शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

Coronavirus : ब्रेक द चेनच्या तिसऱ्या स्तरातील र्निबधात ठाणे जिल्ह्यातील गावपाड्यांबरोबर आता शहारांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 18:00 IST

Coronavirus Break The Chain : तिसऱ्या स्तरातील समावेशाचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी उशिरा जारी केले. मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंदच राहणार.

ठळक मुद्दे तिसऱ्या स्तरातील समावेशाचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी उशिरा जारी केले.मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंदच राहणार.

ठाणे : संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता आणि काही ठिकाणी आढळून आलेल्या डेल्टा प्लस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने नवे आदेश जारी केले आहे. या आदेशास अनुसरून ठाणे जिल्ह्यातील गांवपाड्यांप्रामाणेच शहरांमध्येही आता कोरोनाच्या ब्रेक द चेनच्या तिसऱ्या स्तरातील निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. जिल्ह्यातील गावपाडे आधीच या तिसऱ्या स्तराचे निर्बंध पाळत आहे. मात्र सोमवारपासून ठाण्यासह कल्याण-डोंबिवली (केडीएमसी) आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रलाही तिसऱ्या स्तरांच्या निर्बंधांचे पालन सोमवारपासून कटाकक्षाने करावे लागणार आहे. या तिसऱ्या स्तरातील समावेशाचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी उशिरा जारी केले आहेत.

ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने ठिकठिकाणी लागू केलेले निर्बंध आता पुन्हा बदलले आहेत. त्यात जिल्ह्यातील ठाणे मनपासह केडीएमसी नवी मुंबई महापालिका क्षेत्राचा कोरोना प्रतिबंधात्मक नियमातील तिसऱ्या स्तरात समावेश झाला आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस या नवीन प्रकारामुळे राज्य शासनाने सर्व राज्यभर स्तर ३ चे निर्बंध लागू केले आहेत. हा आदेश २८ जूनपासून पुढील आदेशार्पयत अंमलात राहणार आहे. यामुळे आता गांवखेड्यांप्रमाणोच शहरांमध्येही सर्व व्यवहार संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहतील तर दुकाने संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील. त्यामुळे संध्याकाळी ५ नंतर बाहेर फिरण्यावर बंधने आली आहेत.

मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंदचयाशिवाय या तिसऱ्या स्तराचे निर्बंध मॉल, चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद असतील. उपहारगृहे पूर्वीप्रमाणो मात्र क्षमतेच्या ५० टक्के सायंकाळी ४ वाजेपर्यंतच खुली ठेवता येतील. सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत सकाळी बाहेर फिरता येईल. मैदाने खुली राहतील, सायकलिंग करता येईल. खाजगी कार्यालयंही ५० टक्के क्षमतेसह ४ वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. सरकारी कार्यालयंही ५० टक्के क्षमतेसह ४ वाजेपर्यंत खुली राहतील. लग्न समारंभ आयोजित करताना हॉलच्या क्षमतेनुसार ५० टक्के क्षमता वापरता येईल. त्यामुळे आता ठाणे शहरातही जिल्ह्यातील गावपाड्यांप्रमाणेच निर्बंध लागू राहणार आहेत. तर मिरा भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर आदी महापालिका, अंबरनाथ व बदलापूर नगर परिषदा, शहापूर, मुरबाड नगरपंचायती आणि पाच तालुक्यातील ग्रामीण क्षेत्राचे निर्बंध जैसे थे असे राहतील. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे