शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

CoronaVirus News : ठामपाने ५०पेक्षा जास्त मृत्यू लपविले, किरीट सोमय्या यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 07:19 IST

कोविडने मृत्यू झालेल्या ५० पेक्षा अधिक मृतांचा आकडा लपविला असल्याचा गंभीर आरोप मंगळवारी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला.

ठाणे : राज्यात ठाकरे सरकारने जो कोविड मृतांचा आकडा लपविण्याचा प्रयत्न केला आहे, तोच गोंधळ ठाणे महापालिकेतदेखील सुरू आहे. येथे कोविडने मृत्यू झालेल्या ५० पेक्षा अधिक मृतांचा आकडा लपविला असल्याचा गंभीर आरोप मंगळवारी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला.राज्य सरकारला पाठविलेल्या रिपोर्टमध्ये या आकडेवारीचा समावेश केलेला नसल्याचे सांगून मुंब्रा परिसरात जेवढे मृत्यू झाले आहेत, त्याच्या निम्मेच मृत्यू दाखविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाला हरवले हे केवळ भासविण्यासाठी इथल्या राजकीय मंडळींकडून असे प्रकार सुरू असल्याचे सांगून त्यांनी राजकीय मंडळींवरदेखील टीका केली.सोमय्यांसह आमदार निरंजन डावखरे तसेच ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ठाण्यातील कोविडची परिस्थिती जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी भेट घेतली. या बैठकीत त्यांनी कोरोनाने मृत्यू झालेल्यांची माहिती मागविली असून त्यावर आपण समाधानी नसल्याचे सांगितले. ठाकरे सरकारने ३ हजार मृत्यू दडपले आहेत. ९ हजार मृत्यू झाल्याची आम्हाला खात्री आहे. तर १,५०० मृत्यू कमी दाखविले गेले आहेत ही कबुलीदेखील राज्य सरकारने दिली आहे. सोमवारी सोलापूर महापालिकेने ४० मृत्यू दडपण्याचादेखील प्रयत्न केला आहे. त्यामुळे राज्यात लोकांना खूप नुकसान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यात जे मृत्यूचे आकडे लपविले आहेत त्यातील २ हजार मृत्यू हे मुंबईत दडपले असून ठाणे महापालिकेने ५० च्या वर कोविड मृत्यू दडपले आहेत, असा आरोप त्यांनी या वेळी केला.>खासगी रुग्णालयांकडून लूट : ठाण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये जाणूनबुजून रु ग्णांना पाठविण्यात येत असून त्यामुळेच त्यांच्याकडून भरमसाट फी वसूल केली जात आहे. हा सर्व प्रकारदेखील थांबला पाहिजे. दुसरीकडे जोगेश्वरी ट्रॉमा सेंटर, उल्हासनगर, भिवंडी या ठिकाणी आॅक्सिजन यंत्रणेत बिघाड झाल्याने मृत्यू झाले आहेत. ठाणे महापालिकेतसुद्धा अशा त्रुटी आहेत, त्यामुळे आॅक्सिजन, तांत्रिक त्रुटींमुळे मृत्यू होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. कोविड रु ग्णांच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत जागा कमी पडत असून, ती सुविधादेखील राज्य सरकारने केली नसल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यात आयुक्तांबरोबर झालेल्या चर्चेत जे मुद्दे उपस्थित केले त्यावर लक्ष देण्याचे आश्वासन दिले असले तरी आपण असमाधानी असल्याचे ते म्हणाले.>मुंब्य्रातील निम्मेच मृत्यू दाखविलेठाणे महापालिकेच्या कारभारावर टीका करताना सोमय्या यांनी विशेष करून मुंब्य्रात जे मृत्यू झाले आहेत त्याची आकडेवारी लपविली असल्याचे सांगितले. मुंब्य्रात जे मृत्यू झाले आहेत, त्यांतील निम्मेच मृत्यू दाखविले असून याची चौकशी करण्याची मागणीदेखील त्यांनी केली. मुंब्य्राची आकडेवारी ठाणे महापालिकेच्या आकडेवारीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस