शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

CoronaVirus News: रुग्ण बाधित होण्याच्या दरात घट; अंबरनाथमधील दिलासादायक चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 00:52 IST

पालिका प्रशासनाने राबविल्या विविध उपाययोजना

अंबरनाथ : शहरातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात यावी, याकरिता पालिका प्रशासनामार्फत विविध पातळ्यांवर योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात ५१.२९ टक्के असलेला रुग्ण बाधित होण्याचा दर हा कमी होऊन आॅक्टोबरमध्ये २६.४६ टक्क्यांवर आला आहे.शहरात एकूण २५ हजार ११७ चाचण्या करण्यात आल्या असून बाधित रुग्णांची संख्या आजवर सहा हजार ६४७ एवढी झाली आहे. त्यातील सहा हजार १९ रुग्ण उपचारानंतर बरेही झाले आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागात सर्व नागरिकांचे झालेले प्राथमिक आरोग्य सर्वेक्षण, त्यामुळे बाधितांची वेळीच झालेली ओळख आणि त्यांना योग्य वेळी मिळालेले उपचार यामुळे शहराचा रुग्ण बाधित होण्याचा दर हा निम्म्यावर आला आहे. यामुळे शहराच्या दृष्टीने ही एक सकारात्मक बाब आहे. सद्य:स्थितीत शहरात एकूण रुग्णसंख्येपैकी ३८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामुळे आजवर आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी केवळ ५.८३ टक्केच रुग्ण आहेत, तर रुग्ण बरे होण्याचा दर हा ९०.५५ टक्के इतका आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, याकरिता प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असून नगरपालिकेच्या दंत महाविद्यालयातील रुग्णालयात लवकरच ५०० आॅक्सिजन बेडची सुविधाही करण्यात येत आहे, जेणेकरून सध्या उपचार घेत असलेले आणि भविष्यात रुग्णालयात नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांना आॅक्सिजनअभावी कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. त्याचबरोबर सध्या या रुग्णालयाची क्षमता ५०० खाटांची असून तीही वाढवून ७०० खाटांपर्यंत वाढवण्यात येत आहे.रुग्णांना मिळाले वेळेत उपचारकोरोना नियंत्रणात यावा, याकरिता पालिका प्रशासनाकडून वाढविलेले चाचण्यांचे प्रमाण, अ‍ॅण्टीजेन चाचण्यांवर दिलेला भर, बाधित रुग्णांना वेळीच मिळालेले उपचार यामुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे आणि त्याचबरोबर शहराचा रुग्ण बाधित होण्याचा दरदेखील कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे.भिवंडीत एक लाख ६४ हजार कुटुंबांचे सर्वेक्षणभिवंडी : कोरोनावर उपाययोजना म्हणून प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम सरकारी स्स्तरावर राबविण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले होते. भिवंडी महापालिकेने ही मोहीम शहरभर राबविली असून आतापर्यंत एक लाख ६४ हजार ४१३ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिली आहे.पालिकेचे ३५० कर्मचारी व अधिकारी या सर्वेक्षणात कार्यरत आहेत. भिवंडी पालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रभाव सध्या आटोक्यात आला असला, तरी गुरुवारी शहरातील बाधित रुग्णांची संख्या पाच हजार ३१७ वर पोहोचली आहे. मात्र, आतापर्यंत चार हजार ६८९ रुग्ण बरे झाले असून ३१९ रुग्ण कोरोनाने दगावले आहेत.सध्या शहरातील ३०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रशासनाच्या वतीने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, शहरातील नागरिक सूचनांचे पालन करताना दिसत नसल्याने शहरातील कोरोना रोखण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या