शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: घर गाठण्यासाठी नऊ दिवस पायपीट; आईवडिलांच्या भेटीसाठी चक्क पायी मुंबई गाठली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 07:27 IST

इंदूरवरून शनिवारी पोहोचले ठाण्यात : सलग दोन दिवस होते उपाशी

जितेंद्र कालेकर

ठाणे : लॉकडाउनमुळे इंदूर येथे अडकून पडलेल्या दोघा तरुणांनी आईवडिलांच्या भेटीसाठी चक्क पायी मुंबई गाठली. तब्बल नऊ दिवस रस्ता तुडवल्यानंतर शनिवारी ते ठाण्यात पोहोचले. दोन दिवसांपासून अन्नाचा कणही पोटात नसलेल्या या तरुणांना पोलिसांनी दोन घास देऊन पुढील प्रवासासाठी मार्गस्थ केले.

मूळचे विक्रोळी येथील अमोल सावंत (३२) व दिनेश पवार (२५) (नावे बदलली आहेत) हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून मध्य प्रदेशातील इंदूर येथे रंगारी काम करतात. ज्या ठिकाणी ते गेले होते, तेथील मालकाने त्यांना मार्च महिन्याचा पगार दिला. नंतर त्यांना घरी जाण्यास सांगितले. गेला महिनाभर कसाबसा काढल्यानंतर या दोघांनीही मुंबईकडे पायी जाण्याचा निर्णय घेतला. २४ एप्रिलला इंदूरवरून निघालेले ते नऊ दिवसांनी ठाण्यात कॅडबरी जंक्शनजवळ पोहोचले. तेथे नाकाबंदीमध्ये या दोघांचीही पोलीस उपनिरीक्षक दीपक पाटील यांच्या पथकाने चौकशी केली. नऊ दिवसांच्या पायी प्रवासाची कहाणी त्यांनी सांगितल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. दोन दिवसांपासून अन्नाचा कणही मिळाला नसल्यामुळे पाटील यांनी त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेली दोन जेवणाची पाकिटे व पाणी दिले. इंदूर ते ठाणे या प्रवासातही असेच मिळेल ते खाल्ले. विक्रोळीतील घरी आई, वडील असून त्यांच्यासाठीच आम्ही मुंबईकडे धाव घेतल्याचे त्यांनी सांगितले.८०० किलोमीटर अंतर कापलेरोज ५0 ते ६0 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर एखाद्या वस्तीजवळ किंवा रस्त्याच्या कडेलाच ते काही तासांचा मुक्काम करत. एखादे वाहन दिसले तर त्याला थांबण्याची विनंती करायची, मग ते नेईल तेवढे अंतर जाऊन पुन्हा पायी प्रवास करायचा. सलग नऊ दिवसांच्या ८00 किलोमीटरच्या प्रवासानंतर ते २ मे रोजी ठाण्यात पोहोचले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस