शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

CoronaVirus : रुग्णसंख्येत ठाणे जिल्हा देशात तिसरा; मुंबईलाही टाकले मागे; यंत्रणा हतबल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 09:03 IST

ठाणे जिल्हा देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याच्या वृत्तास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी दुजोरा दिला आहे. तब्बल दहा हजार रुग्ण सध्या जिल्ह्यात उपचार घेत आहेत. यामध्ये समाधानाची बाब म्हणजे जिल्ह्यातील मृत्युदर कमी असला तरी वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणा चिंतेत आहे.

सुरेश लोखंडे -ठाणे : कोरोनाच्या जागतिक संकटातून काही अंशी सावरत असतानाच ऐन वर्षाच्या टप्प्यात रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येत देशातील आठ जिल्हे आघाडीवर असून राज्यातील या आठ जिल्ह्यांमध्ये देशात ठाणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पुणे आणि नागपूर अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकावर आहे. मुंबईला मागे टाकत ठाणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्यामुळे प्रशासकीय पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे. (CoronaVirus: Thane district ranks third in the country in number of patients; Mumbai also left behind) ठाणे जिल्हा देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याच्या वृत्तास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी दुजोरा दिला आहे. तब्बल दहा हजार रुग्ण सध्या जिल्ह्यात उपचार घेत आहेत. यामध्ये समाधानाची बाब म्हणजे जिल्ह्यातील मृत्युदर कमी असला तरी वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणा चिंतेत आहे. यासाठी शुक्रवारी उशिरापर्यंत आरोग्य उपसंचालकांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आरोग्य यंत्रणेने कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यासह आरोग्याच्या दृष्टीने विविध उपाय योजनावर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचेही डॉ. रेंघे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.    जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णवाढीचे प्रमाण कल्याण डोंबिवली महापालिका पाठोपाठ ठाणे महापालिका परिसरात आहे. यानंतर नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर परिसरात रुग्णसंख्या वाढताना आढळून येत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात आढळलेले १ हजार १५३ रुग्णसंख्या ही या वर्षातील सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदली गेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ७४ हजार २८३ रुग्णसंख्या आढळलेली आहे. त्यापैकी २ लाख ५९ हजार ३६० रुग्ण बरे झाले आहेत. तर मृत्यू ६ हजार ३२६ झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.  या वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा, पोलीस आणि जिल्ह्यातील महापालिका प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे लक्ष केंद्रित केले आहे.

कल्याण-डोंबिवलीत रुग्णसंख्या वाढतेय- कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत शनिवारी कोरोनाचे नवीन ४०९ रुग्ण आढळले आहेत. तर, शुक्रवारी ४१६ रुग्ण आढळले होते. - मनपाने गुरुवारपासून घातलेल्या निर्बंधांनंतरही कोरोना रुग्णसंख्येला ब्रेक बसण्याऐवजी संख्या वाढत आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या दोन हजार ८८८ आहे.- तर, उपचाराअंती बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ६२ हजार ४५४ आहे. मागील २४ तासांत २३८ रुग्ण बरे झाले आहेत. दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसthaneठाणे