शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

Coronavirus: लॉकडाऊनच्या भीतीने ठाणेकर रस्त्यावर; खरेदीसाठी ग्राहकांची उडाली झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 07:03 IST

१ जूनपासून राज्यासह ठाणे शहरात काही प्रमाणात अनलॉक झाल्यावर किराणा मालाची दुकाने जास्त वेळ तर अन्य दुकानेही काही वेळासाठी उघडली होती. ग्राहकांची सोय म्हणून किराणा वस्तूंसाठी मोठे मार्टही दिवसभर खुले ठेवले होते

ठाणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ठाणे शहरात सोमवारपासून पुन्हा लॉकडाऊन होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांनी किराणा सामान भरण्यासाठी किराणा दुकाने, तसेच पावसाळी वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारातील दुकानांमध्ये रविवारी मोठी गर्दी केली.

१ जूनपासून राज्यासह ठाणे शहरात काही प्रमाणात अनलॉक झाल्यावर किराणा मालाची दुकाने जास्त वेळ तर अन्य दुकानेही काही वेळासाठी उघडली होती. ग्राहकांची सोय म्हणून किराणा वस्तूंसाठी मोठे मार्टही दिवसभर खुले ठेवले होते. वस्तू खरेदी करायला पर्याय मिळत असल्याने नागरिक काहीसे निश्चिंत होते. छोट्याछोट्या दुकानात एकाचवेळी गर्दी होत नव्हती; मात्र अनलॉकनंतर कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला आहे. ठाण्याच्या विविध प्रभागांतून रुग्णांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. हे लक्षात घेता, ठाणे शहरात पुन्हा कडक लॉकडाऊन होण्याची चिन्हे आहेत. परिणामी गेले दोन दिवस अन्नधान्याच्या वस्तू, भाजीपाला खरेदीसाठी लोकांनी जवळपासची दुकाने, मार्टमध्ये गर्दी केली होती. गावदेवी, जांभळी नाका येथील मार्केटमधील अन्य दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. पावसाळी चप्पल, छत्र्या, रेनकोट, ताडपत्रीसाठी वापरला जाणारा प्लास्टिकचा कागद, शालेय साहित्य याचबरोबर कपडे घेण्यासाठीही लोकांनी गर्दी केलेली दिसली. लॉकडाऊन पुन्हा केव्हा संपेल आणि आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू तेव्हा मिळतील की नाही, या चिंतेपायीच वस्तू खरेदीसाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या.पालिकेच्या आशीर्वादाने बेकायदा भाजीबाजारमीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये कोरोनाचे रुग्ण व मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे बंदी असूनही भाजी व मासळी बाजार मात्र सर्रास भरत असून गर्दी होत आहे. परंतु या बेकायदा बाजारांसह फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करत असल्याने कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. भाजी बाजारांत गर्दी होत असून अनेकजण मास्कही घालत नाहीत.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. अशा बेजबाबदार नागरिकांमुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्याचा धोका वाढला आहे. बेकायदा बाजार तसेच रस्त्यांवर बसणारे फेरीवाले यांच्यावर कारवाईची जबाबदारी महापालिकेची असूनही संबंधित कारवाई करत नसल्याने पालिकेचा वरदहस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.उल्हासनगरमध्ये १५ दिवसांचा लॉकडाऊन घेण्याची मनसेने केली मागणीउल्हासनगर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ दिवसांचा लॉकडाऊन करण्याची मागणी शहर मनसेने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याने कोरोना रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. उल्हासनगरमध्ये गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली असून रुग्णांची संख्या १६०० पार गेली आहे. तसेच संशयित रुग्णांचे उपचाराविना हाल होत असून खाजगी रुग्णालये सहकार्य करत नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला. तसेच दुकानदारांकडून पी -१ व पी- २ चे सर्रासपणे उल्लंघन होत असून वाहनांच्या गर्दीने वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. हे थांबविण्यासाठी १५ दिवस लॉकडाऊन करण्याची मागणी मनसेने केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस