शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

CoronaVirus News: रामदेवबाबांच्या कोरोनाप्रतिबंधक औषधांचा दुकानांमध्ये पत्ताच नाही, ग्राहकांचे खेटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 00:18 IST

राज्य सरकारने या औषधावर बंदी लागू केल्याचे जाहीर केल्यानंतरही बाबांचे काही भक्त, चाहते औषधाची चौकशी करण्याकरिता कंपनीच्या दुकानांत चकरा मारत आहेत.

स्नेहा पावसकर/अनिकेत घमंडी ठाणे/डोंबिवली : योगगुरु रामदेवबाबा यांच्या कंपनीने कोरोनावर रामबाण उपाय असल्याचा दावा करीत बाजारात आणलेले औषध ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांत अद्याप दाखल झालेले नाही. किमान १० दिवस ते येण्याची शक्यता नाही. मात्र, राज्य सरकारने या औषधावर बंदी लागू केल्याचे जाहीर केल्यानंतरही बाबांचे काही भक्त, चाहते औषधाची चौकशी करण्याकरिता कंपनीच्या दुकानांत चकरा मारत आहेत.रामदेवबाबा यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण कोरोनावर औषध निर्माण केल्याचा दावा केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यग औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा केली. सरकारने बंदी घातलेले हे औषध जिल्ह्यात विकले जाते किंवा कसे, याची खातरजमा करण्याकरिता दोन प्रतिनिधींनी ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील रामदेवबाबांच्या कंपनीच्या दुकानांना ‘ग्राहक’ म्हणून भेट दिली.कोरोनामुळे भयभीत झालेली सामान्य जनता दुकानात जाऊन औषध आले आहे का, याची चौकशी करीत आहे. कधीपर्यंत हे औषध उपलब्ध होईल? किती रुपयांत मिळेल? अशी चौकशी ग्राहक करीत आहेत. या औषधाच्या विक्रीवर सरकारने बंदी आणलेली असल्याकडे काही ग्राहकांचे लक्ष वेधले असता त्यापैकी काहींना बंदीची माहिती होती तर काहींच्या बंदी गावीच नव्हती. मात्र, सध्या तरी हे औषध ठाणे-मुंबईतील कोणत्याच दुकानात उपलब्ध नाही. ८-१० दिवसांत ते विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे, असे दुकानदारांनी सांगितले. औषध बाजारात आले आणि याचा खप वाढला तर इतरांचा बिझनेस होणार नाही. म्हणून बंदी आणली आहे, परंतु बाबा हे औषध विक्रीसाठी आणल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असे ठाण्यातील एका विक्रेत्याने सांगितले.कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांमध्येही औषधाची प्रतीक्षा असल्याचे निदर्शनास आले. मात्र, ते औषध यायला किमान १० दिवसांची प्रतीक्षा ग्राहकांना करावी लागणार असल्याचे दुकानदार सांगत आहेत. डोंबिवलीत केळकर पथ, मानपाडा रस्ता येथील रामदेवबाबांच्या कंपनीच्या दुकानांमध्ये शुक्रवारपासून औषधाची मागणी केली जात आहे.या औषधाची विचारणा करणाऱ्या एका ग्राहकाला कोरोनावर अद्याप जगभरात औषध सापडले नसल्याचे माहीत आहे का, असे विचारले असता रामदेवबाबांच्या औषधाने कोरोना बरा झाला नाही, तर निदान तो होण्याची शक्यता कमी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.>राजकारण नको...राज्य सरकारच्या बंदीच्या निर्णयाबाबत काही ग्राहकांनी व दुकानदारांनी नाराजी प्रकट केली. बाबांचे औषध किती प्रभावी आहे, यापेक्षा आम्ही ते रामदेवबाबांवरील श्रद्धेपोटी घेणार असल्याचे एका ग्राहकाने सांगितले. कोरोना व त्यावरील औषध यावरुन तरी राजकारण व्हायला नको, असे मत एका दुकानदाराने व्यक्त केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस