शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
3
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
4
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
5
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
6
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
7
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
8
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
9
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
10
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
11
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
12
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
13
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
14
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
15
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
16
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
17
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
18
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
19
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
20
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव

Coronavirus: ...तर २० हजारांहून जास्त उद्योगांना फटका, उद्योजकांना भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 02:39 IST

मंदीमुळे आधीच बेहाल, विकलेल्या उत्पादनाचेही पैसे थकीत, पगाराचा मुद्दा शासनाने सोडवावा, उद्योजकांची मागणी

- अजित मांडकेठाणे : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनानेखाजगी कंपन्यांच्या ठिकाणी ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तशा सूचना लघुउद्योग किंवा इंडस्ट्रिजला दिल्या नसल्या, तरी असे झाल्यास त्याचा फटका जिल्ह्यातील २० हजारांहून अधिक लघुउद्योगांसह मोठ्या उद्योगांना बसणार आहे. आधीच मंदीमुळे ६० ते ७० टक्के उद्योगांना फटका बसला असताना आता ही वेळ आली, तर कामगारांच्या पगारांबरोबर, बँकेचे हप्ते, कर्जफेड, पीएफची रक्कम, जीएसटीची रक्कम भरणे या सर्वांवर परिणाम होऊन काम बंद झाल्याने येथील उद्योग आणखी मोठ्या संकटात जातील, अशी भीती उद्योजक आता व्यक्त करीत आहेत.आधीच मंदीमुळे जिल्ह्यातील अनेक उद्योग बंद झाले असून ४० टक्के उद्योगांना याचा फटका बसला आहे. त्यात आता ५० टक्के कर्मचारी कमी करण्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे केवळ आयटी कंपनीवाल्यांनाच शक्य आहे. जिल्ह्यातील इतर उद्योगांना हे शक्य नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात स्टील इंडस्ट्री आणि इतर छोटेमोठे उद्योग कसेतरी तग धरून आहेत. कोरोनाचा पहिला फटका या उद्योगांना बसला असून चीनमधून येणारा माल बंद झाला आहे. त्यामुळे त्यांचे उत्पादन १५ ते २० टक्क्यांनी घटले असल्याची माहिती लघुउद्योग संघटनेने दिली आहे. दुसरीकडे अनेक उद्योगांचे उत्पादन विकले गेले असले, तरी त्याचे पैसे आता कोरोनाचे कारण पुढे करून ३१ मार्चनंतरच मिळतील, असेही सांगितले जात आहे.50% कामगार घरी बसवले, तर त्याचा आणखी फटका या इंडस्ट्रीला बसू शकतो. कारण, या फिल्डमध्ये कोणी वेल्डर, फीटर आदींसह इतर काम करणारे कामगार आहेत. त्यामुळे एखादा कामगार आला नाही, तर त्याचे काम कोण करणार आणि दुसरा कामगार असेल तर दुसरा कामगारही बसून राहणार आहे, त्यामुळे काम हे होणारच नाही. हा सर्वात मोठा तोटा आहे, शिवाय परदेशात ५० टक्के कामगारांना घरी बसविले तरी त्यांचा पगार हा शासन देणार आहे.आपल्याकडे शासन यावर काय विचार करीत आहे, त्यावरच पुढील दिशा अवलंबून राहणार आहे. तसेच यामध्ये उत्पादन बंद होण्याची शक्यता जास्तीची असून तसे झाल्यास सर्व गणिते बिघडणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार, जीएसटी भरणे, गव्हर्नमेंटचे इतर टॅक्स, पीएफची रक्कम आदींवरदेखील त्याचा परिणाम होणार आहे. शिवाय, अनेक उद्योगांनी उत्पादने तयार करण्यासाठी बँकांकडून कर्ज काढलेले आहे. परंतु, उत्पादन झाले नाही तर बँकांचे हप्ते थकणार आहेत.त्यामुळे बँक त्याची वसुली करण्यासाठी टोकाची पावले उचलण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आताच एका कंपनीचा पीएफचा हप्ता भरण्यास तेही शासनाची वेबसाइट तीन दिवस हॅक असतानाही उशीर झाल्याने आता तुम्ही या स्कीममध्ये बसू शकत नसल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्याला आयटी रिटर्नमध्येही फटका बसणार आहे. एकूणच कोरोनाचे संकट अधिक गडद झाले, तर उद्योगांना मोठ्या संकटांना सामोरे जाणे भाग पडणार आहे.परदेशात कामगारांच्या पगाराची जबाबदारी शासनाने घेतली आहे. त्यानुसार, शासनाने यातील ५० टक्के रक्कम दिली, तरी यातून काही मार्ग निघू शकणार आहे. आधीच डबघाईला आलेल्या उद्योगांना मात्र कोरोनामुळे फटका बसणार, हे नक्की. - संदीप पारीख, उपाध्यक्ष, टीसामंदीमुळे आधीच उद्योगांना फटका बसला आहे. त्यात आता चीनमधून येणारा मालही बंद झाला आहे. काहींनी केलेल्या कामाचे पैसे ३१ मार्चनंतर देण्याचे सांगितले आहे, त्यामुळे ही घरघर वाढणार आहे. - एकनाथ सोनावणे, कार्यकारी सचिव, टीसा

टॅग्स :businessव्यवसायCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस