शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात दिवसभरात नव्या १९९५ रुग्णांची वाढ; केडीएमसीत सर्वाधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 01:36 IST

ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात ४०९ नवे रुग्ण सापडले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता मृतांची संख्या ९२२ झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ९९५ रुग्णांचा शोध शुक्रवारी घेण्यात आला. या रुग्णांसह जिल्ह्यात एक लाख ५५ हजार १३४ रुग्णांची आतापर्यंत नोंद घेण्यात आली आहे. तर २९ जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा चार हजार ८२ वर गेला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात ४०९ नवे रुग्ण सापडले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता मृतांची संख्या ९२२ झाली आहे. कल्याण - डोंबिवली (केडीएमसी) मनपा परिसरात सर्वाधिक ५९१ रुग्ण नव्याने आढळून आले असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरला ७१ नवे रुग्ण तर तीन मृत्यू झाला आहे. भिवंडी मनपा कार्यक्षेत्रात ३७ रुग्ण नव्याने सापडले असून, एकाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेच्या क्षेत्रात १९२ रुग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.नवी मुंबईत ३६८ रुग्ण वाढलेनवी मुंबई : शहरात दिवसभरात ३६८ रुग्ण वाढले आहेत. एकूण रुग्णांची संख्या ३२३७१ झाली आहे. नवी मुंबईमध्ये दिघा वगळता इतर सातही विभागात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. तर शुक्रवारी दिवसभरात ३४५ रुग्ण बरे झाले असून उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीमध्ये ३५६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.वसई-विरारमध्ये १८५ नवे रुग्णवसई : वसई-विरार शहरात शुक्रवारी दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर नवीन बाधित रुग्णसंख्या १८५ने वाढली आहे. तर दिवसभरात २१६ रुग्ण विविध रुग्णालयांतून मुक्त झाले आहेत. सध्या शहरात २,२१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.- अंबरनाथ शहरात ५७ रुग्ण नव्याने आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. बदलापूरमध्ये ९१ रुग्ण सापडले असून शुक्रवारीही एकाचाही मृत्यू झालेला नाही. ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातही १७९ रुग्णांची वाढ झाली असून, तीन मृत्यू झाले आहेत.रायगडमध्ये 615 जणांना कोरोनाची लागणअलिबाग : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी ६१५ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात पनवेल महापालिका क्षेत्रात २१५, पनवेल ग्रामीणमध्ये ७५, उरण ५, खालापूर ३०, कर्जत ३४, पेण ७८, अलिबाग ५६, मुरुड ३, माणगाव २४, तळा ७, रोहा २६, सुधागड २, श्रीवर्धन ४, म्हसळा ४, महाड ३४, पोलादपूर १८ असे एकूण ६१५ रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात एकूण ७९० रुग्ण उपचारांनंतर बरे होऊन घरी गेले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे