शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

coronavirus: ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात, २६ दिवसांत आठ हजार रुग्ण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 01:37 IST

Thane CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग तसेच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंबर कसली. जीवाची पर्वा न करता एकूण यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत रुग्णांचे जीव वाचवत आहे.

ठाणे - दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असताना, या आजारातून पूर्णपणे बरे होऊन स्वगृही परतणाऱ्या रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यातील सहा महापालिका आणि ग्रामीण भागातील दाखल रुग्णांची संख्या १८ हजारांच्या घरात होती. ती आता १० हजारांवर आली आहे. मागील २६ दिवसांत ८ हजार रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.

ठाणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग तसेच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंबर कसली. जीवाची पर्वा न करता एकूण यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत रुग्णांचे जीव वाचवत आहे. त्याची फलश्रुती जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस रुग्णांच्या संख्येत होणारी घट, रुग्ण बरे होण्याचे वाढते प्रमाण, रुग्णालयातील रिक्त खाटा यांच्या रूपात दिसून येत आहे.

जिल्ह्यातील सहा मनपांसह शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण आणि भिवंडी या पाच तालुक्यांतील ग्रामीण क्षेत्रात १ ऑक्टोबरला १७ हजार ६२७ रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल होते. २ ऑक्टोबरला त्यात १५० ते २०० रुग्णांची वाढ झाली. त्यानंतर जिल्ह्यात रुग्णवाढीचा वेग मंदावत गेला. दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या रोडावत गेल्याने २६ ऑक्टोबरला जिल्ह्यात दाखल रुग्णांची १० हजारांवर येऊन ठेपली आहे.  

...अशी झाली घट 

ठाणे जिल्ह्यात १ ऑक्टोबरला दाखल रुग्णांची संख्या १७ हजार ६२७ इतकी होती. २ ऑक्टोबरला त्यात वाढ होऊन १७ हजार ८३८ वर गेली. ३ ऑक्टोबरला ती १७ हजार ५४८ झाली. १० ऑक्टोबरला ती १६ हजार ३५९ वर, २६ ऑक्टोबरपर्यंत ती १० हजार ७३७ वर घसरली. 

ठाणे महापालिका क्षेत्र : रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसठाणे : महापालिका हद्दीत कोरोनाला अटकाव करण्यासाठी विविध स्वरूपाचे प्रयत्न सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवून दररोज ५,५९४ केले आहे. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाणही आता घटले असून, रुग्णदुपटीचा कालावधी अवघ्या तीन दिवसांत १३५ दिवसांवरून १६५ दिवसांवर गेला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९२ टक्क्यांवर आले. याशिवाय मृत्युदरही आता २.४९ टक्क्यांवर आला आहे.मार्च महिन्यापासून ठाण्यात कोरोना रुग्ण आढळले. जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. सप्टेंबर महिन्यात १० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले व त्यापैकी ८ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले. कोरोनाला अटकाव करण्यासाठी पालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्यानंतर एका रुग्णामागे ४४ जणांना क्वारंटाइन केले जात आहे. ऑगस्ट महिनाअखेर रोज सरासरी २३०० चाचण्या केल्या जात होत्या आणि त्यामध्ये दोनशेच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. सप्टेंबर महिन्यापासून चाचण्यांची संख्या दुप्पट करण्यात आली. आता दिवसाला ५५०० हून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. त्यात ४०० च्या आसपास रुग्ण आढळून येते होते. परंतु आता ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून ती २५० वरून १३० वर आली आहे. सप्टेंबर महिना अखेरपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्के होते. ते आता ९२ टक्क्यांवर आले आहे.

मृत्युदर घटल्याने लाभला दिलासामागील सहा महिन्यांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९.७३ टक्के होते. ते ऑक्टोबर अखेर ९२ टक्क्यांवर आले. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण हे २० टक्क्यांवरून ९.४१ टक्क्यांवर आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्क्यांवर आले असून चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्णदुपटीचा कालावधी जेमतेम तीन दिवसांत १३५ दिवसांवरून १६५ दिवसांवर आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ४५ हजार ५४१ रुग्ण आढळून आले. त्यापैकी ४२ हजार १११ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ११३३ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्युदर आता २.४९ टक्क्यांवर आला ही समाधानाची बाब आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे