शहरं
Join us  
Trending Stories
1
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
2
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
3
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
4
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
5
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
6
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
7
सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?
8
फायद्याची गोष्ट! हात धुण्याची योग्य पद्धत माहितीय का? ९९% लोक करतात 'या' छोट्या चुका
9
क्रेडिट कार्ड बंद केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? बंद करण्यापूर्वी जाणून घ्या काही महत्त्वाची गोष्टी
10
बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना
11
'कौआ बिर्याणी'च्या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेला हा अभिनेता आठवतोय का?, एकेकाळी विकायचा साडी
12
शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट! पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? तुमचे नाव यादीत असे घरबसल्या तपासा
13
Gold Price Impacts on buying: किंमती वाढल्या तरी सोनं खरेदी करणं थांबवत नाहीत भारतीय; पण यावेळी झालाय परिणाम, जाणून घ्या
14
धक्कादायक! ३ लाखाचा प्लॉट ३० लाखाचा झाला; जावयाने पैसे मागितले, पत्नी-सासूने मिळून गेम केला
15
Tanya Mittal : तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप
16
Guru Gochar 2025: १८ ऑक्टोबरपासून गुरूचे अतिचारी भ्रमण; स्वामीकृपेने डिसेंबरपर्यंत शुभ काळ!
17
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
18
ओला, चेतक, TVS, एथर आणि व्हिडापैकी कोण आहे सरस? पाहा किंमत, रेंज आणि टॉप स्पीड
19
सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं?
20
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!

CoronaVirus News: सकस आहाराच्या सेवनामुळे आदिवासी कोरोनापासून कोसो दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:33 IST

सेंद्रिय खतांचा वापर; रानभाज्या खाण्यावर भर, आयुष्यभर कष्टाची सवय

- जनार्दन भेरेभातसानगर : मागील चार महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले असून नागरिकांचे आयुष्यच बदलून गेले आहे. घड्याळाच्या काट्यावर चालणारी शहरे एकाएकी शांत झाली, व्यवहार ठप्प झाले. परदेशांतील कोरोनाने आपल्या घरात कधी प्रवेश केला, हे कळलेसुद्धा नाही. ग्रामीण भागातही त्याने हातपाय पसरले, मात्र सुदैवाने जिल्ह्यातील आदिवासी भागांत त्याचा शिरकाव झालेला नाही, याचे कारण त्यांचा सकस आहार. यातील घटकांमुळे त्यांच्यातील प्रतिकारशक्तीने कोरोनासारख्या महामारीला दूरच ठेवले आहे.अंगमेहनत, कष्टाची सवय असल्याने शरीर मजबूत होते. शहरातील नागरिक जंकफूडपासून ते अगदी रासायनिक खतांवर पिकवलेल्या भाज्यांचे सेवन करतात. मात्र, आदिवासी हे सेंद्रिय खतांचा वापर करून पिकवलेल्या भाज्यांचा वापर जेवणात करतात. परिस्थितीमुळे ९० टक्के आदिवासींना रासायनिक खते घेणे परवडत नाही. तसेच पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्यांचा ते अधिकाधिक वापर करतात. त्या अत्यंत गुणकारी असतात. आज ही आदिवासी मंडळी भेंडी किंवा अन्य भाजीपाल्यांची लागवड ही सेंद्रिय खतांचा वापर करूनच करतात. सकस आहारामुळेच शहापूर तालुक्यातील आदिवासीपाडे हे कोरोनापासून लांब आहेत.शहरात आज लहानांपासून मोठ्यांना कोरोना होत आहे. पण, आदिवासीपाड्यांवरील मुले, त्यांचे पालक हे कोरोनामुक्त आहेत. मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर होताच तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्यांच्याकडे सुपूर्द केले. आज तालुक्यात मुलींची दोन, तर मुलांची सहा वसतिगृहे आहेत.प्रत्येक वसतिगृहात ७५ विद्यार्थ्यांची क्षमता असते. त्यानुसार, १५० मुली आणि ४५० मुले या वसतिगृहांत राहतात. सध्या ती बंद आहेत.ज्यावेळेस सरकार शाळा सुरू करायला परवानगी देईल, तेव्हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आम्ही तयारी केली असल्याचे सांगण्यात आले. सॅनिटायझरचा वापर तसेच विद्यार्थ्यांची आरोग्यतपासणी केली जाईल. एखादा आजारी वाटल्यास त्याला तातडीने शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जाईल. शहरात आॅनलाइन अभ्यासक्रम शिकवला जात आहे, मात्र ग्रामीण खासकरून आदिवासी भागांत ही सोय नसल्याने शिक्षकच विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत. त्यांना मार्गदर्शन करत आहेत.१५ दिवसांनी होते तपासणीजेव्हा या आदिवासी शाळा सुरू असतात, तेव्हा दर १५ दिवसांनी या विद्यार्थ्यांची आरोग्यतपासणी केली जाते. त्यासाठी चार जणांच्या पथकाची नेमणूक केलेली असते. यात डॉक्टर, परिचारिका आदींचा समावेश असतो. या तपासणीत एखादा विद्यार्थी आजारी वाटल्यास त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करतात किंवा अधिक उपचाराची गरज असल्यास ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात नेले जाते. या सर्वांचा खर्च सरकार करते, असे संबंधितांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या