शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
4
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
5
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
6
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
7
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
8
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
9
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
10
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
11
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
12
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
13
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
14
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
15
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
16
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
17
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
18
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
19
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
20
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ

Coronavirus: घर गाठण्यासाठी नऊ दिवस पायपीट; आईवडिलांच्या भेटीसाठी चक्क पायी मुंबई गाठली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 07:27 IST

इंदूरवरून शनिवारी पोहोचले ठाण्यात : सलग दोन दिवस होते उपाशी

जितेंद्र कालेकर

ठाणे : लॉकडाउनमुळे इंदूर येथे अडकून पडलेल्या दोघा तरुणांनी आईवडिलांच्या भेटीसाठी चक्क पायी मुंबई गाठली. तब्बल नऊ दिवस रस्ता तुडवल्यानंतर शनिवारी ते ठाण्यात पोहोचले. दोन दिवसांपासून अन्नाचा कणही पोटात नसलेल्या या तरुणांना पोलिसांनी दोन घास देऊन पुढील प्रवासासाठी मार्गस्थ केले.

मूळचे विक्रोळी येथील अमोल सावंत (३२) व दिनेश पवार (२५) (नावे बदलली आहेत) हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून मध्य प्रदेशातील इंदूर येथे रंगारी काम करतात. ज्या ठिकाणी ते गेले होते, तेथील मालकाने त्यांना मार्च महिन्याचा पगार दिला. नंतर त्यांना घरी जाण्यास सांगितले. गेला महिनाभर कसाबसा काढल्यानंतर या दोघांनीही मुंबईकडे पायी जाण्याचा निर्णय घेतला. २४ एप्रिलला इंदूरवरून निघालेले ते नऊ दिवसांनी ठाण्यात कॅडबरी जंक्शनजवळ पोहोचले. तेथे नाकाबंदीमध्ये या दोघांचीही पोलीस उपनिरीक्षक दीपक पाटील यांच्या पथकाने चौकशी केली. नऊ दिवसांच्या पायी प्रवासाची कहाणी त्यांनी सांगितल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. दोन दिवसांपासून अन्नाचा कणही मिळाला नसल्यामुळे पाटील यांनी त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेली दोन जेवणाची पाकिटे व पाणी दिले. इंदूर ते ठाणे या प्रवासातही असेच मिळेल ते खाल्ले. विक्रोळीतील घरी आई, वडील असून त्यांच्यासाठीच आम्ही मुंबईकडे धाव घेतल्याचे त्यांनी सांगितले.८०० किलोमीटर अंतर कापलेरोज ५0 ते ६0 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर एखाद्या वस्तीजवळ किंवा रस्त्याच्या कडेलाच ते काही तासांचा मुक्काम करत. एखादे वाहन दिसले तर त्याला थांबण्याची विनंती करायची, मग ते नेईल तेवढे अंतर जाऊन पुन्हा पायी प्रवास करायचा. सलग नऊ दिवसांच्या ८00 किलोमीटरच्या प्रवासानंतर ते २ मे रोजी ठाण्यात पोहोचले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस