शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: मुंबई- ठाण्याची अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 21:51 IST

राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन सुरु केल्यानंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्येही शिथिलता आणली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केवळ दहा टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयांमध्ये परवानगी दिली आहे. मात्र, रेल्चेची उपनगरी सेवा अद्याप९ सुरु झालेली नाही. त्यामुळे मुंबईत जाण्यासाठी अनेक चाकरमान्यांनी खासगी वाहनांचा आधार घेतल्यामुळे मुंबई पूर्व द्रूत गती मार्गावर सोमवारी मोठी वाहतूक कोंडी झाली झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

ठळक मुद्देअपुऱ्या बस सेवेमुळे दिव्यात प्रवाशांच्या तर आनंदनगर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगाठाण्यातील आनंदनगर टोल नाक्यावर वाहतूक कोंडीअनेक चाकरमान्यांनी घेतला खासगी वाहनांचा आश्रय

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: सोमवारपासून खासगी तसेच शासकीय कार्यालयांमध्ये १० टक्के कमचाºयांच्या उपस्थितीला राज्य शासनाने हिरवा कंदिल दिल्याने आपले कार्यालय गाठण्यासाठी चाकरमान्यांना मोठा द्रविडी प्राणायम करावा लागला. मुंबईकरांची ‘लाईफलाईन’ असलेली रेल्वे सेवा मात्र अद्यापही सुरु न झाल्यामुळे अनेकांना खासगी वाहनाने मुंबई गाठावी लागल्याचे चित्र होते. त्यामुळे सकाळी दोन ते तीन तास ठाण्याच्या वेशीवर वाहतूकीची मोठी कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सुमारे अडीच महिन्यांपासून सुरु असलेले ‘लॉकडाऊन’चे नियम आता ५ जूनपासून राज्य शासनाने शिथिल केले आहेत. ८ जूनपासून दहा टक्के उपस्थितीसह खासगी आणि शासकीय कार्यालय देखिल सुरु झाली आहेत. मुंबईतील अनेक कार्यालयांमध्ये नोकरी व्यावसानिमित्त जाणारा चाकरमानी वर्ग मोठया प्रमाणात ठाणे जिल्हयातील ठाणे शहर, कल्याण,डोंबिवली, शहापूर, अंबरनाथ आणि बदलापूर या भागात वास्तव्याला आहे. अत्यावश्यक सेवेतील रुग्णालये, पाणी पुरवठा विभाग, पोलीस, अग्निशमन दल, सुरक्षा रक्षक आणि प्रसारमाध्यमांमध्ये काम कारणारे प्रतिनिधी असा मोठा वर्गही ठाणे जिल्हयातून मुंबईकडे जातो. अजूनही उपनगरी रेल्वेची लोकल सेवा सुरू न झाल्यामुळे बहुतांश चाकरमान्यांनी आपल्या खाजगी वाहनांनी प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोमवारी ठाण्यातील आनंदनगर टोल नाक्यावर सकाळी ७ ते १० या तीन तासांच्या कालावधीमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर दुसरीकडे दिव्यातूनही मुंबईला कामावर जाणाºयांची संख्या मोठी आहे. त्याप्रमाणात बसेसची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे दिवेकरांचेही हाल झाले. बससाठी प्रवाशांच्या मोठया रांगा लागल्याने काही प्रवाशांना तर पुन्हा घरी परतावे लागल्याचे एका कर्मचाºयाने सांगितले. कार्यालयांमधील उपस्थितीच्या प्रमाणात रस्त्यावर सार्वजनिक वाहने मात्र उपलब्ध नसल्यामुळे नियोजनाचा फज्जा उडाल्याचे चित्र ठाण्यात पहायला मिळाले.* ठाणे शहरातही गर्दीमुंबई ठाणे अनलॉक करण्यास सुरुवात झाल्याने ठाण्यातील प्रमुख रस्त्यांवर नागरिकांची तसेच वाहनांची गर्दी वाढल्याचेही सोमवारी पहायला मिळाले. सोमवारी सकाळी कार्यालय गाठण्यासाठी कर्मचारी मोठया संख्येने घराबाहेर पडल्याने रस्त्यावर वाहतूकीची वर्दळ वाढली होती. ठाणे येथील वसंतराव नाईक पूर्व द्रूतगती महामार्गावर आंनद नगर टोलनाका परिसरात मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्याचे पहायला मिळाले.दरम्यान, ठाणे परिवहन सेवेच्या ४० टक्के म्हणजे ३०० पैकी १०० बसेस या नेहमीप्रमाणेच सोमवारीही रस्त्यावर होत्या. या बसेस केवळ पाणीपुरवठा, पोलीस, रुग्णालयीन कर्मचारी अशा अत्यावश्यक सेवांसाठीच सध्याही सुरुच आहेत, अशी माहिती ठाणे परिवहन सेवेच्या वरिष्ठ अधिकाºयाने दिली. तर मुंबईतील बेस्टच्या फेºयांची संख्याही अद्याप वाढविण्यात न आल्याने चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. आगामी काळात एसटी आणि सार्वजनिक उपक्रमातील बस फेºयांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणीही कर्मचाºयांनी केली आहे.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस