शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: गुड न्यूज! रुग्ण बरे होण्यात ठाणे शहर राज्यात पहिल्या, तर देशात दुसऱ्या क्रमाकांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 16:39 IST

CoronaVirus News: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनानं उचललेल्या पावलांना यश

ठाणे : ठाणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 89 टक्यांवर आले असून राज्याचा एकूण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71 टक्के असून ठाणे शहर हे राज्यात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात पहिल्या क्रमांकावर आले आहे. तर देशात ठाणे शहर हे दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. सध्याच्या घडीला ठाण्यात 20 हजार 989 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या ही 1885 एवढी आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाणही 90 दिवसांवर आले आहे.ठाणे शहरात मार्च महिन्यापासूनच कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढतांना दिसत होती. त्यानंतर मे, जूनमध्येही कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दुपटीने वाढली होती. त्यानंतर टप्याटप्याने ऑनलॉक जाहीर झाला होता. परंतु ठाणो महापालिकेच्या माध्यमातून या कालावधीतही दोन वेळा लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यावेळेस पालिका आणि सत्ताधाऱ्यांवर देखील विरोधकांनी टिकेची झोड उठविली होती. परंतु त्याचे परिणाम आता दिसत असून शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत आहे. महापालिका हद्दीत आजर्पयत 23 हजार 632 रुग्ण हे कोरोनाचे आढळले आहेत. तर मंगळवार्पयत यातील 20 हजार 989 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतार्पयत 758 रुग्णांची मृत्यू झाला आहे. तर प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या 1885 एवढी आहे.ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणो महापालिकेच्या माध्यमातून शहरात करण्यात आलेल्या विविध स्वरुपाच्या उपाय योजनांमुळे महापालिका हद्दीत कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोवीड केअर सेंटर हे 1024 बेडचे रुग्णालयही ठाणेकरांसाठी आणि गोरगरीब रुग्णांसाठी फायदेशीर ठरले आहे. तसेच झोपडपटटीतील कोरोना रोखण्यासाठी घरोघरी जाऊन ताप सव्र्हेक्षण करणो, अर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप करणे, 1 व्यक्तीला कोरोना झाला तर त्याच्या संपर्कातील 20 जणांना तत्काळ क्वॉरन्टाइन केले जात आहे. यासह इतर उपाय योजनांमुळे आज शहरात कोरोना बाधीत रुग्णांची रोजची संख्या 400 वरुन 144 र्पयत खाली आली आहे.दुसरीकडे पालिकेने केलेल्या या उपाय योजनांमुळे आणि मुंब्रा, वागळे, लोकमान्य नगर आदींसह इतर भागात राबविलेल्या विविध स्वरुपाच्या पॅटर्नमुळे झोपडपटटीतील कोरोना रोखण्यात पालिकेला यश आले आहे. दरम्यान एकूणच देशातील इतर शहारांचा विचार केला किंवा राज्यातील इतर शहरांतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पाहिले असल्यास देशात दिल्लीचा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 90 टक्के आहे. तर महाराष्ट्र राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 71 टक्के आहे. तर राज्यातील इतर शहरांचे प्रमाणही ठाण्यापेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. एकूणच यामुळे राज्यात ठाणे शहर पहिल्या तर देशात दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. त्यामुळे ठाणो पॅटर्न हा राज्य आणि देशाला आदर्श ठरणार आहे.पालकमंत्री आणि प्रशासनाच्या प्रयत्नांना यशपालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका प्रशासनाने राबविलेल्या विविध स्वरुपाच्या उपाय योजनांमुळे ठाणो शहराने कोरोनावर यशस्वी मात करण्यास सुरवात केली आहे. डॉक्टर, नर्सेस इतर स्टाफ, शिक्षक आदींसह इतर कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच कोरोना रोखण्यात यश आले आहे. परंतु नागरीकांनी आजही सोशल डिस्टेसींगचे पालन करावे, कोरोना संपला असे वाटून घेऊ नये, त्याला रोखता कसे येईल यासाठी प्रत्येक ठाणेकराने दक्षता घेणो गरजेचे आहे. - नरेश म्हस्के, महापौर, ठामपाशहरातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारीठाणे - 89 टक्केनवीमुंबई - 82कल्याण - डोंबिवली - 85पूणे महापालिका - 78मुंबई - 81दिल्ली राज्य - 90महाराष्ट्र राज्य -71

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे