शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

CoronaVirus News: रामदेवबाबांच्या कोरोनाप्रतिबंधक औषधांचा दुकानांमध्ये पत्ताच नाही, ग्राहकांचे खेटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 00:18 IST

राज्य सरकारने या औषधावर बंदी लागू केल्याचे जाहीर केल्यानंतरही बाबांचे काही भक्त, चाहते औषधाची चौकशी करण्याकरिता कंपनीच्या दुकानांत चकरा मारत आहेत.

स्नेहा पावसकर/अनिकेत घमंडी ठाणे/डोंबिवली : योगगुरु रामदेवबाबा यांच्या कंपनीने कोरोनावर रामबाण उपाय असल्याचा दावा करीत बाजारात आणलेले औषध ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांत अद्याप दाखल झालेले नाही. किमान १० दिवस ते येण्याची शक्यता नाही. मात्र, राज्य सरकारने या औषधावर बंदी लागू केल्याचे जाहीर केल्यानंतरही बाबांचे काही भक्त, चाहते औषधाची चौकशी करण्याकरिता कंपनीच्या दुकानांत चकरा मारत आहेत.रामदेवबाबा यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण कोरोनावर औषध निर्माण केल्याचा दावा केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यग औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा केली. सरकारने बंदी घातलेले हे औषध जिल्ह्यात विकले जाते किंवा कसे, याची खातरजमा करण्याकरिता दोन प्रतिनिधींनी ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील रामदेवबाबांच्या कंपनीच्या दुकानांना ‘ग्राहक’ म्हणून भेट दिली.कोरोनामुळे भयभीत झालेली सामान्य जनता दुकानात जाऊन औषध आले आहे का, याची चौकशी करीत आहे. कधीपर्यंत हे औषध उपलब्ध होईल? किती रुपयांत मिळेल? अशी चौकशी ग्राहक करीत आहेत. या औषधाच्या विक्रीवर सरकारने बंदी आणलेली असल्याकडे काही ग्राहकांचे लक्ष वेधले असता त्यापैकी काहींना बंदीची माहिती होती तर काहींच्या बंदी गावीच नव्हती. मात्र, सध्या तरी हे औषध ठाणे-मुंबईतील कोणत्याच दुकानात उपलब्ध नाही. ८-१० दिवसांत ते विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे, असे दुकानदारांनी सांगितले. औषध बाजारात आले आणि याचा खप वाढला तर इतरांचा बिझनेस होणार नाही. म्हणून बंदी आणली आहे, परंतु बाबा हे औषध विक्रीसाठी आणल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असे ठाण्यातील एका विक्रेत्याने सांगितले.कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांमध्येही औषधाची प्रतीक्षा असल्याचे निदर्शनास आले. मात्र, ते औषध यायला किमान १० दिवसांची प्रतीक्षा ग्राहकांना करावी लागणार असल्याचे दुकानदार सांगत आहेत. डोंबिवलीत केळकर पथ, मानपाडा रस्ता येथील रामदेवबाबांच्या कंपनीच्या दुकानांमध्ये शुक्रवारपासून औषधाची मागणी केली जात आहे.या औषधाची विचारणा करणाऱ्या एका ग्राहकाला कोरोनावर अद्याप जगभरात औषध सापडले नसल्याचे माहीत आहे का, असे विचारले असता रामदेवबाबांच्या औषधाने कोरोना बरा झाला नाही, तर निदान तो होण्याची शक्यता कमी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.>राजकारण नको...राज्य सरकारच्या बंदीच्या निर्णयाबाबत काही ग्राहकांनी व दुकानदारांनी नाराजी प्रकट केली. बाबांचे औषध किती प्रभावी आहे, यापेक्षा आम्ही ते रामदेवबाबांवरील श्रद्धेपोटी घेणार असल्याचे एका ग्राहकाने सांगितले. कोरोना व त्यावरील औषध यावरुन तरी राजकारण व्हायला नको, असे मत एका दुकानदाराने व्यक्त केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस