शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

Coronavirus: डिस्चार्जनंतरही ४० दिवस ठेवला जातो रुग्णांचा ट्रॅक; रुग्णांच्या लुटीला बसला लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 01:36 IST

ठाणे महापालिकेचा उपक्रम : महापालिका हद्दीत एप्रिल, मे, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोना रुग्णांचा कहर होता.

ठाणे : कोरोनाचा रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याचा ट्रॅक ४० दिवस ठेवला जात असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. कोणता रुग्ण कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती दिवसांपासून दाखल आहे, याची माहितीही घेतली जात असल्याने कोविड हॉस्पिटलकडून जी सर्वसामान्य रुग्णांची लूट होत होती, तिलाही लगाम बसला असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

महापालिका हद्दीत एप्रिल, मे, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोना रुग्णांचा कहर होता. ठाण्यात परिस्थिती अशी होती की, रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिकादेखील उपलब्ध होत नव्हती. यामुळे रुग्णालयात वेळेवर पोहोचू न शकल्यानेदेखील अनेकांचा या कालावधीत मृत्यू झाला. रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना बेडदेखील उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. यामुळे पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील जास्तीतजास्त नागरिकांना शोधून त्यांना क्वारंटाइन करणे, या कालावधीत प्रशासनाला शक्यच नव्हते. 

मात्र, जूनमध्ये डॉ. विपिन शर्मा यांनी पालिका आयुक्तपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर एकाही रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू होणार नाही तसेच सर्वांना वेळेवर उपचार मिळावे, याची विशेष दक्षता घेतली. यामुळे आता ठाण्यात पॉझटिव्ह दर हा पाच टक्क्यांवर आला आहे. 

असा ठेवला जातो ट्रॅकएखाद्या रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर ४० दिवसांपर्यंत त्याचा ट्रॅक ठेवून त्याची नियमितपणो चौकशी केली जाते. तो आणखी कोणाच्या संपर्कात आला का, याचीदेखील माहिती घेतली जात असून दुसरीकडे १० दिवस त्यानंतर ११ ते १५ दिवस, २१ ते ३० दिवस आणि ३० दिवसांपेक्षा जास्त दिवस अशा टप्प्यांमध्ये रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचीदेखील नियमितपणो चौकशी केली जाते. जर रुग्ण जास्त दिवस उपचार घेत असेल, तर रुग्णालयाला त्याची कारणोदेखील विचारली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका