शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

Coronavirus: ...तर २० हजारांहून जास्त उद्योगांना फटका, उद्योजकांना भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 02:39 IST

मंदीमुळे आधीच बेहाल, विकलेल्या उत्पादनाचेही पैसे थकीत, पगाराचा मुद्दा शासनाने सोडवावा, उद्योजकांची मागणी

- अजित मांडकेठाणे : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनानेखाजगी कंपन्यांच्या ठिकाणी ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तशा सूचना लघुउद्योग किंवा इंडस्ट्रिजला दिल्या नसल्या, तरी असे झाल्यास त्याचा फटका जिल्ह्यातील २० हजारांहून अधिक लघुउद्योगांसह मोठ्या उद्योगांना बसणार आहे. आधीच मंदीमुळे ६० ते ७० टक्के उद्योगांना फटका बसला असताना आता ही वेळ आली, तर कामगारांच्या पगारांबरोबर, बँकेचे हप्ते, कर्जफेड, पीएफची रक्कम, जीएसटीची रक्कम भरणे या सर्वांवर परिणाम होऊन काम बंद झाल्याने येथील उद्योग आणखी मोठ्या संकटात जातील, अशी भीती उद्योजक आता व्यक्त करीत आहेत.आधीच मंदीमुळे जिल्ह्यातील अनेक उद्योग बंद झाले असून ४० टक्के उद्योगांना याचा फटका बसला आहे. त्यात आता ५० टक्के कर्मचारी कमी करण्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे केवळ आयटी कंपनीवाल्यांनाच शक्य आहे. जिल्ह्यातील इतर उद्योगांना हे शक्य नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात स्टील इंडस्ट्री आणि इतर छोटेमोठे उद्योग कसेतरी तग धरून आहेत. कोरोनाचा पहिला फटका या उद्योगांना बसला असून चीनमधून येणारा माल बंद झाला आहे. त्यामुळे त्यांचे उत्पादन १५ ते २० टक्क्यांनी घटले असल्याची माहिती लघुउद्योग संघटनेने दिली आहे. दुसरीकडे अनेक उद्योगांचे उत्पादन विकले गेले असले, तरी त्याचे पैसे आता कोरोनाचे कारण पुढे करून ३१ मार्चनंतरच मिळतील, असेही सांगितले जात आहे.50% कामगार घरी बसवले, तर त्याचा आणखी फटका या इंडस्ट्रीला बसू शकतो. कारण, या फिल्डमध्ये कोणी वेल्डर, फीटर आदींसह इतर काम करणारे कामगार आहेत. त्यामुळे एखादा कामगार आला नाही, तर त्याचे काम कोण करणार आणि दुसरा कामगार असेल तर दुसरा कामगारही बसून राहणार आहे, त्यामुळे काम हे होणारच नाही. हा सर्वात मोठा तोटा आहे, शिवाय परदेशात ५० टक्के कामगारांना घरी बसविले तरी त्यांचा पगार हा शासन देणार आहे.आपल्याकडे शासन यावर काय विचार करीत आहे, त्यावरच पुढील दिशा अवलंबून राहणार आहे. तसेच यामध्ये उत्पादन बंद होण्याची शक्यता जास्तीची असून तसे झाल्यास सर्व गणिते बिघडणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार, जीएसटी भरणे, गव्हर्नमेंटचे इतर टॅक्स, पीएफची रक्कम आदींवरदेखील त्याचा परिणाम होणार आहे. शिवाय, अनेक उद्योगांनी उत्पादने तयार करण्यासाठी बँकांकडून कर्ज काढलेले आहे. परंतु, उत्पादन झाले नाही तर बँकांचे हप्ते थकणार आहेत.त्यामुळे बँक त्याची वसुली करण्यासाठी टोकाची पावले उचलण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आताच एका कंपनीचा पीएफचा हप्ता भरण्यास तेही शासनाची वेबसाइट तीन दिवस हॅक असतानाही उशीर झाल्याने आता तुम्ही या स्कीममध्ये बसू शकत नसल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्याला आयटी रिटर्नमध्येही फटका बसणार आहे. एकूणच कोरोनाचे संकट अधिक गडद झाले, तर उद्योगांना मोठ्या संकटांना सामोरे जाणे भाग पडणार आहे.परदेशात कामगारांच्या पगाराची जबाबदारी शासनाने घेतली आहे. त्यानुसार, शासनाने यातील ५० टक्के रक्कम दिली, तरी यातून काही मार्ग निघू शकणार आहे. आधीच डबघाईला आलेल्या उद्योगांना मात्र कोरोनामुळे फटका बसणार, हे नक्की. - संदीप पारीख, उपाध्यक्ष, टीसामंदीमुळे आधीच उद्योगांना फटका बसला आहे. त्यात आता चीनमधून येणारा मालही बंद झाला आहे. काहींनी केलेल्या कामाचे पैसे ३१ मार्चनंतर देण्याचे सांगितले आहे, त्यामुळे ही घरघर वाढणार आहे. - एकनाथ सोनावणे, कार्यकारी सचिव, टीसा

टॅग्स :businessव्यवसायCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस