शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

Coronavirus: घर गाठण्यासाठी नऊ दिवस पायपीट; आईवडिलांच्या भेटीसाठी चक्क पायी मुंबई गाठली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 07:27 IST

इंदूरवरून शनिवारी पोहोचले ठाण्यात : सलग दोन दिवस होते उपाशी

जितेंद्र कालेकर

ठाणे : लॉकडाउनमुळे इंदूर येथे अडकून पडलेल्या दोघा तरुणांनी आईवडिलांच्या भेटीसाठी चक्क पायी मुंबई गाठली. तब्बल नऊ दिवस रस्ता तुडवल्यानंतर शनिवारी ते ठाण्यात पोहोचले. दोन दिवसांपासून अन्नाचा कणही पोटात नसलेल्या या तरुणांना पोलिसांनी दोन घास देऊन पुढील प्रवासासाठी मार्गस्थ केले.

मूळचे विक्रोळी येथील अमोल सावंत (३२) व दिनेश पवार (२५) (नावे बदलली आहेत) हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून मध्य प्रदेशातील इंदूर येथे रंगारी काम करतात. ज्या ठिकाणी ते गेले होते, तेथील मालकाने त्यांना मार्च महिन्याचा पगार दिला. नंतर त्यांना घरी जाण्यास सांगितले. गेला महिनाभर कसाबसा काढल्यानंतर या दोघांनीही मुंबईकडे पायी जाण्याचा निर्णय घेतला. २४ एप्रिलला इंदूरवरून निघालेले ते नऊ दिवसांनी ठाण्यात कॅडबरी जंक्शनजवळ पोहोचले. तेथे नाकाबंदीमध्ये या दोघांचीही पोलीस उपनिरीक्षक दीपक पाटील यांच्या पथकाने चौकशी केली. नऊ दिवसांच्या पायी प्रवासाची कहाणी त्यांनी सांगितल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. दोन दिवसांपासून अन्नाचा कणही मिळाला नसल्यामुळे पाटील यांनी त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेली दोन जेवणाची पाकिटे व पाणी दिले. इंदूर ते ठाणे या प्रवासातही असेच मिळेल ते खाल्ले. विक्रोळीतील घरी आई, वडील असून त्यांच्यासाठीच आम्ही मुंबईकडे धाव घेतल्याचे त्यांनी सांगितले.८०० किलोमीटर अंतर कापलेरोज ५0 ते ६0 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर एखाद्या वस्तीजवळ किंवा रस्त्याच्या कडेलाच ते काही तासांचा मुक्काम करत. एखादे वाहन दिसले तर त्याला थांबण्याची विनंती करायची, मग ते नेईल तेवढे अंतर जाऊन पुन्हा पायी प्रवास करायचा. सलग नऊ दिवसांच्या ८00 किलोमीटरच्या प्रवासानंतर ते २ मे रोजी ठाण्यात पोहोचले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस