शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

CoronaVirus News: लोकल धावली, पण डब्यातली मैफल जमलीच नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:44 IST

८० दिवसांनंतर धावली लोकल : भिशीचा ग्रुप नसल्याने हिरमोड

ठाणे : अरे एलआयसीचा जोशी आलाय, त्याला बसायला जागा दे... अंबरनाथच्या कुळकर्ण्या तू आज पेपर नाही का आणलास? तुला कडकी लागली का?... चला रे घाटकोपर आले अंकलला बसायला दे... अंकल को नही बैठने का वो तो अभी जवाँ है... मध्य रेल्वेच्या पुरुषांच्या डब्यातील ग्रुपमध्ये हे आणि असे अनेक कानांवर पडणारे संवाद सोमवारी ८० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लोकल सुरु झाली तरी कानांवर पडले नाहीत. कारण, अत्यावश्यक सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांकरिताच ही सेवा सुरु झाली. खासगी कर्मचारी या ग्रुपमध्ये नसल्याने ग्रुपची फूल टू धमाल अनुभवास आलीच नाही.लोकल कल्याणहून सीएसटीला पोहोचेपर्यंत बीएमसीतील वागळे, हेल्थमधील लिमये लोकल सुरु होऊनही बसच्या रांगेत उभे राहिल्याने कसे धक्के खात येताहेत, हा विषय डब्यात चघळायला मिळाला होता. तिकडे लेडिज डब्यातही मैत्रिणींना मिस केल्याने चुटपुटीची भावना व्यक्त होत होती. खासगी कंपनीत काम करणाºया हर्षदा किंवा अनिताला दोन तास रांगेत उभे राहून बस मिळाली नाही, याची चिंता व्यक्त होत होती. लॉकडाऊनच्या काळातील रेसिपी, न केलेले शॉपिंग अशा गप्पा आणि हास्याची किणकिण डब्यात कानांवर पडली. भिशी कधी सुरु करायची, याची चर्चा करीत सुरु झालेला हा प्रवास भिशी सुरु करण्याच्या निर्धाराने संपला. लोकल सुरु झाल्याने सुखकारक ठरलेला प्रवास ग्रुप जमला नाही, याची खंत मनात ठेवणारा होता.किती लोकल धावल्या आणि कशा...डोंबिवली : अर्ध्या तासाच्या फरकाने सकाळच्या सत्रात सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबईच्या दिशेने १४ लोकल धावल्या. तेवढ्याच लोकल डाउन मार्गावरदेखील धावल्या. दुपारच्या सत्रातही १२ नंतर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत २० लोकल अप, डाउन मार्गावर धावल्या. डोंबिवलीमध्ये पूर्वेला रामनगर आणि पश्चिमेला कल्याण एण्डला विष्णूनगर तिकीट खिडकीजवळ प्रवाशांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या.दोन्ही दिशांकडील प्रवाशांना स्थानकात येताना मधल्या पादचारी पुलावरूनच प्रवेश करण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे तेथे जाताना आरपीएफ, जीआरपी पोलिसांमार्फत ओळखपत्र व तिकीट बघण्यात येत होते. त्यानंतरच फलाट क्रमांक ३ वर मुंबईला जाण्यासाठी व कल्याणकडे जाण्यासाठी फलाट क्रमांक ४ वर प्रवेश दिला जात होता. महत्त्वाचे म्हणजे, लोकल स्वच्छ होत्या, पंखे, लाईट सुरु होते.रेल्वेस्थानकातील स्वच्छतागृह, तिकीटघर ही सुविधा सुरु होती. कोणत्याही स्थानकात कॅन्टीन सेवा उपलब्ध नव्हती. बहुतांश स्थानकांतील स्वयंचलित जिने बंद होते. अडीच महिने बंद असलेल्या स्थानकामध्ये धूळ पसरलेली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु केली आहे. गर्दी नसल्याने पहिल्या दिवशी सुटसुटीत प्रवास झाल्याचे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी सांगितले.मी सरकारी रुग्णालयात कर्मचारी आहे. रेल्वे सुरु केल्याने लवकर पोहोचणे शक्य होईल, असे कल्याणचे प्रभाकर जाधव यांनी सांगितले. खासगी कर्मचाºयांनाही ही सुविधा मिळाल्यास त्यांची अडचण कमी होईल, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे म्हणणे आहे. गाडीत गर्दी होणार नाही, याकडे लक्ष देण्याची अपेक्षा डोंबिवलीच्या मनीषा म्हात्रे यांनी व्यक्त केली.खाजगी कर्मचाºयांच्या नशिबी मुंबई गाठण्यासाठी हालअपेष्टा सुरुच आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी कल्याण स्थानकातून सोमवारी पहाटे ५.३९ वा. पहिली गाडी सोडण्यात आली. ८४ दिवसांनंतर प्रवास केल्याबद्दल काही प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. मात्र, सहप्रवासी नसल्याची खंत व्यक्त केली. आ. राजू पाटील यांनी महिला प्रवाशांकरिता विशेष लोकल सुरू करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या