शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ब्रेक द चेनच्या तिसऱ्या स्तरातील र्निबधात ठाणे जिल्ह्यातील गावपाड्यांबरोबर आता शहारांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 18:00 IST

Coronavirus Break The Chain : तिसऱ्या स्तरातील समावेशाचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी उशिरा जारी केले. मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंदच राहणार.

ठळक मुद्दे तिसऱ्या स्तरातील समावेशाचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी उशिरा जारी केले.मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंदच राहणार.

ठाणे : संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता आणि काही ठिकाणी आढळून आलेल्या डेल्टा प्लस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने नवे आदेश जारी केले आहे. या आदेशास अनुसरून ठाणे जिल्ह्यातील गांवपाड्यांप्रामाणेच शहरांमध्येही आता कोरोनाच्या ब्रेक द चेनच्या तिसऱ्या स्तरातील निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. जिल्ह्यातील गावपाडे आधीच या तिसऱ्या स्तराचे निर्बंध पाळत आहे. मात्र सोमवारपासून ठाण्यासह कल्याण-डोंबिवली (केडीएमसी) आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रलाही तिसऱ्या स्तरांच्या निर्बंधांचे पालन सोमवारपासून कटाकक्षाने करावे लागणार आहे. या तिसऱ्या स्तरातील समावेशाचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी उशिरा जारी केले आहेत.

ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने ठिकठिकाणी लागू केलेले निर्बंध आता पुन्हा बदलले आहेत. त्यात जिल्ह्यातील ठाणे मनपासह केडीएमसी नवी मुंबई महापालिका क्षेत्राचा कोरोना प्रतिबंधात्मक नियमातील तिसऱ्या स्तरात समावेश झाला आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस या नवीन प्रकारामुळे राज्य शासनाने सर्व राज्यभर स्तर ३ चे निर्बंध लागू केले आहेत. हा आदेश २८ जूनपासून पुढील आदेशार्पयत अंमलात राहणार आहे. यामुळे आता गांवखेड्यांप्रमाणोच शहरांमध्येही सर्व व्यवहार संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहतील तर दुकाने संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील. त्यामुळे संध्याकाळी ५ नंतर बाहेर फिरण्यावर बंधने आली आहेत.

मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंदचयाशिवाय या तिसऱ्या स्तराचे निर्बंध मॉल, चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद असतील. उपहारगृहे पूर्वीप्रमाणो मात्र क्षमतेच्या ५० टक्के सायंकाळी ४ वाजेपर्यंतच खुली ठेवता येतील. सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत सकाळी बाहेर फिरता येईल. मैदाने खुली राहतील, सायकलिंग करता येईल. खाजगी कार्यालयंही ५० टक्के क्षमतेसह ४ वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. सरकारी कार्यालयंही ५० टक्के क्षमतेसह ४ वाजेपर्यंत खुली राहतील. लग्न समारंभ आयोजित करताना हॉलच्या क्षमतेनुसार ५० टक्के क्षमता वापरता येईल. त्यामुळे आता ठाणे शहरातही जिल्ह्यातील गावपाड्यांप्रमाणेच निर्बंध लागू राहणार आहेत. तर मिरा भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर आदी महापालिका, अंबरनाथ व बदलापूर नगर परिषदा, शहापूर, मुरबाड नगरपंचायती आणि पाच तालुक्यातील ग्रामीण क्षेत्राचे निर्बंध जैसे थे असे राहतील. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे