शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

CoronaVirus News : ठामपाने ५०पेक्षा जास्त मृत्यू लपविले, किरीट सोमय्या यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 07:19 IST

कोविडने मृत्यू झालेल्या ५० पेक्षा अधिक मृतांचा आकडा लपविला असल्याचा गंभीर आरोप मंगळवारी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला.

ठाणे : राज्यात ठाकरे सरकारने जो कोविड मृतांचा आकडा लपविण्याचा प्रयत्न केला आहे, तोच गोंधळ ठाणे महापालिकेतदेखील सुरू आहे. येथे कोविडने मृत्यू झालेल्या ५० पेक्षा अधिक मृतांचा आकडा लपविला असल्याचा गंभीर आरोप मंगळवारी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला.राज्य सरकारला पाठविलेल्या रिपोर्टमध्ये या आकडेवारीचा समावेश केलेला नसल्याचे सांगून मुंब्रा परिसरात जेवढे मृत्यू झाले आहेत, त्याच्या निम्मेच मृत्यू दाखविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाला हरवले हे केवळ भासविण्यासाठी इथल्या राजकीय मंडळींकडून असे प्रकार सुरू असल्याचे सांगून त्यांनी राजकीय मंडळींवरदेखील टीका केली.सोमय्यांसह आमदार निरंजन डावखरे तसेच ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ठाण्यातील कोविडची परिस्थिती जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी भेट घेतली. या बैठकीत त्यांनी कोरोनाने मृत्यू झालेल्यांची माहिती मागविली असून त्यावर आपण समाधानी नसल्याचे सांगितले. ठाकरे सरकारने ३ हजार मृत्यू दडपले आहेत. ९ हजार मृत्यू झाल्याची आम्हाला खात्री आहे. तर १,५०० मृत्यू कमी दाखविले गेले आहेत ही कबुलीदेखील राज्य सरकारने दिली आहे. सोमवारी सोलापूर महापालिकेने ४० मृत्यू दडपण्याचादेखील प्रयत्न केला आहे. त्यामुळे राज्यात लोकांना खूप नुकसान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यात जे मृत्यूचे आकडे लपविले आहेत त्यातील २ हजार मृत्यू हे मुंबईत दडपले असून ठाणे महापालिकेने ५० च्या वर कोविड मृत्यू दडपले आहेत, असा आरोप त्यांनी या वेळी केला.>खासगी रुग्णालयांकडून लूट : ठाण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये जाणूनबुजून रु ग्णांना पाठविण्यात येत असून त्यामुळेच त्यांच्याकडून भरमसाट फी वसूल केली जात आहे. हा सर्व प्रकारदेखील थांबला पाहिजे. दुसरीकडे जोगेश्वरी ट्रॉमा सेंटर, उल्हासनगर, भिवंडी या ठिकाणी आॅक्सिजन यंत्रणेत बिघाड झाल्याने मृत्यू झाले आहेत. ठाणे महापालिकेतसुद्धा अशा त्रुटी आहेत, त्यामुळे आॅक्सिजन, तांत्रिक त्रुटींमुळे मृत्यू होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. कोविड रु ग्णांच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत जागा कमी पडत असून, ती सुविधादेखील राज्य सरकारने केली नसल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यात आयुक्तांबरोबर झालेल्या चर्चेत जे मुद्दे उपस्थित केले त्यावर लक्ष देण्याचे आश्वासन दिले असले तरी आपण असमाधानी असल्याचे ते म्हणाले.>मुंब्य्रातील निम्मेच मृत्यू दाखविलेठाणे महापालिकेच्या कारभारावर टीका करताना सोमय्या यांनी विशेष करून मुंब्य्रात जे मृत्यू झाले आहेत त्याची आकडेवारी लपविली असल्याचे सांगितले. मुंब्य्रात जे मृत्यू झाले आहेत, त्यांतील निम्मेच मृत्यू दाखविले असून याची चौकशी करण्याची मागणीदेखील त्यांनी केली. मुंब्य्राची आकडेवारी ठाणे महापालिकेच्या आकडेवारीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस