरी परत न येण्याचे आदेश यामुळे या कर्मचाºयांबरोबरच त्यांचे कुटुंबही अस्वस्थ झाले आहेत. एकीकडे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांची प्रशंसा होत असताना दुसरीकडे त्यांना घरी येण्यास मज्जाव करणे ही दुटप्पी भूमिका असल्याचे या कर्मचाºयांचे मत आहे.उल्हासनगरात राहणार प्रतिबंधउल्हासनगर : मुंबईत सरकारी आणि खासगी कार्यालयात जाणाºया कर्मचाºयांना ८ मेपासून शहरात ये-जा करण्यास प्रतिबंध घातले आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे. मुंबई पालिकेत काम करणाºया कर्मचाºयांची निवासाची व्यवस्था पालिकेतर्फे हॉटेलमध्ये केली जाणार असून खासगी कार्यालयात काम करणाºयांनी त्यांची निवासाची व्यवस्था स्वत: करावी, असेही आयुक्तांनी नमूद केले आहे.अंबरनाथ / बदलापूर : मुंबईत काम करणाºया कर्मचाºयांना मुंबईतच राहण्याचे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेप्रमाणेच आता अंबरनाथ पालिकेनेही काढले आहेत. शुक्रवारपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. बदलापूर नगरपालिकेनेही असाच निर्णय घेण्याची गरज आहे.

मुंबईत काम करणारे कर्मचारी कोरोनाग्रस्त होत असल्याने त्याचा धोका आता अंबरनाथमधील नागरिकांना होत आहे. शहरासोबत सर्वाधिक धोका हा त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना होत आहे. हीच परिस्थिती बदलापूरच्या बाबतीत झाली आहे. बदलापूरमध्येही मुंबईत काम करणाºया कर्मचाºयांना कोरोनाचा धोका असून त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांमध्येही भीती आहे. बदलापूरमध्येही अनेक रुग्ण हे मुंबईशी संबंधित आहेत. त्यांच्यामुळे निकटवर्तीयांना कोरोनाची लागण झाली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस