शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ठाण्यात कोरोनाला रोखण्यासाठी पुन्हा निर्बंधांची वेसण, नियम मोडाल तर आस्थापना होतील सिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 16:06 IST

coronavirus in Thane : नियमांचे उल्लंघन झाले तर त्या आस्थापना सिल केल्या जातील आणि जोपर्यंत कोरोना थांबत नाही.  तोपर्यंयत त्या आस्थापना सिलच राहतील असे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्पष्ट केले.

ठाणे  - राज्य शासनाने कोरोनाबाबत पुन्हा निर्बंध घालण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार ठाण्यातील हॉटेल, बार, मल्टीप्लेक्स व इतर आस्थापना या रात्री ११.३० पर्यंत सुरू राहणार आहेत. तर दुकाने ९.३० पर्यंत खुली ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले तर त्या आस्थापना सिल केल्या जातील आणि जोपर्यंत कोरोना थांबत नाही.  तोपर्यंयत त्या आस्थापना सिलच राहतील असे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्पष्ट केले. (Restrictions in Thane again for Stop coronavirus )बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यापूर्वी जे नियम आखण्यात आले होते, तेच नियम आताही लागू असतील असेही त्यांनी स्पष्ट केले. बुधवारी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात हॉटेल, बार, मल्टीप्लेक्स, दुकाने, बाजारपेठामधील प्रतिनिधी आदींसह इतर आस्थापनांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शासनाने काढलेल्या आदेशाची माहिती या आस्थापनांच्या प्रतिनिधींना देण्यात आली असून त्यांनी देखील नियमांचे पालन केले जाईल असे स्पष्ट केले असल्याचेही यावेळी आयुक्तांनी सांगितले.मल्टिप्लेक्स, मॉल, हॉटेल, बार आदींठिकाणी ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त गर्दी नसावी, मास्कशिवाय परवानगी नाही, प्रवेशाच्या वेळी प्रत्येकाचे तापमान तपासून प्रवेश, लक्षणो असणा:यांना प्रवेश नाही, हॅन्ट सॅनिटाझर प्रत्येक ठिकाणी प्रवेशद्वारावर असावे, मास्कचा वापर, सोशल डिस्टेसिंग, शॉपिंग मॉलमध्ये असलेल्या सिनेमागृह, रेस्टॉरेन्टमध्ये प्रवेश देतांना घालून दिलेल्या र्निबधाचे उल्लघन होणार नाही याची योग्य ती खबरदारी मॉल व्यवस्थापनाकडून घेण्यात यावी.कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांकृतिक कार्यक्रमांना परवानगी नाही. या आदेशाचे उल्लघंन केल्यास त्या ठिकाणच्या मालकावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

लग्न समारंभासाठी ५० व्यक्ती व अंत्यविधीसाठी २० व्यक्तीच यापूर्वी लग्न समारंभासाठी १०० माणसांना परवानगी दिली जात होती. परंतु आता त्याठिकाणी 5क् माणसांनाच परवानगी असणार आहे. तसेच अंत्यविधीसाठी देखील २० माणसांचीच परवानगी असणार आहे.गृह विलगीकरणासाठी निर्बंधासह परवानगीस्थानिक प्रशासनास व वैद्यकीय अधिका-यांच्या देखरेखाली गृह विलगीकरण कवण्यात येईल. १४ दिवसांसाठी गृह विलगीकरण असल्याचे फलक संबंधित घरांवर व इमारतींच्या प्रवेशद्वारावर लावले जाणार आहे. कोराना पॉझीटीव्ह रुग्णाच्या हातावर क्वॉरन्टाइनचा शिक्का मारला जाणार, तसेच त्याच्या घरातील इतर नागरीकांना घराबाहरे जाणो टाळावे व मास्कचा वापर करावा या आदेशाचे उल्लघंन केल्यास गृह विलीकरण करण्यात आलेल्या व्यक्तीला तत्काळ कोवीड उपचार केंद्रात दाखल करण्यात येईल.

आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापनात ५० टक्के उपस्थिती आरोग्य सेवा व इतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर खाजगी किंवा शासकीय कार्यालयांमध्ये देखील पूर्वीप्रमाणे 5० टक्के उपस्थिती ठेवावी लागणार आहे. त्यातही सोशल डिस्टंसिंगचे पालन होईल याची जबाबदारी संबधींत आस्थापनाने घ्यावी. तसेच धार्मिक स्थळांच्या ठिकाणी देखील ऑनलाईन बुकींग करुन दर्शन घ्यावे. या मार्गदर्शक सूचनांचे पालन ३१ मार्च २०२१ र्पयत बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु या आदेशाचे उल्लघंन झाल्यास संबधींत आस्थापना सील केल्या जातील. परंतु जो र्पयत कोरोनाची परिस्थिती निवळत नाही तोर्पयत त्या आस्थापना सुरू करता येणार नाही. त्यासाठी केंद्राची परवानगी घेऊनच त्या आस्थापना सुरु करता येतील असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे