शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

CoronaVirus News : ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाचे फक्त ५० रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 00:54 IST

CoronaVirus News in Thane : विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयातील चांगली उपचारपद्धती, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तसेच औषधोपचारांसह सकस आहारामुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.

ठाणे : एकेकाळी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या यंत्रणेवर ताण येत होता. अपुऱ्या पडणाऱ्या खाटांमुळे काही वेळा वाॅर्डातील जमिनीवर गाद्या टाकून रुग्णांवर उपचार करावे लागले. आतापर्यंत दोन हजार ९७७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून सध्या केवळ ५० रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. ही सकारात्मक आणि आशादायी बाब असल्याचे ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयातील चांगली उपचारपद्धती, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तसेच औषधोपचारांसह सकस आहारामुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. मार्च महिन्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे केवळ कोरोनाग्रस्तांसाठी ठेवण्यात आले. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत कोरोनाचा कहर वाढल्याने जिल्हा रुग्णालयातही वाढत्या रुग्णांसाठी खाटांची संख्या अपुरी पडू लागली होती. सर्वसामान्य गरीब रुग्णांना जिल्हा रुग्णालयाचा मोठा आधार मिळाला. तज्ज्ञ डॉक्टर आणि सोयीसुविधांमुळे अनेक सेलिब्रिटींनीही या रुग्णालयाला पसंती दिली. औषधोपचारांबरोबरच करमणुकीसाठी संगीतापर्यंत सर्व सुविधा रुग्णांना येथे देण्यात आल्या. याशिवाय येथील डाॅक्टरांसह एकूणच यंत्रणेने घेतलेल्या अथक परिश्रमांची फलश्रुती म्हणून कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूचे रुग्ण ठाण्यात सद्य:स्थितीत कमी झाले आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयात २०० खाटांची सुविधा आहे. त्यात २५ अतिदक्षता आणि १२५ ऑक्सिजन, तर ५० सामान्य कोरोना रुग्णांच्या खाटांचा समावेश आहे. याठिकाणी दाखल झालेल्या तीन हजार ५०३ रुग्णांपैकी तब्बल दोन हजार ९७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर, काही जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे